शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक देखील होऊ शकतो; फेसबुक ग्रुप संचालकांनी व्यक्त केल्या भावना

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 4, 2022 18:12 IST

समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक देखील होऊ शकतो अशा भावना फेसबुक ग्रुप संचालकांनी व्यक्त केल्या. 

ठाणे: फेसबुक ग्रुप हे समाजात चांगल्या गोष्टी देखील रुजवत असतात. समाजमाध्यमांवर माणसे जोडली जातात आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होत असते. एक नेहमीच म्हटले जाते की, समाजमाध्यमांतून नकारात्मकता पसरवली जाते, वादविवाद होतात पण तसे नसून या माध्यमातून चांगले चित्र देखील समाजात निर्माण होऊ शकते असे एकमत वाचनवेडा फेसबुक ग्रुपचे संचालक विनम्र भाबळ, मुंबई स्वयंपाकघरच्या भक्ती चपळगावकर, सिनेमागल्लीचे गुरुदत्त सोनसुरकर यांनी मांडले.

फेसबुक ग्रुप काय करतात? या विषयावर मॅजेस्टिक गप्पांचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले. भाबळ, चपळगावकर, सोनसुरकर या तिघांनी ही फेसबुक ग्रुप सुरू करण्याचा प्रवास, आलेल्या अडचणी, विनोदी किस्से प्रेक्षकांसमोर मांडले. निवेदक मकरंद जोशी यांनी त्यांना बोलते केले. भाबळ यांनी वाचनाने माणसी जोडली जातात पण फेसबुक ग्रुपमुळे माणसे तुटली देखील असल्याचे प्रांजळपणे सांगितले. वाईट प्रसिद्धी देखील कधी कधी चांगली प्रसिद्धी ठरते हे वाचनवेडा या ग्रुपबाबत झाले असल्याचा स्वानुभव सांगताना ते म्हणाले की, एखादी पोस्ट स्वीकारणे जितके सोपे तितके ती नाकारणे कठीण असते. वाचकांच्या प्रेमामुळे हा ग्रुप सुरू असल्याचे ते म्हणाले. समाजमाध्यमाच्या ग्रुपच्या ॲडमिनची भूमिका ही संपादकीय भूमिकेसारखी असते. ग्रुपवर काय गेले पाहिजे हे पाहावे लागते. वाचनवेडा या ग्रुपमुळे पुस्तकांकडे लोक वळू लागले.  

चपळगावकर यांनी मुंबई स्वयंपाकघर ग्रुपच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेले खाद्यपदार्थ, सकस आहाराच्या रेसीपी लोकांसमोर आल्या. यानिमित्ताने समविचारी लोक एकत्र येतात आणि समाजमाध्यमांचा विधायक उपयोग देखील होतो. फेसबुक हे व्यावसायिक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, तुम्ही ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचा तुमचा फेसबुक ग्रुप असतो असेही त्या म्हणाल्या. सोनसुरकर यांनी सिनेमांवर लिहीणाऱ्यांसाठी सिनेमा गल्ली हा ग्रुप सुरू केला. हा ग्रुप लिहीणाऱ्यांवर जगत असल्याने यावर प्रमोशन फार मर्यादीत असते. प्रत्येक पोस्ट वाचूनच ती स्वीकारावी लागते. हॅशटॅगला लोक आधी कंटाळायचे पण ते देखील महत्त्वाचे असते हे आता लक्षात आले आहे. या ग्रुपमुळे लोक सभोवतालचा विचार करायला लागली असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रुपवर कधी कधी वाद होतात मग नेटकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक काही पोस्ट देखील टाकाव्या लागतात असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :thaneठाणेFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया