शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

असफलता मिळाली तरी नाराज न होता पुन्हा प्रयत्न करावा  :  तरूण पिढीला  मॅनेजमेंट गुरूनी दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 17:47 IST

ब्रह्मांड कट्टयावर "चरण या आचरण" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. 

ठळक मुद्देअसफलता मिळाली तरी नाराज न होता पुन्हा प्रयत्न करावा तरूण पिढीला  मॅनेजमेंट गुरूनी दिला संदेशब्रह्मांड कट्टयावर "चरण या आचरण" या विषयावर व्याख्यान संपन्न

ठाणे: आजची तरूण पिढी ही अत्यंत बुद्धिमान आहे. त्यांना पालकांनी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत आणि देणार आहेत. त्यांनी आपले कर्तव्य, अध्ययन जबाबदारी ओळखून करणे आवश्यक आहे. त्यातून जर असफलता मिळाली तरी नाराज न होता  पालकांच्या मदतीने पुन्हा प्रयत्न करावा असा सल्ला  मॅनेजमेंट गुरू तथा मोटीवेशन स्पीकर दिनेश व्यास यांनी दिला. ब्रह्मांड कट्टयावर  मॅनेजमेंट गुरू तथा मोटीवेशन स्पीकर दिनेश व्यास यांचे "चरण या आचरण" या विषयावर हिंदी भाषेतील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

आजच्या भेडसावत असलेल्या समस्या व त्यावरील उपाय आणि समाधान यावर त्यांनी मार्गदर्शन केले. चरण व आचरण या बाबत बोलताना ते म्हणाले चरण म्हणजे वैयक्तिक आणि आचरण म्हणजे वागणूक या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत. आपल्या नियमित सुखकर आयुष्यात एखादी वेगळी परिस्थिती निर्माण होते व त्यामुळे जी गडबड होते ती समस्या. त्या समस्येचा विचार करून योग्य तो मार्ग काढल्यामुळे मिळते ते समाधान. समस्या सोडविण्यासाठी आपण महान व्यक्तींना आठवून त्यांच्या विचाराने प्रभावित होतो. हेच विचार आपले व्यक्तिमत्व घडवते. म्हणजेच आपल्या वागणुकीमुळे घडते ते आपल व्यक्तिमत्व चरण  व नंतर प्राप्त होते ते समाधान म्हणजे  आचरण. हा आपल्या समस्येचा व समाधानाचा गुंता दिनेश व्यास यांनी उलगडून सांगितला. आपल्याला समजलेल्या विचारांचा लाभ इतरांना होण्यासाठी आपण पुढील व्यवस्था केली जाते. व्यक्ति,विचार व व्यवस्था हे एक चक्र आहे. त्यावेळी आपण व्यक्ती व विचार याचे आपण आचरण करतो असे ते पुढे म्हणाले. 

           समस्या व समाधान या बाबत ते म्हणाले, समस्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कालची समस्या ही आजची असेलच असे नाही. समस्या कुठल्या स्वरुपात आहे याचा विचार करायला पाहिजे.  समस्येच स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे कारण त्यातूनच मार्ग निर्माण होतात. त्यानंतर मिळते ते समाधान. काम,कर्तव्य करणे आवश्यक आहे पण त्या पासून होणाऱ्या फायदा यावर आपला अधिकार असतोच असे नाही. आपण कर्तव्य करत असताना फळाची अपेक्षा करावी पण जेंव्हा आपण आपली जबाबदारी ओळखून कर्म करतो त्यावेळी फळ निश्चित मिळते आणि लाभते ते समाधान. म्हणजेच समस्या आणि समाधान म्हणजेच आचरण हे पुन्हा एकदा सिद्ध केले. आसक्ती हे समस्येचे मूळ कारण आहे . वाचन, ऐकणे, लिखाण यातूनच बुध्दी प्रगल्भ होते व एकाग्रता वाढते विचार करण्याची शक्ती वाढते आसक्ती वर नियंत्रण मिळवता येते. यातूनच निर्माण होते एक सुंदर व्यक्तिमत्व व आयुष्यात मिळते समाधान. अशा प्रकारे व्यास यांनी "चरण या आचरण " या विषयाची सांगता केली. 

             कोरोनाच्या महामारी मुळे निर्माण  झालेल्या  परिस्थितीमुळे ब्रह्मांड कट्टा ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रम सादर करीत आहेत सदरचा ब्रह्मांड कट्टा हा पाचवा होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला गायक जितेंद्र तांबे यांनी "कही दूर जब दिन ढल जाये " व"मेरे दिलने तडपते जब नाम तेरा पुकारा " ही दोन गाणी गाऊन संगीतमय वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक राजेश जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले तर आभार अध्यक्ष महेश जोशी यांनी मानले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकSocialसामाजिक