शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जमीन दानपत्रानंतरही पाणीयोजना रखडल्या, नवे केटी बंधारे मात्र कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:20 IST

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण आहेत. पाण्यासाठी सदस्यांना ग्रामस्थ धारेवर धरत आहेत.

ठाणे : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण आहेत. पाण्यासाठी सदस्यांना ग्रामस्थ धारेवर धरत आहेत. ‘लोकमत’नेही दुष्काळदाह मालिकेद्वारे जिल्ह्यातील पाणीटंचाईची भीषणता चव्हाट्यावर आणली आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी ठिकठिकाणच्या गावकऱ्यांनी जमिनी दान केलेल्या आहेत. तसे दानपत्रही दिले आहे. पण, निष्काळजीमुळे योजना मार्गी लागल्या नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. गावांमध्ये लावलेल्या बोअरिंगही फेल गेल्या. तज्ज्ञ असूनही हा खर्च निष्फळ जात असल्याची खंत सोमवारी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.भिवंडी, कल्याण, अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनांसाठी संबंधित जमीनमालकांनी जमिनीचे दानपत्र दिले आहेत. पण, योजनेला विलंब होत असल्याने ते त्यास जुमानत नाही. त्यांच्या सत्यप्रतिज्ञापत्रास अनुसरून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग योजना मार्गी लावू शकतात. अधिकारी कळकळीने काम करत नसल्याने योजना सुरूच झाल्या नसल्याची खंत कल्याण व भिवंडीच्या सदस्यांनी व्यक्त केली. या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे ६० ते ७० लाख खर्चाच्या विहिरी झाल्या नसल्याचे कैलास जाधव या सदस्याने सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले.पाणीटँकरची तिप्पट नोंदनवी मुुंबई परिसरातील १४ गावे जिल्हा परिषदेची आहेत. परंतु, त्यांना पाणीच मिळत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाई दूर होत नसल्याचा अनुभव असल्याचे सदस्यांनी वैतागून सांगितले. १९७०-७५ मध्ये बांधलेल्या पाझर तलावातून गावकऱ्यांना काही ठिकाणी पाणी मिळत आहे. पण, सध्या बांधलेल्या तलावातून, केटी बंधाºयातून पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी निकृष्ट दर्जाची कामे कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले. आताही टँकरने होणारा पाणीपुरवठा ही धूळफेक आहे. एक टँकर अर्धाअर्धा तीन पाड्यांमध्ये टाकला जात आहे आणि त्याची नोंद तीन टँकर म्हणून केली जाते.>शहापुरात १५ पैकी १० बोअरिंगना पाणीटँकरद्वारे आणलेले आठ हजार लीटर पाणी कोरड्या विहिरीत टाकताच त्यातील सहा हजार लीटर पाणी विहीर शोषून घेते. उर्वरित राहिलेले दोन हजार लीटर पाणी विहिरीतील गाळामुळे गढूळ होत असल्याचे वास्तव सदस्यांनी सभागृहात कथन केले. ज्येष्ठ सदस्या वंदना भांडे यांच्या गावात कृत्रिम पाणीटंचाई असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.ग्रामपंचायतीच्या कृपाशीर्वादाने पाइपलाइनवर अनधिकृत कनेक्शन केले आहे. यामुळे पाणी मिळत नसल्याने विकत घ्यावे लागत असल्याचेही भांडे यांनी सांगितले. शहापूर तालुक्यात १५ बोअरिंग लावल्या. त्यातील १० बोअरिंगला पाणी लागल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दोन ठिकाणी हातपंप बसवल्याचे सांगितले जात आहे.>या मुद्यांवर झाली चर्चाकेटी बंधारे, कोरड्या तलावातील गाळ काढून घेणे गरजेचे२०० फुटांची बोअरिंग मारल्यामुळे नाहक निधी खर्चफार्महाउसवाल्यांप्रमाणे ६०० फुटांवर बोअरिंला परवानगी द्यासदस्याच्या सांगण्यावरून टँकर सुरू होत नाही तर मंत्र्यांच्या भेटीनंतर टँकर सुरू होतो.पालकमंत्र्यांना भेटल्यानंतर टँकर सुरू केल्याची खंत