शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

अनुत्तीर्ण झालेल्या नववीच्या विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा, ठाणे जि.प.चे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:25 IST

दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जशी फेरपरीक्षा देता येते. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील इयत्ता ९ वीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही आता फेरपरीक्षा देता येणार आहे.

ठाणे - दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जशी फेरपरीक्षा देता येते. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील इयत्ता ९ वीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही आता फेरपरीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा शाळा सुरू झाल्यावर जूनच्या शेवटच्या आठवड्यात घ्यावी, असे आदेश ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) शेषराव बडे यांनी पत्रकाद्वारे सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे यंदाही ९ वीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये सर्व (माध्यमिक ) शाळांमध्ये इयत्ता ९ मधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षणाच्या पद्धती अंमलात आणल्यावरदेखील जर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जावी, २०१८-१९ या वर्षाकरिता ही पुर्नपरीक्षा जून २०१९ मध्ये घ्यावी, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच ती शाळा सुरू झाल्यानंतर साधारणत: जूनच्या शेवटच्या आठवड्यात घ्यावी, केवळ अनुत्तीर्ण झालेल्या विषयांची पुर्नपरीक्षा घ्यावी. याकरिता मूल्यमापन पद्धती इयत्ती ९ वी करीता असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणे राहील.मानसिकदृष्टया दिव्यांग असलेल्या ८० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना ९ वीतील मूलभूत संबोधावर आधारित प्रश्नपत्रिका आवश्यकता भासल्यास तयार करावी, गंभीर आजाराने पीडित विद्यार्थ्यांला मानसिकदृष्ट्या दिव्यांगासाठी तयार केलेल्या मुलभूत संबोध प्रश्नावलीची सवलत मिळावी, त्याचबरोबर परीक्षा घेतल्यानंतर त्याचा अहवाल जुलै २०१९ च्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याबाबत नमूद केले असल्याचे बडे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणे