शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी आगडोंबाच्या तोंडावर , सरकारी खात्यांची मिलीभगत नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:50 IST

भिवंडी आणि आसपासच्या गावांना बेकायदा गोदामांनी विळखा घातल्याचे ठाऊक असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी खात्यांनी त्याकडे केलेले सोयीस्कर दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे.

भिवंडी : भिवंडी आणि आसपासच्या गावांना बेकायदा गोदामांनी विळखा घातल्याचे ठाऊक असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी खात्यांनी त्याकडे केलेले सोयीस्कर दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. त्यामुळे भिवंडी शहर आणि आसपासचा परिसर आगीच्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी स्फोटक परिस्थिती येथे असल्याचे बुधवारच्या आगीमुळे स्पष्ट झाले. त्यातून धडा घेऊन यानंतरही जर कारवाई झाली नाही, तर भीषण परिस्थिती उद््भवू शकते, याची चुणूक या घटनेने सर्व सरकारी यंत्रणांना दाखवली आहे.ओवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकाळी लागलेली आग भडकत गेली, ती आग विझवण्याच्या साधनांचा ्भाव असल्यामुळे. नंतर ती भडकली आणि काही काळ आगडोंब उसळला. त्यात १६ गोदामे खाक झाली. ही येथील पहिली घटना नाही.वारंवार येथे अशा घटना घडतात, त्यानंतर एकाही खात्याने आजवर त्याकडे लक्ष दिलेले नाही किंवा सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.ही गोदामे बेकायदा उभारलेली आहेत. त्यातील अनेकांच्या जागाही बिनशेती केलेल्या नाहीत. काही गोदामे बळकावलेल्या सरकारी जमिनीवर आहेत. त्याची सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. त्याचा संपूर्ण तपशील त्या कार्यालयाने यापूर्वीच गोळा केला आहे. या गोदामांत साठवलेल्या मालाची अनेकदा नोंद केलेली नसते. त्यामुळे ज्वलनशील वस्तू असतील तरी त्यापासून उद््भवणाºया धोक्यांबाबत कोणालाही फिकीर नसते. आग विझवण्याची साधने नसूनही त्याबद्दल एकही अधिकारी तोंड उघडायला तयार नाही, याचा अर्थ एक तर त्यांचे तोंड बंद केले असावे किंवा त्यांच्यावर या लॉबीची, त्यातील गुंतवणूकदारांची जबरदस्त दहशत असावी, असेच आसपासच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.जेव्हा ओवळीच्या सागर कॉप्लेक्समधील धनराज दासवानी यांच्या मालकीच्या चेक पॉंइंट या कागद, फर्निचरचा साठा असलेल्या कंपनीला सकाळी आग लागली. गोदामांतून निघात असलेल्या धुरामुळे नागरिकांनी पोलीस ठाणे आणि अग्नीशमन दलाला खबर दिली. पण या गोदामाचे शटर उघडत नसल्याने आग धुमसत गेली, भडकली आणि ती आसपासच्या गोदामांत पसरली. या गोदामांत सुमारे २५ कामगार अडकल्याने लोकांची धावपळ सुरू झाली. पण आजूबाजूच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना वेळीच बाहेर काढल्याने प्राणहानी टळली. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोचेपर्यंत पाच गोदामांत आग पसरली होती. त्यातच आग विझवण्यासाठी येणाºया अग्नीशमन दलाच्या गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या. एकेक करीत सायंकाळपर्यंत १६ गोदामे आगीत जळून खाक झाली. प्लास्टिक, औषधे व रसायनांची गोदामे जळाल्याने विषारी धूर पसरला. त्यामुळे परिसरातील नागरिक गुदमरले. डोळे चुरचुरणे, खोकला येणे, असा त्रास त्यांना झाला. महामार्गासह शहरात सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे वाहतूक खोळंबली. नंतर ती संथगतीने सुरू होती.भिवंडीतील अनधिकृत गोदामांत लागणाºया आगी, त्यांनी बळकावलेली जागा, तेथे बेदायदा साठवलेला माल याबाबत गेली दोन वर्षे उघडपणे चर्चा सुरू असतानाही त्याकडे सरकारी यंत्रणांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र बुधवारच्या घटनेचा बराच गवगवा झाल्याने आगीत जळालेली गोदामे अधिकृत आहेत का, याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआग