शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

भिवंडीतील भारनियमन झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:24 IST

वीजचोरीचे प्रमाण १५ टक्क्यांवर आले

भिवंडी : येथील वीजचोरांवर टोरंट कंपनीने गुन्हे दाखल केल्यामुळे प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्यांना चांगली सेवा मिळू लागली. ग्राहकांनीही बिल भरण्यास सुरुवात केल्यामुळे आज महावितरणच्या ‘ड’ श्रेणीतील भिवंडी शहर ‘ब’ श्रेणीत आले. परिणामी, येथील वीजचोरीचे प्रमाण १५ टक्क्यांवर येत भारनियमन बंद झाले आहे.शहरातील भारनियमन बंद झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून येथील विकासालाही चालना मिळाली आहे. पॉवरलूमलाही भारनियमन बंद झाल्याचा फायदा झाला आहे. पूर्वी वीजचोरीही होत होती. गुन्हे दाखल होऊनही परिस्थितीत फरक पडला नव्हता. अशा परिस्थितीत महावितरणने भिवंडीची जबाबदारी टोरंट कंपनीवर सोपवली. कंपनीने वितरणव्यवस्थेत सुधारणा करताना सदोष मीटर प्रामुख्याने बदलले. वीजचोरांवर कारवाईचा बडगा उगारला. ग्राहकसेवा केंद्रांबरोबरच तक्रारींसाठी कॉल सेंटर सुरू केली. एसएमएसवर बिलांची माहिती मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. नवीन जोडणीही सात दिवसांत मिळू लागली आहेत.वीजचोरी करणारे आणि बिल न भरण्याची सवय झालेल्यांचे धाबे दणाणले आहे. भिवंडीप्रमाणेच कळवा, मुंब्रा येथेही मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मुंब्रा येथे ७३ कोटी, तर कळवा येथे २० कोटी थकबाकी आहे. येथील नागरिकांना पुरेशी वीज मिळत नसल्याने सरकारने या भागातील वीजवितरणाचे खासगीकरण केले आहे.टोरंटमुळे वीजपुरवठा सुरळीत झाला. भारनियमन नसल्याने भिवंडीत स्टॅबिलायझर अनिवार्य होते, पण आज कुठेच दिसत नाही.- नारायण अय्यर, वकीलदेखभालीसाठी वीजपुरवठा खंडित होणार असेल, तर एसएमएस केला जातो. यामुळे आम्हाला कामाचे नियोजन करता येते.- विनोद परमार, संचालक, डॉर्तिक्स पोलीयार्नटोरंटमुळे कमी बिघाड होतात. येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत.- रोहिणी गावडे, गृहिणी

टॅग्स :bhiwandiभिवंडीelectricityवीज