शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 00:15 IST

Marathi Schools: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पाटील यांचा सत्कार सोहळा शनिवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला.

ठाणे : “शासनाने मराठी शाळांसाठी किमान पटसंख्या सांगू नये. एक विद्यार्थी जरी वर्गात असेल, तरी त्या विद्यार्थ्याला शिकवले पाहिजे. मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे. कुणास ठाऊक, त्या एका विद्यार्थ्यातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर घडतील!” असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी ठाण्यात केले.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पाटील यांचा सत्कार सोहळा शनिवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला. ते म्हणाले की, “मराठी भाषा अशा टप्प्यावर आहे, जिथे तिचे साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ते धोक्याच्या रेषेवर गेली आहे. जशी आपण आजारी आईची काळजी घेतो, तशीच काळजी आपण मराठी भाषेची घेतली पाहिजे. ती उराशी जपली पाहिजे, संवर्धन केले पाहिजे. शासनाकडून मदत मिळाली तर ती घ्यावी, पण भाषेचे रक्षण हे लोकांनीच करायचे असते कारण हा लोकांचा उठाव आहे.” 

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान दोन ते तीन मराठी भवन उभारले पाहिजेत. मात्र त्याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहू नये. पूर्वी जशा जिल्हा परिषदेच्या शाळा उन्हापावसापासून संरक्षित असायच्या, तशाच भावनेने ही भवनं उभी केली पाहिजेत.” 

त्यांनी सुचवले की, “ज्येष्ठ नागरिक, ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत, ते आपली जागा मराठी भवनासाठी देण्यास तयार आहेत. अशा व्यक्तींना भेटून संवाद साधावा. प्रत्येक मराठी भवनात लहानसे ग्रंथालय असावे. नाना-नानी पार्कमध्ये फक्त फिरायला पाठवण्याऐवजी त्यांना मराठी भवनात सहभागी करून घ्या. त्यातून भाषेचे आणि संस्कृतीचे जतन होईल.” 

पाटील म्हणाले, “जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी मुले अत्यंत बुद्धिमान असतात. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले बहुतांश शास्त्रज्ञ हे अशाच मराठी माध्यमातील शाळांत शिकलेले आहेत. माझ्या काळात दहा-पंधरा विद्यार्थ्यांची मर्यादा घालण्यात आली असती, तर मीसुद्धा आज येथे नसतो. त्यामुळे शिक्षणासाठी संख्या नव्हे तर गुणवत्ता महत्त्वाची आहे.”

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Medium Must Continue Even With One Student: Patil

Web Summary : Vishwas Patil advocates for Marathi schools, emphasizing quality over quantity. He urges community involvement, Marathi Bhawans in every taluka, and utilizing senior citizens' expertise to preserve Marathi language and culture. He highlights the success of Zilla Parishad school alumni.
टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनmarathiमराठीthaneठाणे