शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक देखील होऊ शकतो; फेसबुक ग्रुप संचालकांनी व्यक्त केल्या भावना

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 4, 2022 18:12 IST

समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक देखील होऊ शकतो अशा भावना फेसबुक ग्रुप संचालकांनी व्यक्त केल्या. 

ठाणे: फेसबुक ग्रुप हे समाजात चांगल्या गोष्टी देखील रुजवत असतात. समाजमाध्यमांवर माणसे जोडली जातात आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होत असते. एक नेहमीच म्हटले जाते की, समाजमाध्यमांतून नकारात्मकता पसरवली जाते, वादविवाद होतात पण तसे नसून या माध्यमातून चांगले चित्र देखील समाजात निर्माण होऊ शकते असे एकमत वाचनवेडा फेसबुक ग्रुपचे संचालक विनम्र भाबळ, मुंबई स्वयंपाकघरच्या भक्ती चपळगावकर, सिनेमागल्लीचे गुरुदत्त सोनसुरकर यांनी मांडले.

फेसबुक ग्रुप काय करतात? या विषयावर मॅजेस्टिक गप्पांचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले. भाबळ, चपळगावकर, सोनसुरकर या तिघांनी ही फेसबुक ग्रुप सुरू करण्याचा प्रवास, आलेल्या अडचणी, विनोदी किस्से प्रेक्षकांसमोर मांडले. निवेदक मकरंद जोशी यांनी त्यांना बोलते केले. भाबळ यांनी वाचनाने माणसी जोडली जातात पण फेसबुक ग्रुपमुळे माणसे तुटली देखील असल्याचे प्रांजळपणे सांगितले. वाईट प्रसिद्धी देखील कधी कधी चांगली प्रसिद्धी ठरते हे वाचनवेडा या ग्रुपबाबत झाले असल्याचा स्वानुभव सांगताना ते म्हणाले की, एखादी पोस्ट स्वीकारणे जितके सोपे तितके ती नाकारणे कठीण असते. वाचकांच्या प्रेमामुळे हा ग्रुप सुरू असल्याचे ते म्हणाले. समाजमाध्यमाच्या ग्रुपच्या ॲडमिनची भूमिका ही संपादकीय भूमिकेसारखी असते. ग्रुपवर काय गेले पाहिजे हे पाहावे लागते. वाचनवेडा या ग्रुपमुळे पुस्तकांकडे लोक वळू लागले.  

चपळगावकर यांनी मुंबई स्वयंपाकघर ग्रुपच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेले खाद्यपदार्थ, सकस आहाराच्या रेसीपी लोकांसमोर आल्या. यानिमित्ताने समविचारी लोक एकत्र येतात आणि समाजमाध्यमांचा विधायक उपयोग देखील होतो. फेसबुक हे व्यावसायिक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, तुम्ही ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचा तुमचा फेसबुक ग्रुप असतो असेही त्या म्हणाल्या. सोनसुरकर यांनी सिनेमांवर लिहीणाऱ्यांसाठी सिनेमा गल्ली हा ग्रुप सुरू केला. हा ग्रुप लिहीणाऱ्यांवर जगत असल्याने यावर प्रमोशन फार मर्यादीत असते. प्रत्येक पोस्ट वाचूनच ती स्वीकारावी लागते. हॅशटॅगला लोक आधी कंटाळायचे पण ते देखील महत्त्वाचे असते हे आता लक्षात आले आहे. या ग्रुपमुळे लोक सभोवतालचा विचार करायला लागली असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रुपवर कधी कधी वाद होतात मग नेटकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक काही पोस्ट देखील टाकाव्या लागतात असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :thaneठाणेFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया