शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

आरतीचा रस्त्यात जीव गेल्यावरही रोहित तिच्यावर वार करतच होता; एकतर्फी प्रेमातून भयंकर घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 06:26 IST

प्रियकराने दिवसाढवळ्या केला हल्ला; मदत करण्याऐवजी लोकांनी केले चित्रीकरण.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसईच्या गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जाणाऱ्या २२ वर्षीय आरतीची प्रियकर रोहितने मंगळवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास भर रस्त्यात लोखंडी पान्याने १५ ते १६ वार करून निर्घृण हत्या केली. सहा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीच्या वागण्यावर रोहितला संशय होता. त्यांचा ब्रेकअप झाला होता. आरतीवर हल्ला होताना रस्त्यावरील लोक बघत होते. कोणीही या नराधम तरुणाला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. मदत करण्याऐवजी काहींनी या घटनेचे चित्रीकरण केले. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. तिच्या वागण्यावर संशय असल्याने दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यातून  रोहित रामनिवास यादव (वय २९) याने रागाच्या भरात आरती रामदुलार  यादव (वय २२) हिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

आरोपीने आरतीच्या डोक्यावर मागून लोखंडी पान्याने हल्ला केल्यामुळे ती रस्त्यात कोसळली. त्यानंतर तो तिच्यावर वार करीतच होता. मृत्यू झाल्यानंतरही तो तिच्यावर वार करतच होता.

तो मृतदेहाजवळ राहिला बसूनआरती जमिनीवर कोसळल्यानंतरही माथेफिरू रोहित तिच्यावर वार करीत होता. हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळच बसून होता. वालीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरतीचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठविला आहे. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्या मुलीला दुसरा मुलगा भेटल्याच्या संशयातून व रागाच्या भरात आरोपीने ही हत्या केल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.     - पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२

लोक बघ्याच्या भूमिकेत धक्कादायक म्हणजे, आरतीवर हल्ला होत असताना रस्त्यावरील अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. रस्त्यावर लोक येत-जात होते. अनेक जण गाड्या उभ्या करून पाहत होते, तर काहींनी या घटनेचे चित्रीकरणही केलेे. एका तरुणाने रोहितला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्याच्याकडे लोखंडी पान्हा रोखल्याने तो मागे हटल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. 

...तर आरतीचा जीव वाचला असता

आरती यादव हिचा मोबाइल तिचा प्रियकर रोहित यादव याने ८ जून रोजी फोडला होता. त्यानंतर हा वाद आचोळा पोलिस ठाण्यात पोहोचला होता, मात्र, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई न करता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यावेळीच योग्य कारवाई झाली असती तर आरतीचे प्राण वाचले असते, असा आरोप मृत आरतीची बहीण सानिका हिने केला आहे. 

ही घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सखोल तपास करून न्यायालयातसुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, या दृष्टीने निर्देश दिले आहेत.- देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री व उपमुख्यमंत्री 

"आम्ही कारवाई सुरू केली होती"

८ जूनला रात्री नालासोपारा येथील शिर्डीनगर परिसरात आरतीचा मोबाइल रोहितने फोडला होता. नुकसान भरून दे, असा आग्रह तिने धरला होता. तेव्हा रोहितने नकार दिल्यावर हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला, पण दोघांमध्ये प्रेमप्रकरण असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले नाही. त्याच रात्री आरती बहिणीसोबत पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आल्यावर तत्काळ गुन्हा दाखल केला होता. ९ जूनला सकाळी रोहितला बोलविण्यात आल्यावर तो हजर झाला होता. १२ वाजेच्या सुमारास आरती बहिणीसोबत पोलिस ठाण्यात आली. रोहितला पोलिसांनी खाक्या दाखविताच आरतीने पोलिसांना थांबविले. आमचे आम्ही मिटवून घेऊ, असे तिने सांगितले. तरी १४९ ची नोटीस देऊन कारवाई सुरू केली.- बाळासाहेब पवार,वरिष्ठ पोलिस निरीक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट