शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वातंत्र्यानंतर पाऊणशे वर्षांतही जिल्ह्यातील २३ गावपाड्यांना ना रस्ता, ना वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विविध विकासात्मक घडामोडींत आघाडीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे म्हणजे ७५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : विविध विकासात्मक घडामोडींत आघाडीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे म्हणजे ७५ वर्षांत रस्ते, वीज, पाणी, आदी अत्यावश्यक सेवांचा आजही अभाव आहे. आजही शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांतील तब्बल २३ गावांत वीज या अत्यावश्यक सेवेसह रस्ते नसून, ही गावे कोणत्याही जवळच्या रस्त्यांना जोडली नसल्याचे आढळून आले आहे. येथील रहिवाशांना आजही जंगलातील पायवाटांमधून रस्ता काढून शहर गाठावे लागत आहे.

ठाणे जिल्हा चार हजार चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेला आहे. यात ३१ शहरांसह ४३० ग्रामपंचायती आहेत. देशात सर्वाधिक सहा महापालिकांचा जिल्हा. यात दोन नगरपरिषदा, दोन नगरपंचायती, आदी स्थानिक स्वराज्य संस्था विकासात्मक दृष्टीने जिल्हा आघाडीवर आहेत. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम राज्यातील सत्ता, देशाच्या राजकारणाला, सत्तेला हादरा देणारा आहे. मात्र, आज या जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी लोकवस्तीचे गावपाडे रस्त्यांसह वीज, पाणीपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित आहेत.

या गावपाड्यांना वीज, रस्ते व काही ठिकाणी पाण्याच्या अभावासह आरोग्य आणि वाहतूक सेवा तर या गावकऱ्यांच्या नशिबी आजपर्यंत नाही. देशाच्या ७५ वर्षांतील स्वातंत्र्यानंतर या सेवा व गरजा गावकरी, रहिवाशांचे स्वप्नच ठरल्या ‌‌‌‌‌असल्याचे उघडकीस आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महानगराला लागून ठाणे जिल्हा आहे. ऐतिहासिक कालखंडापासून ब्रिटिशांच्या सत्ताविस्ताराचा केंद्रबिंदू आणि आजही देशाच्या आणि राज्याच्या सत्तेवर अंकुश असलेल्या या जिल्ह्यातील गावपाडे त्यांना अत्यावश्यक सेवा व विकासाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या रस्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

-------