शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांची झाडाझडती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:24 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘रासायनिक बॉम्ब’ : ११ एमआयडीसींसह बेकायदा गोदामांचे जाळे

सुरेश लोखंडे ठाणे : उरण येथे वायुगळतीमुळे मंगळवारी लागलेली आग, धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडीच्या कारखान्यास लागलेली आग. या घटनांवरून धडा घेऊन ठाणे जिल्ह्यातील धोकादायक केमिकल्स वापरणाऱ्या औद्योगिक पट्ट्यातील, शेकडो कारखाने, फॅक्टरी, गोडाउन यांची ‘स्थळ पाहणी अहवाल’ करून आडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. उपरोक्त आगींसह भिवंडीतील गोदामपट्ट्यांत लागलेल्या गेल्या काही दिवसांतील आगीच्या दुर्घटना पाहता याची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठा औद्यागिक पट्टा ठाणे जिल्ह्यात आहे. सुमारे ११ एमआयडीसी क्षेत्रांसह जागतिक दर्जाच्या ट्रान्स ठाणे क्रीक (टीटीसी) हा औद्योगिक पट्ट्यात जीवघेणे केमिकल्स रोज वापरले जात आहे. याशिवाय परदेशातील उत्पादकांच्या साठवणुकीसाठी मुंबई- नाशिक महामार्गावरील भिवंडी पट्ट्यात अनधिकृत गोडाउनचे जाळे असून त्यातील विनापरवाना ठेवल्या जाणाºया रासायनिक स्पोटकांमुळे लागणाºया आगी व औद्योगिक पट्ट्यातील वायुगळती जीवितास घातक ठरत आहे. त्यावर नियंत्रण करणारी खास आपत्ती प्रतिबंधक यंत्रणा जिल्ह्यात सक्षम करण्याची अत्यंत गरज आहे.तत्पूर्वी या ठिकाणाचा स्थळ पाहणी अहवाल काळजीने करून त्याची अंमलबजावणी सक्तीने करण्यास भाग पाडण्याची गरज निर्माण झाली आहे.१९३ गोदामांमध्ये रासायनिक विस्फोटकेया अनधिकृत गोदामांमध्ये सर्वाधिक आगीच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी अवघ्या आठ महिन्यात ८३ दुर्घटना होऊन ४८ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी शेकडो आगीच्या व वायुगळतीच्या घटना घडूनही त्या गुलदस्त्यात आहेत. महामार्गालगतच्या भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी गावांजवळ शेकडो गोडाउन आहेत. त्यातील बहुतांशी अनधिकृत आहेत. कांदळवन नष्ट करून सुमारे १०० गोडाऊनची यादी प्रशासनाच्या हाती आहेत. या गोडाऊन पट्ट्यात १९३ गोडाउनमध्ये बिनदिक्कत रासायनिक विस्फोटकांचा साठा होत असल्याचे सांगितले जाते. या परिसरात केवळ चार गोदाममालकांकडे परवाना असल्याचेही सांगितले जाते. याव्यतिरिक्त अन्यही ठिकाणी विस्फोटकांचा साठा होत असल्याचा संशय आहे. या अशा ठिकाणांचा कारखान्यांचा, फॅक्टरीज आदींचा शोध घेऊन त्यांना परवानगी मिळालेले केमिकल व त्यांच्याकडून बेकायदेशीर वापरले जाणाºया केमिकलचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. याशिवाय सरकारी यंत्रणांकडून स्पॉट आॅडिट करून त्यांनुसार सक्तीची अंमलबजावणीची गरज सध्या आहे.येथे लागल्या आहेत आगीया आधी रासायनिक दुर्घनांमध्ये अंबरनाथ येथील फॉरेस्टनाक्या जवळील केमिकल कंपनीची दुर्घटना,घोडबंदर रोडवर केमिकलने भरलेले बीपीसीएलचे टँकर, भिवंडीचे जयश्री कम्पाउंडची केमिकलचे गोदाम,नारपोलीची डार्इंग मशीन आग, सुधीर शेट केमिकल्स कंपनीची आग, मानकोलीच्या इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या गोदामची आग, ओवळी येथील गोदामाची आग, तुर्भेतील केमिकल कंपनी, उल्हासनगरची फर्निचर कंपनी, भिवंडीचे वळपाडासह काल्हेर, सोनाळे येथील गोडाउन, कृष्णा कम्पाउंड, कृपा इंडस्टीज, पडघा येथील गवत, मानकोली, ऐरोली आदी ठिकाणी आगीच्या घटना आणि गेल्या काही दिवसांपूर्वी याच भिवंडीतील कारखान्यास लागलेली आग आदी घटना दुर्लक्षित व निष्काळीपणातून झालेल्या दिसून येत असल्याचे वास्तव तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :fireआगthaneठाणे