शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

महापालिकांच्या पाणीटंचाईवर काळू/शाई धरणांचाच उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:29 IST

ठामपाची २५ टक्के खर्चाची तयारी : आढावा बैठकीत आयुक्तांची माहिती

ठाणे : जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी काळूसह शाई धरण बांधण्याची गरज आहे. यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. मंत्रालयात यासाठी लवकरच जलसंपदामंत्र्यांकडे बैठक घेऊन हा विषय कायमचा मार्गी लावायचा आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शहरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पाणीटंचाई आढावा बैठकीत केले. तर, या काळू धरणासाठी ठाणे महापालिका स्वत: २५ टक्के खर्च करण्यास तयार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

येथील नियोजन भवनमध्ये जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांसह ग्रामीण भागातील पाणीटंचाई कृती आढावा बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी काळू व शाई धरण बांधण्याची गरज असल्याचे यावेळच्या चर्चेस अनुसरून जयस्वाल यांनी हा विषय मांडून काळू धरणासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी यावेळी केले. काळू धरण बांधण्यासाठी कॅबिनेटमध्ये हा विषय जोरदारपणे चर्चेत घेतला असून ते बांधण्याचा निर्णयही घेतला आहे. या धरणाच्या जागेसाठी वनविभागाला ३२३ कोटी रुपये द्यायचे असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या काळू धरणाद्वारे सर्व महापालिकांच्या शहरांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

शहराला भातसा धरणातून मिळणाऱ्या पाण्यासह स्टेमकडून १०० एमएलडी, बारवीतून १०० एमएलडी पाणी ठाणे शहरास मिळत आहे. याशिवाय, पाण्याची गळती थांबवली आहे. यामुळे शहराला २० वर्षे पाणी पुरेल, याचे नियोजन करून घेतल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट करून काळू व शाई धरण बांधण्याची अत्यंत गरज असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांनी ठाणे महापालिकेचा आदर्श घेऊन पाण्याच्या साठवणुकीचे नियोजन करण्याची तंबी पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. पाणी साठवण्याची क्षमता नसल्यामुळेच रस्त्यांवर पाणी वाहून जात आहे. यामुळेच नागरिकांना ते मिळत नसल्याचे वास्तव पालकमंत्र्यांनी महापालिकांच्या आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.

काळू व शाईचे पाणी शेतीला नकोच - संजीव जयस्वालशहरांसाठी बांधण्यात येत असलेल्या या काळू व शाई या धरणांतील सर्वाधिक पाणी शहरांसाठी मिळायला हवे. या पाण्यातील जास्त पाणी शेतीला जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. शहरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या धरणांचे सर्वाधिक पाणी जिल्ह्यातील महापालिकांच्या शहरांनाच वापरता येईल, याची काळजी घेण्याचे जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन २० वर्षे पाणीपुरवठा सुरळीत होईल, याची काळजी घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी महापालिकेला मिळणाºया पाण्यापैकी ३८ टक्के पाण्याची साठवणूक करण्याची क्षमता निर्माण केल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले.सध्या सुरू असलेली ३० तासांची पाणीकपात ४० तासांवर जात असल्याचे जयस्वाल यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले. या टंचाईवर मात करण्यासाठी १८ टक्के पाणीसाठवण क्षमता निर्माण केल्यानंतर २५ टक्के आणि आता ३८ टक्के पाणीसाठवण क्षमता तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२७ गावांसह ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कामात हलगर्जीया बैठकीत २७गावांच्या पाणीपुरवठ्यासह अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी येथील पाणीपुरवठ्याच्या संदर्भातही चर्चा झाली. एमजेपीकडून सुरू असलेल्या या पाणीपुरवठा योजनांच्या कामात हलगर्जी होत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांकडे त्यासंदर्भात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एमजेपीकडे असलेल्या योजनांच्या कामासाठी निविदा काढूनही ठेकेदार का मिळत नाही, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. तर, एमजेपीच्या कामाबाबत आमदार कथोरे यांच्यासह आमदार गणपत गायकवाड यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. भिवंडीसह ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी या पाण्याच्या पाइपलाइनसाठी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत. पण, शहरांप्रमाणे त्यांच्या वाढीव पाण्यात अजूनही वाढ झालेली नाही. त्यांना मिळणाºया सहा एमएलडी पाण्यातून गळतीच जास्त होत आहे. यामुळे त्यांना कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यांच्यासाठी ११ एमएलडीपेक्षा जास्त वाढीव पाणी देण्याची गरज असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका