शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

कारखान्यांची झाडाझडती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:24 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘रासायनिक बॉम्ब’ : ११ एमआयडीसींसह बेकायदा गोदामांचे जाळे

सुरेश लोखंडे ठाणे : उरण येथे वायुगळतीमुळे मंगळवारी लागलेली आग, धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडीच्या कारखान्यास लागलेली आग. या घटनांवरून धडा घेऊन ठाणे जिल्ह्यातील धोकादायक केमिकल्स वापरणाऱ्या औद्योगिक पट्ट्यातील, शेकडो कारखाने, फॅक्टरी, गोडाउन यांची ‘स्थळ पाहणी अहवाल’ करून आडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. उपरोक्त आगींसह भिवंडीतील गोदामपट्ट्यांत लागलेल्या गेल्या काही दिवसांतील आगीच्या दुर्घटना पाहता याची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठा औद्यागिक पट्टा ठाणे जिल्ह्यात आहे. सुमारे ११ एमआयडीसी क्षेत्रांसह जागतिक दर्जाच्या ट्रान्स ठाणे क्रीक (टीटीसी) हा औद्योगिक पट्ट्यात जीवघेणे केमिकल्स रोज वापरले जात आहे. याशिवाय परदेशातील उत्पादकांच्या साठवणुकीसाठी मुंबई- नाशिक महामार्गावरील भिवंडी पट्ट्यात अनधिकृत गोडाउनचे जाळे असून त्यातील विनापरवाना ठेवल्या जाणाºया रासायनिक स्पोटकांमुळे लागणाºया आगी व औद्योगिक पट्ट्यातील वायुगळती जीवितास घातक ठरत आहे. त्यावर नियंत्रण करणारी खास आपत्ती प्रतिबंधक यंत्रणा जिल्ह्यात सक्षम करण्याची अत्यंत गरज आहे.तत्पूर्वी या ठिकाणाचा स्थळ पाहणी अहवाल काळजीने करून त्याची अंमलबजावणी सक्तीने करण्यास भाग पाडण्याची गरज निर्माण झाली आहे.१९३ गोदामांमध्ये रासायनिक विस्फोटकेया अनधिकृत गोदामांमध्ये सर्वाधिक आगीच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी अवघ्या आठ महिन्यात ८३ दुर्घटना होऊन ४८ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी शेकडो आगीच्या व वायुगळतीच्या घटना घडूनही त्या गुलदस्त्यात आहेत. महामार्गालगतच्या भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी गावांजवळ शेकडो गोडाउन आहेत. त्यातील बहुतांशी अनधिकृत आहेत. कांदळवन नष्ट करून सुमारे १०० गोडाऊनची यादी प्रशासनाच्या हाती आहेत. या गोडाऊन पट्ट्यात १९३ गोडाउनमध्ये बिनदिक्कत रासायनिक विस्फोटकांचा साठा होत असल्याचे सांगितले जाते. या परिसरात केवळ चार गोदाममालकांकडे परवाना असल्याचेही सांगितले जाते. याव्यतिरिक्त अन्यही ठिकाणी विस्फोटकांचा साठा होत असल्याचा संशय आहे. या अशा ठिकाणांचा कारखान्यांचा, फॅक्टरीज आदींचा शोध घेऊन त्यांना परवानगी मिळालेले केमिकल व त्यांच्याकडून बेकायदेशीर वापरले जाणाºया केमिकलचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. याशिवाय सरकारी यंत्रणांकडून स्पॉट आॅडिट करून त्यांनुसार सक्तीची अंमलबजावणीची गरज सध्या आहे.येथे लागल्या आहेत आगीया आधी रासायनिक दुर्घनांमध्ये अंबरनाथ येथील फॉरेस्टनाक्या जवळील केमिकल कंपनीची दुर्घटना,घोडबंदर रोडवर केमिकलने भरलेले बीपीसीएलचे टँकर, भिवंडीचे जयश्री कम्पाउंडची केमिकलचे गोदाम,नारपोलीची डार्इंग मशीन आग, सुधीर शेट केमिकल्स कंपनीची आग, मानकोलीच्या इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या गोदामची आग, ओवळी येथील गोदामाची आग, तुर्भेतील केमिकल कंपनी, उल्हासनगरची फर्निचर कंपनी, भिवंडीचे वळपाडासह काल्हेर, सोनाळे येथील गोडाउन, कृष्णा कम्पाउंड, कृपा इंडस्टीज, पडघा येथील गवत, मानकोली, ऐरोली आदी ठिकाणी आगीच्या घटना आणि गेल्या काही दिवसांपूर्वी याच भिवंडीतील कारखान्यास लागलेली आग आदी घटना दुर्लक्षित व निष्काळीपणातून झालेल्या दिसून येत असल्याचे वास्तव तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :fireआगthaneठाणे