शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हिरव्या देवाच्या यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 11:06 IST

Environment: काही संघटना ५ जूनला पर्यावरणदिनी मुरबाड तालुक्यात एका अगळ्या वेगळ्या ‘हिरव्या देवाच्या यात्रे’त एकवटल्या होत्या. यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा याची लज्जत  उपस्थितांनी चाखली. 

- आमाेद काटदरे(वरिष्ठ उपसंपादक) 

जंगलात ७० ते ८० फुटांच्या उंच झाडांखाली २०-२५ फुटांपर्यंत वाढणारी करवंदाची जाळी किंवा तत्सम वनस्पतींच्या आच्छादनामुळे जंगलाचे रक्षण होत होते. हरीण, उदमांजर, रानडुकरे, विविध लहान पक्षी, बिबटेही अशा जाळ्यांमध्ये लपतात. हरीण आणि पक्ष्यांचे करवंदे हे खाद्य आहे. परंतु, शेतालगत करवंदाची जाळी असल्यास रानडुकरांमुळे होणारे शेतीचे नुकसान किंवा बिबट्याच्या हल्ल्याची भीती यांमुळे करवंदाच्या जाळ्यांची छाटणी होऊ लागली. पर्यावरणाचा हा ऱ्हास रोखण्यासाठी, उपाय शोधण्यासाठी काही संघटना ५ जूनला पर्यावरणदिनीमुरबाड तालुक्यात एका अगळ्या वेगळ्या ‘हिरव्या देवाच्या यात्रे’त एकवटल्या होत्या. यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा याची लज्जत  उपस्थितांनी चाखली. 

निसर्गाशी आपले कृतज्ञतेचे नाते दृढ व्हावे, पुढच्या पिढ्यांसाठी निसर्गाचा हा ठेवा टिकावा, वाढावा, याकरिता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी-जंगलवासी वनहक्कधारक गावे दरवर्षी पर्यावरणदिनी हिरव्या देवाची यात्रा साजरी करतात. आदिवासी आजही उपजीविकेसाठी जंगल, शेती, सभोवतालच्या पर्यावरणावर अवलंबून आहेत. झाडे, फुले, पाने, माती आदी ते गरजेपुरते वापरतात. परंतु, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली किंवा नफेखोरीच्या हव्यासाने आपण निसर्गातील जीवसृष्टीकडे बाजारू वृत्तीने पाहत आहोत. गरेजेपक्षा अधिक ओरबाडत आहोत. त्याला पायबंद बसावा आणि निसर्गाबाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी या यात्रेची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली. गेली ११ वर्षे विविध गावांत होणाऱ्या या अनोख्या यात्रेत आदिवासींबरोबरच शहरी मंडळीही सहभागी होत आहेत. ही यात्रा आता एका व्यापक चळवळीत रूपांतरित होऊ पाहतेय.

यंदाही ५ जूनला श्रमिक मुक्ती संघटना, वननिकेतन, अश्वमेध प्रतिष्ठान आणि ‘इन्टॅक’ ठाणे चॅप्टर यांच्या सहकार्याने ही यात्रा मुरबाडच्या मोहवाडी (वैशाखरे) येथे उत्साहात साजरी झाली. दरवर्षीप्रमाणे आदिवासी महिलांसाठी रानभाज्या संकलन, त्यांच्या पाककृती स्पर्धा, पारंपरिक नृत्येस्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. मात्र यंदाची यात्रा प्रामुख्याने ‘करवंद’ या संकल्पनेवर आधारित होती, अशी माहिती श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे आणि ‘अश्वमेध’चे अविनाश हरड यांनी दिली. जंगलातील वणवे आण कुंपणासाठी होणारी करवंदाच्या जाळ्यांची तोड, यामुळे खालच्या स्तरातील जंगल नाहीसे झाल्याने पर्यावरणाची हानी झाली. पर्यावरणाच्या पुनर्स्थापनेसाठी अशा वनस्पतींची आवश्यकता आहे. ५० वर्षांपूर्वी मानद वन्यजीव रक्षक लालू दुर्वे यांनी करवंदांच्या जाळ्या कमी होत असल्याने पर्यावरणाच्या बिघडणाऱ्या संतुलनाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

जांभळाएवढी करवंदं मुरबाडमधील ऐतिहासिक सिद्धगड किल्ल्याच्या परिसरात जांभळाच्या आकाराएवढी करवंदे आढळतात. ती पिकल्यानंतरही हिरवीगार असतात. करवंदाच्या प्रजाती जतन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आदिवासी महिलांनी रानभाज्यांबरोबरच करवंदांचे अंबील, लोणचे, हिरव्या करवंदाची लसूण घालून केलेली भाजी, कढी, ठेचा, ज्यूस, अशा पौष्टिक पाककृती आणल्या होत्या. ज्यूस, लोणचे दीर्घकाळ टिकत असल्याने त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, याकडे आदिवासींचे लक्ष वेधण्यात आले. करवंदं तसेच काळू नदीवर आधारित सादर झालेली गाणी आणि लोकगीतांनी सर्वांचे मनोरंजन केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणmurbadमुरबाड