शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

राज्यात सुमारे साडेसत्तावीस लाख बांधकाम कामगार असतानाही नोंदणी मात्र ६ लाखांचीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 19:06 IST

राज्यातील बांधकाम कामगारांची संख्या सुमारे साडेसत्तावीस लाख इतकी असुनही त्यापैकी केवळ ६ लाख कामगारांनीच कामगार मंडळाकडे नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र 

राजू काळे 

भाईंदर - राज्यातील बांधकाम कामगारांची संख्या सुमारे साडेसत्तावीस लाख इतकी असुनही त्यापैकी केवळ ६ लाख कामगारांनीच कामगार मंडळाकडे नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. श्रीरंगम् यांनी शुक्रवारी काशिमिरा येथील दिल्ली दरबार हॉटेलमध्ये आयोजित बांधकाम कामगार व कामगार कल्याणकारी योजनेंतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत दिली. 

समाजातील उपेक्षित घटक व धोरणकर्ते यांच्यातील दुवा असलेली समर्थन संस्था व श्रमजीवी कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत पुढे बोलताना ते म्हणाले, ६ लाख कामगारांनी नोंदणी केली असली तरी त्यांनी आपल्या सलग ९० दिवस कामांच्या नोंदणीत सातत्य न ठेवल्याने नोंदणीकृत आकडा ३ लाखांवर आला आहे. ज्या कामगारांना योजनांची माहितीच नाही त्या कामगारांची नोंदणी शिबिरांच्या माध्यमातुन केली जाणार आहे. २१ प्रकारच्या बांधकाम व्याख्येत समाविष्ट होणाऱ्या  कामगारांना संरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडुन १०० टक्के बांधकाम कामगारांना संरक्षण दिले जाते. त्यासाठी प्रत्येक कामगाराला सलग ९० दिवस काम केल्याची नोंद मंडळाकडे नाममात्र शुल्क भरुन करणे आवश्यक आहे.

एखाद्या कामगाराने वेगवेगळ्या ठिकाणी ९० दिवस काम केल्यास प्रत्येक ठिकाणच्या मालकाकडुन केलेल्या कामाची नोंद एकत्रितपणे  मंडळाकडे नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत कामगार कामावर असताना त्याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या वारसदारांना तब्बल ५ लाखांचे आर्थिक सहाय्य व प्रत्येक वर्षाला २४ हजार रुपये प्रमाणे सलग ५ वर्षे अतिरीक्त रक्कम त्याच्या वारसांना दिली जाते. तसेच नैसर्गिक मृत्यु झाल्यास २ लाखांचे अर्थसहाय्य दिले जाते. त्याच्या अंत्यविधीसाठी १० हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे दोन अपत्यांच्या शिक्षणासह विविध शैक्षणिक प्रशिक्षणासाठी देखील मंडळाकडुन अर्थसहाय्य दिले जात असुन कामगार स्त्रीला प्रसुतीसाठी व आजारपणासाठी देखील आर्थिक मदत दिली जाते. कामासाठी लागणाऱ्या  अवजारेखरेदीसाठी देखील ५ हजार रुपये तर कुटुंब नियोजन व ७५ टक्के अपंगत्व आल्यास देखील अर्थसहाय्य केले जाते. मंडळाने अलिकडेच बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन कामगारांना पुर्ण शिक्षणाची ओळख करुन देण्याचे कार्य सुरु केले आहे. त्याला मराठवाडा, विदर्भ व कोकणातील बांधकाम कामगारांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सचिवांनी सांगितले. राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या आर्थिक सहाय्याठी प्रत्येक स्थानिक प्रशासनांतर्गत बांधकाम प्रकल्पांच्या एकुण खर्चावर १ टक्का उपकर लागु केला असुन त्यातुन मंडळाकडे तब्बल ६ हजार २०० कोटी एवढी रक्कम जमा झाली आहे.

परंतु, त्या रक्कमेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने हा निधी पडुन असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या योजनेत मनरेगाचाही समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगताच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडीत यांनी सरकारी यंत्रणेच्या उदासिनतेमुळे मनरेगा अंतर्गत कामगारांना सलग ९० दिवस काम दिले जात नसल्याने ते कामगार या योजनेपासुन वंचित राहत असल्याची बाब सचिवांच्या निदर्शनास आणुन देत काम केल्याची एकत्रित नोंद योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी केंद्रीय कामगार आयोगाचे अध्यक्ष रईस पठाण यांनी, नागरीकांची सरकारी अधिकाय््राांबाबत असलेली उदासिनता अशा कार्यशाळेच्या आयोजनातुन कमी होऊन त्यासाठी त्यात सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यशाळेत पालघर जिल्ह्यातील कामगार मंडळाच्या उपायुक्त लोखंडे, सहाय्यक आयुक्त माळी, ठाण्याचे उपायुक्त संकेत कांगडे, देशपांडे, भिवंडीचे सहाय्यक आयुक्त भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.