शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

दरवर्षी उपचारादरम्यान १ हजार रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: May 7, 2015 03:01 IST

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात वर्षाला उपचारादरम्यान २००१ पासून दरवर्षी १ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात वर्षाला उपचारादरम्यान २००१ पासून दरवर्षी १ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात तर तीन दिवसांत १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील वर्षातील मृत्यूची आकडेवारी पाहता दिवसाला तीन ते चार रुग्ण दगावत असल्याचेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब रु ग्ण ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयातील उपचारपद्धतीवर विश्वास ठेवून ते या ठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु, मागील काही वर्षांपासून या रुग्णालयावर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रणच राहिले नाही. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला येथे बहुतेक वेळा दिला जातो. या रुग्णालयातील मेडिकलसुद्धा गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंदावस्थेत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून महागडी औषधे घ्यावी लागतात. सुटीच्या दिवशी रुग्ण तपासणीसाठी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसतात. प्रत्येकवर्षी हृदयविकाराचे रुग्ण, ब्रेन हॅमरेज, किडनी फेल अशा मोठ्या आजारांच्या रुग्णांचा मृतांच्या आकडेवारीत समावेश आहे. तसेच नवजात बालकांच्या मृत्यूचा आकडादेखील वाढता आहे. केवळ अशा मोठ्या आजारांवरील साधनसामग्री व डॉक्टर या रुग्णालयात उपलब्ध नसल्यानेच हे प्रमाण वाढत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. या रुग्णालयात खासकरून ग्रामीण भागातून गरोदर महिला उपचारासाठी येतात. त्यामुळे जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे वजन कमी असते. परिणामी, अशा नवजात मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.