शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

नापास झालो, तरी सारे आयुष्य संपत नाही

By admin | Updated: March 5, 2017 03:08 IST

अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र परीक्षेत पास झालो नाही, तर सगळे आयुष्य संपले, असे समजण्याची कारण नाही. अपयशाकडेही सकारात्मक वृत्तीने पाहा, असा सल्ला

- जान्हवी मोर्ये,  ठाणेअनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र परीक्षेत पास झालो नाही, तर सगळे आयुष्य संपले, असे समजण्याची कारण नाही. अपयशाकडेही सकारात्मक वृत्तीने पाहा, असा सल्ला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला.स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात ते बोलत होते. कोणत्याही करिअरचा विचार करताना दिवास्वप्ने पाहू नका. उघड्या डोळ््यांनी स्वप्ने पाहा. त्यामुळे तुम्हाला अपयशही आले, तरी भ्रमनिरास होणार नाही, असे सांगत जयस्वाल म्हणाले, कोणतेही काम करताना निष्ठा असावी. पालकांनीही त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. उलट कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित करावी. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी विसरू नये. असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मराठी शिकलो नसतो तरमी पॅशनेट होऊन करिअर करण्याचे ठरविले होते. आम्ही चार भाऊ होतो. घरातून मला पाठिंबा होता. राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरविले. लोकसेवा या शब्दात लोकांसाठी काम करायचे आहे. हे लक्षात ठेवून त्यात यशस्वी हेण्याचे ध्येय उराशी ठेवले होते. परीक्षा पास झाल्यावर माझे पहिले पोस्ंिटग महाराष्ट्रात झाले. माझ्या गुरुस्थानी असलेल्या एका मित्राने काय कर किंवा काय करु नको यापेक्षा महाराष्ट्रात काम करण्याआधी मराठी शिकण्याचा सल्ला दिला. तो मला कामी आला.त्यावेळी त्याचा सल्ला ऐकला नसता तर माझे काय झाले असते, असा विचारही मला आज मनाला चाटून जातो. पहिल्याच दिवशी मराठीतून पत्रव्यवहार लिहिण्याची वेळ आली. अन्य राज्यात प्रशासकीय व्यवहार इंग्रजीतून केला जातो. महाराष्ट्रात तो मराठीतून केला जातो, याचे समाधान आहे, अशा भावना जयस्वाल यांनी मांडल्या. वाईट वळणाला लागलो होतोयशाकडे वाटचाल करताना जीवनाच्या एका टप्प्यावर तरुणपणी माझेही पाऊल वाकडे पडले होते. एका परीक्षेत गुण कमी मिळाले. तेव्हा मी दारु आणि सिगारेटचा धूर काढत होतो. तेव्हा माझे वडील वारले होते. त्यावेळी आईने मला एकाच शब्दात सुनावले, बाबा असते तर त्यांना हे पाहून काय वाटले असते? ते शब्द काळजाला घर पाडणारे ठरले. तेव्हाच ठरवले, दारु आणि सिगारेटचा धूर पुन्हा काढायचा नाही आणि माझ्या करिअरची गाडी मूळ ट्रॅकवर आली. त्याचे श्रेय माझ्या निरक्षर आईला जाते. शिकलेलीच माणसे वळणावर आणतात असे नाही... हे सांगताना जयस्वाल भावनावश झाले होते. नोकरी राजासारखी करा!नोकरी राजासारखी करा. चांगले काम देव पाहत असतो. त्याच्या दरबारात चांगल्याची नोंद होत असते.कोणाला फसवू नका. स्वत:ला फसवून तुम्ही आनंदी राहू शकत नाही. कोणतेही काम करताना चांगला माणूस होणे गरजेचे आहे, याकडे जयस्वाल यांनी लक्ष वेधले. कठोर मेहनत घेऊन जे यश मिळते, त्याच्या आनंदाचा पारावर राहत नाही. तो आनंद कोणत्याही तराजूने न तोलण्यासारखा असतो. खरा आनंद असतो, असे त्यांनी सांगितले.बदलीसाठी घेतला होता पंगा : चंद्रपूरला माझे पोस्ंिटग झाले. त्यावेळी मी अनेकांशी पंगा घेतला होता. पंगा घेतला, की सरकारकडून माझी लगेच बदली केली जाईल, अशी माझी धारणा होती. पण माझे चांगले काम पाहून मला साडेतीन वर्षे चंद्रपूरमध्ये ठेवले. त्यानंतर मात्र मी कुटुंबीयांचा विचार करून बदली करून घेतली, असा किस्सा त्यांनी सांगितला.