शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भिवंडीतील आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविले; बंगले, फार्महाऊस केले उद्ध्वस्त

By नितीन पंडित | Updated: February 26, 2024 17:46 IST

राहुर गावातील २३ भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबीयांना १९७८ साली शासनाने शेत जमिनीचे पट्टे नावे करून दिले होते.

भिवंडी : तालुक्यातील राहुर गावातील भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असून याबाबत श्रमजीवी संघटनेने केलेल्या पाठपुराव्या नंतर या जमिनीवरील बनविलेले बंगले ,फार्म हाऊस सोमवारी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली तोडण्यास सुरवात केली आहे.

राहुर गावातील २३ भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबीयांना १९७८ साली शासनाने शेत जमिनीचे पट्टे नावे करून दिले होते. कालांतराने स्थानिक धनदांडग्यांनी आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या जमिनी नाममात्र पैसे देऊन धाक दाखवून धनिकांनी कब्जा मध्ये घेतल्या होत्या.या जमिनींवर सर्वसुखसोयियुक्त फार्म हाऊस व बंगले, गॉट फार्म बनविण्यात आले होते.चावडी वाचन कार्यक्रमा दरम्यान ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थाक विवेक पंडित यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या जमिनींचा शोध घेतला असता त्यापैकी बहुसंख्य आदिवासी कुटुंबीय जमिनी नसल्याने बेघर झालेले असल्याचे समोर आहे.त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या आदिवासी कुटुंबीयांना त्यांच्या जमिनी परत करीत तसेच सातबारा दप्तरी नोंद केल्याचे दाखले देण्यात आले .त्यानंतर तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन,पोलिस वनविभाग यांच्या मदतीने या अतिक्रमण केलेल्या जमिनीवरील सर्व बांधकाम जमीनदोस्त केले आहे.

भूमिहीन आदिवासी समाजाला शासनाने दिलेल्या जमिनी परस्पर बळकावणाऱ्यांची माहिती चावडी वाचन कार्यक्रमा दरम्यान लक्षात आल्यानंतर जमिनीवरील अतिक्रमण लक्षात आले.त्याप्रकरणी शासन प्रशासन यांनी सर्व कागदपत्रे तपासून हे अतिक्रमण आज काढून टाकण्यास सुरवात केली आहे.या कारवाईमुळे या पुढे आदिवासी कुटुंबियांच्या जमिनी हडप करणाऱ्यांमध्ये  खळबळ उडाली असून २३ कुटुंबीयांना त्यांच्या जमिनी आज परत मिळणार आहेत.ही ऐतिहासिक कारवाई म्हणून ओळखली जाईल व यापुढे वनपट्टे धारकांच्या जमिनीवरील अतिक्रमण ही अशाच पद्धतीने उद्ध्वस्त केले जाईल त्यासाठी श्रमजीवी पाठपुरावा करणार अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी