शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राज्यात सुमारे साडेसत्तावीस लाख बांधकाम कामगार असतानाही नोंदणी मात्र ६ लाखांचीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 19:06 IST

राज्यातील बांधकाम कामगारांची संख्या सुमारे साडेसत्तावीस लाख इतकी असुनही त्यापैकी केवळ ६ लाख कामगारांनीच कामगार मंडळाकडे नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र 

राजू काळे 

भाईंदर - राज्यातील बांधकाम कामगारांची संख्या सुमारे साडेसत्तावीस लाख इतकी असुनही त्यापैकी केवळ ६ लाख कामगारांनीच कामगार मंडळाकडे नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. श्रीरंगम् यांनी शुक्रवारी काशिमिरा येथील दिल्ली दरबार हॉटेलमध्ये आयोजित बांधकाम कामगार व कामगार कल्याणकारी योजनेंतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत दिली. 

समाजातील उपेक्षित घटक व धोरणकर्ते यांच्यातील दुवा असलेली समर्थन संस्था व श्रमजीवी कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत पुढे बोलताना ते म्हणाले, ६ लाख कामगारांनी नोंदणी केली असली तरी त्यांनी आपल्या सलग ९० दिवस कामांच्या नोंदणीत सातत्य न ठेवल्याने नोंदणीकृत आकडा ३ लाखांवर आला आहे. ज्या कामगारांना योजनांची माहितीच नाही त्या कामगारांची नोंदणी शिबिरांच्या माध्यमातुन केली जाणार आहे. २१ प्रकारच्या बांधकाम व्याख्येत समाविष्ट होणाऱ्या  कामगारांना संरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडुन १०० टक्के बांधकाम कामगारांना संरक्षण दिले जाते. त्यासाठी प्रत्येक कामगाराला सलग ९० दिवस काम केल्याची नोंद मंडळाकडे नाममात्र शुल्क भरुन करणे आवश्यक आहे.

एखाद्या कामगाराने वेगवेगळ्या ठिकाणी ९० दिवस काम केल्यास प्रत्येक ठिकाणच्या मालकाकडुन केलेल्या कामाची नोंद एकत्रितपणे  मंडळाकडे नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत कामगार कामावर असताना त्याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या वारसदारांना तब्बल ५ लाखांचे आर्थिक सहाय्य व प्रत्येक वर्षाला २४ हजार रुपये प्रमाणे सलग ५ वर्षे अतिरीक्त रक्कम त्याच्या वारसांना दिली जाते. तसेच नैसर्गिक मृत्यु झाल्यास २ लाखांचे अर्थसहाय्य दिले जाते. त्याच्या अंत्यविधीसाठी १० हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे दोन अपत्यांच्या शिक्षणासह विविध शैक्षणिक प्रशिक्षणासाठी देखील मंडळाकडुन अर्थसहाय्य दिले जात असुन कामगार स्त्रीला प्रसुतीसाठी व आजारपणासाठी देखील आर्थिक मदत दिली जाते. कामासाठी लागणाऱ्या  अवजारेखरेदीसाठी देखील ५ हजार रुपये तर कुटुंब नियोजन व ७५ टक्के अपंगत्व आल्यास देखील अर्थसहाय्य केले जाते. मंडळाने अलिकडेच बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन कामगारांना पुर्ण शिक्षणाची ओळख करुन देण्याचे कार्य सुरु केले आहे. त्याला मराठवाडा, विदर्भ व कोकणातील बांधकाम कामगारांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सचिवांनी सांगितले. राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या आर्थिक सहाय्याठी प्रत्येक स्थानिक प्रशासनांतर्गत बांधकाम प्रकल्पांच्या एकुण खर्चावर १ टक्का उपकर लागु केला असुन त्यातुन मंडळाकडे तब्बल ६ हजार २०० कोटी एवढी रक्कम जमा झाली आहे.

परंतु, त्या रक्कमेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने हा निधी पडुन असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या योजनेत मनरेगाचाही समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगताच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडीत यांनी सरकारी यंत्रणेच्या उदासिनतेमुळे मनरेगा अंतर्गत कामगारांना सलग ९० दिवस काम दिले जात नसल्याने ते कामगार या योजनेपासुन वंचित राहत असल्याची बाब सचिवांच्या निदर्शनास आणुन देत काम केल्याची एकत्रित नोंद योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी केंद्रीय कामगार आयोगाचे अध्यक्ष रईस पठाण यांनी, नागरीकांची सरकारी अधिकाय््राांबाबत असलेली उदासिनता अशा कार्यशाळेच्या आयोजनातुन कमी होऊन त्यासाठी त्यात सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यशाळेत पालघर जिल्ह्यातील कामगार मंडळाच्या उपायुक्त लोखंडे, सहाय्यक आयुक्त माळी, ठाण्याचे उपायुक्त संकेत कांगडे, देशपांडे, भिवंडीचे सहाय्यक आयुक्त भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.