शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

कारखाने होणार बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 01:02 IST

तारापूर औद्योगिक प्रदूषण : एमपीसीबीकडून कारवाईच्या आदेशाने खळबळ

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधून परिसरात, लगतच्या खाड्यांत, शेतात सातत्याने नियमभंग करून प्रदूषण केले जात असल्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान निरी आणि आयआयटीच्या तज्ज्ञ समितीने हरित लवादासमोर सादर केलेल्या अहवालानंतर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना १६०.०४२ कोटींचा दंड ठोठावला गेला आहे. जे कारखाने दंड भरणार नाहीत, ते बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश एमपीसीबीने दिले असल्याने कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने दिल्ली येथे तारापूर औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांमधून करण्यात येणाºया प्रदूषणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १७ सप्टेंबर रोजी आॅनलाइन पद्धतीने झाली.हरित लवादाने या प्रदूषणामुळे झालेले परिणाम आणि सत्यस्थिती काय आहे, याबाबत पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अहमदाबाद, निरी आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या नियुक्त समितीने एमआयडीसी व परिसरात झालेल्या प्रदूषणाला काही कंपन्यांना दोषी ठरवीत त्यांच्या कडून १६०.०४२ कोटी रुपये दंड वसूल करण्याबाबत २२० कारखान्यांचा सर्व्हे केला होता. त्यातून ११० कारखान्यांना दोषी ठरविण्यात आले होते.या खटल्याच्या सुनावणी आणि निकालाकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले होते. समाज परिषदेच्या वकील अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी प्रथम आपली बाजू प्रखरपणे मांडताना दोषी कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची तसेच प्रदूषणामुळे बाधित लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. मात्र टिमा आणि टीईपीएसच्या वकिलांनी तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालामधील काही मुद्द्यांवर आक्षेप घेत सुनावणी घेण्यास आपला विरोध दर्शविल्याचे याचिकाकर्त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालात एमपीसीबीकडे असलेल्या जुन्या माहितीचा आधार घेऊन हा अहवाल तयार करण्यात आल्याचे सांगून सद्यस्थिती विचारात घेतली नसल्याचा आक्षेप नोंदवला. त्याचबरोबर एमपीसीबीने समितीस दिलेली प्रदूषण करणाºया कंपन्यांची यादी ही अवैध असल्याचे मत नोंदवत समितीने प्रदूषणाबाबत नवीन नमुने घेऊन तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले.कंपन्यांनी अद्ययावत ईटीपी, एसटीपी स्थापित केली आहे, पण समितीने अहवालात त्याचा विचार केलेला नाही, पर्यावरणाचे झालेले नुकसान आणि त्याची नुकसानभरपाई जाहीर करण्यासाठी वापरलेली कार्यपद्धती ही मान्यताप्राप्त आणि कायदेशीर नाही.सध्या दोषी ठरवलेल्या कंपन्यांना यापूर्वीही दोषी ठरून कारवाई झालेली असताना आणि दंड भरला असताना, एकाच दोषासाठी दोन वेळा कारवाई करणे हे नैसर्गिक न्याय तत्त्वांच्या विरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याचे सांगितले.परवानगी देणाºया शासन यंत्रणा जबाबदारएमआयडीसीच्या परिसरातील गावांमधील सांडपाणीदेखील नाल्यामार्फत त्याच खाडीमध्ये जात असते आणि त्यामुळे प्रदूषणात भर पडत असते, हे समितीने लक्षात घेतले नाही. २५ एमएलडी क्षमतेची सीईटीपीची क्षमता असताना नवीन कारखान्यांना परवानगी दिल्याने या सर्व प्रकरणास एमपीसीबी आणि एमआयडीसी या दोन शासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचे म्हणणे मांडून सुनावणीस विरोध दर्शविला.