शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक देखील होऊ शकतो; फेसबुक ग्रुप संचालकांनी व्यक्त केल्या भावना

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 4, 2022 18:12 IST

समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक देखील होऊ शकतो अशा भावना फेसबुक ग्रुप संचालकांनी व्यक्त केल्या. 

ठाणे: फेसबुक ग्रुप हे समाजात चांगल्या गोष्टी देखील रुजवत असतात. समाजमाध्यमांवर माणसे जोडली जातात आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होत असते. एक नेहमीच म्हटले जाते की, समाजमाध्यमांतून नकारात्मकता पसरवली जाते, वादविवाद होतात पण तसे नसून या माध्यमातून चांगले चित्र देखील समाजात निर्माण होऊ शकते असे एकमत वाचनवेडा फेसबुक ग्रुपचे संचालक विनम्र भाबळ, मुंबई स्वयंपाकघरच्या भक्ती चपळगावकर, सिनेमागल्लीचे गुरुदत्त सोनसुरकर यांनी मांडले.

फेसबुक ग्रुप काय करतात? या विषयावर मॅजेस्टिक गप्पांचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले. भाबळ, चपळगावकर, सोनसुरकर या तिघांनी ही फेसबुक ग्रुप सुरू करण्याचा प्रवास, आलेल्या अडचणी, विनोदी किस्से प्रेक्षकांसमोर मांडले. निवेदक मकरंद जोशी यांनी त्यांना बोलते केले. भाबळ यांनी वाचनाने माणसी जोडली जातात पण फेसबुक ग्रुपमुळे माणसे तुटली देखील असल्याचे प्रांजळपणे सांगितले. वाईट प्रसिद्धी देखील कधी कधी चांगली प्रसिद्धी ठरते हे वाचनवेडा या ग्रुपबाबत झाले असल्याचा स्वानुभव सांगताना ते म्हणाले की, एखादी पोस्ट स्वीकारणे जितके सोपे तितके ती नाकारणे कठीण असते. वाचकांच्या प्रेमामुळे हा ग्रुप सुरू असल्याचे ते म्हणाले. समाजमाध्यमाच्या ग्रुपच्या ॲडमिनची भूमिका ही संपादकीय भूमिकेसारखी असते. ग्रुपवर काय गेले पाहिजे हे पाहावे लागते. वाचनवेडा या ग्रुपमुळे पुस्तकांकडे लोक वळू लागले.  

चपळगावकर यांनी मुंबई स्वयंपाकघर ग्रुपच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेले खाद्यपदार्थ, सकस आहाराच्या रेसीपी लोकांसमोर आल्या. यानिमित्ताने समविचारी लोक एकत्र येतात आणि समाजमाध्यमांचा विधायक उपयोग देखील होतो. फेसबुक हे व्यावसायिक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, तुम्ही ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचा तुमचा फेसबुक ग्रुप असतो असेही त्या म्हणाल्या. सोनसुरकर यांनी सिनेमांवर लिहीणाऱ्यांसाठी सिनेमा गल्ली हा ग्रुप सुरू केला. हा ग्रुप लिहीणाऱ्यांवर जगत असल्याने यावर प्रमोशन फार मर्यादीत असते. प्रत्येक पोस्ट वाचूनच ती स्वीकारावी लागते. हॅशटॅगला लोक आधी कंटाळायचे पण ते देखील महत्त्वाचे असते हे आता लक्षात आले आहे. या ग्रुपमुळे लोक सभोवतालचा विचार करायला लागली असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रुपवर कधी कधी वाद होतात मग नेटकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक काही पोस्ट देखील टाकाव्या लागतात असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :thaneठाणेFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया