शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

स्वातंत्र्यानंतर पाऊणशे वर्षांतही जिल्ह्यातील २३ गावपाड्यांना ना रस्ता, ना वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विविध विकासात्मक घडामोडींत आघाडीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे म्हणजे ७५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : विविध विकासात्मक घडामोडींत आघाडीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे म्हणजे ७५ वर्षांत रस्ते, वीज, पाणी, आदी अत्यावश्यक सेवांचा आजही अभाव आहे. आजही शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांतील तब्बल २३ गावांत वीज या अत्यावश्यक सेवेसह रस्ते नसून, ही गावे कोणत्याही जवळच्या रस्त्यांना जोडली नसल्याचे आढळून आले आहे. येथील रहिवाशांना आजही जंगलातील पायवाटांमधून रस्ता काढून शहर गाठावे लागत आहे.

ठाणे जिल्हा चार हजार चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेला आहे. यात ३१ शहरांसह ४३० ग्रामपंचायती आहेत. देशात सर्वाधिक सहा महापालिकांचा जिल्हा. यात दोन नगरपरिषदा, दोन नगरपंचायती, आदी स्थानिक स्वराज्य संस्था विकासात्मक दृष्टीने जिल्हा आघाडीवर आहेत. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम राज्यातील सत्ता, देशाच्या राजकारणाला, सत्तेला हादरा देणारा आहे. मात्र, आज या जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी लोकवस्तीचे गावपाडे रस्त्यांसह वीज, पाणीपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित आहेत.

या गावपाड्यांना वीज, रस्ते व काही ठिकाणी पाण्याच्या अभावासह आरोग्य आणि वाहतूक सेवा तर या गावकऱ्यांच्या नशिबी आजपर्यंत नाही. देशाच्या ७५ वर्षांतील स्वातंत्र्यानंतर या सेवा व गरजा गावकरी, रहिवाशांचे स्वप्नच ठरल्या ‌‌‌‌‌असल्याचे उघडकीस आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महानगराला लागून ठाणे जिल्हा आहे. ऐतिहासिक कालखंडापासून ब्रिटिशांच्या सत्ताविस्ताराचा केंद्रबिंदू आणि आजही देशाच्या आणि राज्याच्या सत्तेवर अंकुश असलेल्या या जिल्ह्यातील गावपाडे त्यांना अत्यावश्यक सेवा व विकासाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या रस्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

-------