शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हॉस्पिटलमधून कुटुंबाला आला फोन, तुमचा रुग्ण दगावला, घरी रडारड सुरु झाली पण त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 13:31 IST

कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी जोशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयु बेड रिकामा नसल्याने त्यांचे नातलग अन्य रुग्णालयात सदरची सुविधा मिळते का पहात होते.

मीरारोड - कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेच्या कुटुंबीयांना चक्क रुग्ण मरण पावल्याचा फोन भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातून केला गेला होता.  त्यानंतर महिलेच्या नातलगांची रडारड झाली. पण नंतर मात्र चुकून फोन केला गेल्याचे सांगण्यात आले. घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांंनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी जोशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयू बेड रिकामा नसल्याने त्यांचे नातलग अन्य रुग्णालयात सदरची सुविधा मिळते का पहात होते. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचारी कडून शहरातील एका खाजगी रुग्णालयाचे नाव सुचवून 1 लाख अनामत रक्कम व 50 हजार रोज असे शुल्क सांगण्यात आले. परंतु तेवढी ऐपत नसल्याने सदर रुग्णाच्या नातलगांना मुंबईच्या नायर रुग्णालयात खाट उपलब्ध झाली.नायर रुग्णालयात नेण्यासाठी पालिकेने रुग्णवाहिका नसल्याचे सांगीतल्याने मुंबई भागातील एका खाजगी कार्डिएक रुग्ण वाहिकेस भाईंदरला येऊन नायरला नेण्याकरीता 12 हजारांचे भाडे ठरवले. 3 रोजी सकाळी रुग्णवाहिका मुंबई वरुन निघाली असताना दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांना जोशी रुग्णालयातून बोलत असल्याचा फोन आला आणि तुमचा रुग्ण मरण पावल्याचे सांगण्यात आले. ते एकुन नातलग रुग्णालया जवळ गोळा झाले. त्यांची रडारड सुरु होती.मुंबईवरुन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकास येऊ नको असा निरोप दिला. पण नातलगांनी रुग्णालयात चौकशी केली तेव्हा मात्र रुग्ण जिवंत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराने नातलगांचा संताप अनवार झाला. मग पुन्हा रुग्णवाहिका चालकास येण्यास कळवले असता तो पर्यंत नायर रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा बेड निघून गेल्याने मग सेव्हन हिल्स रुग्णालयात रुग्ण महिलेस नेण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक यांनी घडल्या प्रकाराची माहिती देत एकूणच पालिका कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या आधी देखील जोशी रुग्णालयात एका मुलास त्याच्या कोरोनाग्रस्त वडिलांचा मृतदेह ऐवजी दुसराच मृतदेह दिला होता. डोक्यावरील केसा वरुन वेळीच मुलाला कळले म्हणून गंभीर चूक टळली होती. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकcorona virusकोरोना वायरस बातम्या