शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

वालधुनी नदी प्राधिकरण स्थापन करा! श्रीकांत शिंदे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 00:23 IST

उल्हास आणि वालधुनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मिठी नदीच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कल्याण : उल्हास आणि वालधुनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मिठी नदीच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.खा. शिंदे यांनी ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी येणार असल्याचे आश्वासन दिले. डोंबिवलीतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव गुदमरत असल्याच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.उल्हास नदी ही राजमाचीच्या डोंगरातून उगम पावते. कर्जतपासूनच ही नदी प्रदूषित होत जाते. पुढे कल्याण खाडीपर्यंत तिच्या प्रदूषणाची कथा सुरूच राहते. ४८ लाख लोकांची तहान भागवणाऱ्या या नदीत प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात आहे. तसेच मलंगगडापासून उगम पावलेली वालधुनी नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. या नद्यांच्या विकासासाठी आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र समिती प्राधिकरणाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी खासदार शिंदे यांनी पर्यावरणमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी खासदार शिंदे यांनी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकवेळा पत्रव्यवहारही केला आहे.मिठी नदीच्या धर्तीवर वालधुनी नदी प्राधिकरण स्थापन करण्याचे आश्वासन २००५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिले होते. आघाडीचे सरकार त्यानंतर २०१४ पर्यंत होते.दहा वर्षांत आघाडी सरकार वालधुनी नदी प्राधिकरण स्थापन करू शकले नाही. मात्र, आता पुन्हा प्राधिकरणाची मागणी खासदार शिंदे यांनी उचलून धरली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत प्राधिकरण स्थापन होऊन प्रदूषण दूर होण्याच्या आशा पल्लवीतझालेल्या आहेत.डोंबिवलीतील प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाकडेही वेधले लक्षडोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. रासायनिक कारखान्यांतून सोडण्यात येणाºया वायू व जलप्रदूषणामुळे नागरिकांचा जीव कोंडला आहे. नुकत्याच रसायनाचे टॅँकर नाल्यात रिकामे केल्याच्या घटनांमुळे नागरिकांना त्रास झाला होता. प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित सरकारी यंत्रणांना तातडीने आदेश द्यावेत. होणारे प्रदूषण थांबविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदेAditya Thackreyआदित्य ठाकरे