शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जमीन दानपत्रानंतरही पाणीयोजना रखडल्या, नवे केटी बंधारे मात्र कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:20 IST

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण आहेत. पाण्यासाठी सदस्यांना ग्रामस्थ धारेवर धरत आहेत.

ठाणे : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण आहेत. पाण्यासाठी सदस्यांना ग्रामस्थ धारेवर धरत आहेत. ‘लोकमत’नेही दुष्काळदाह मालिकेद्वारे जिल्ह्यातील पाणीटंचाईची भीषणता चव्हाट्यावर आणली आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी ठिकठिकाणच्या गावकऱ्यांनी जमिनी दान केलेल्या आहेत. तसे दानपत्रही दिले आहे. पण, निष्काळजीमुळे योजना मार्गी लागल्या नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. गावांमध्ये लावलेल्या बोअरिंगही फेल गेल्या. तज्ज्ञ असूनही हा खर्च निष्फळ जात असल्याची खंत सोमवारी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.भिवंडी, कल्याण, अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनांसाठी संबंधित जमीनमालकांनी जमिनीचे दानपत्र दिले आहेत. पण, योजनेला विलंब होत असल्याने ते त्यास जुमानत नाही. त्यांच्या सत्यप्रतिज्ञापत्रास अनुसरून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग योजना मार्गी लावू शकतात. अधिकारी कळकळीने काम करत नसल्याने योजना सुरूच झाल्या नसल्याची खंत कल्याण व भिवंडीच्या सदस्यांनी व्यक्त केली. या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे ६० ते ७० लाख खर्चाच्या विहिरी झाल्या नसल्याचे कैलास जाधव या सदस्याने सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले.पाणीटँकरची तिप्पट नोंदनवी मुुंबई परिसरातील १४ गावे जिल्हा परिषदेची आहेत. परंतु, त्यांना पाणीच मिळत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाई दूर होत नसल्याचा अनुभव असल्याचे सदस्यांनी वैतागून सांगितले. १९७०-७५ मध्ये बांधलेल्या पाझर तलावातून गावकऱ्यांना काही ठिकाणी पाणी मिळत आहे. पण, सध्या बांधलेल्या तलावातून, केटी बंधाºयातून पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी निकृष्ट दर्जाची कामे कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले. आताही टँकरने होणारा पाणीपुरवठा ही धूळफेक आहे. एक टँकर अर्धाअर्धा तीन पाड्यांमध्ये टाकला जात आहे आणि त्याची नोंद तीन टँकर म्हणून केली जाते.>शहापुरात १५ पैकी १० बोअरिंगना पाणीटँकरद्वारे आणलेले आठ हजार लीटर पाणी कोरड्या विहिरीत टाकताच त्यातील सहा हजार लीटर पाणी विहीर शोषून घेते. उर्वरित राहिलेले दोन हजार लीटर पाणी विहिरीतील गाळामुळे गढूळ होत असल्याचे वास्तव सदस्यांनी सभागृहात कथन केले. ज्येष्ठ सदस्या वंदना भांडे यांच्या गावात कृत्रिम पाणीटंचाई असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.ग्रामपंचायतीच्या कृपाशीर्वादाने पाइपलाइनवर अनधिकृत कनेक्शन केले आहे. यामुळे पाणी मिळत नसल्याने विकत घ्यावे लागत असल्याचेही भांडे यांनी सांगितले. शहापूर तालुक्यात १५ बोअरिंग लावल्या. त्यातील १० बोअरिंगला पाणी लागल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दोन ठिकाणी हातपंप बसवल्याचे सांगितले जात आहे.>या मुद्यांवर झाली चर्चाकेटी बंधारे, कोरड्या तलावातील गाळ काढून घेणे गरजेचे२०० फुटांची बोअरिंग मारल्यामुळे नाहक निधी खर्चफार्महाउसवाल्यांप्रमाणे ६०० फुटांवर बोअरिंला परवानगी द्यासदस्याच्या सांगण्यावरून टँकर सुरू होत नाही तर मंत्र्यांच्या भेटीनंतर टँकर सुरू होतो.पालकमंत्र्यांना भेटल्यानंतर टँकर सुरू केल्याची खंत