शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:18 IST

भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल्याने तेथे कोंडी होत आहे. १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला असतानाही त्याचे काटेकोर पालन केले जात नाही.

- धीरज परबमीरा रोड  - भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल्याने तेथे कोंडी होत आहे. १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला असतानाही त्याचे काटेकोर पालन केले जात नाही.छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा रस्ता थेट उत्तन - चौक व गोराई - मनोरीपर्यंत जातो. तर याच मार्गावर पुढे शिवसेना गल्ली नाका येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग सुरु होतो. शिवसेना गल्ली नाका या मुख्य जंक्शन पासून थेट बावन जिनालय, जैन मंदिरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमाणे पुढे अग्निशमन दल केंद्र व पुढे ९० फुटी मार्गाच्या नाका परिसरापर्यंत हे अतिक्रमण आहे. या शिवाय अनेक दुकानदारांनी पदपथ बळकावला आहे. या ठिकाणी सम - विषम पार्किंग झोन जाहीर केले असले तरी त्याचे सर्रास उल्लंघन करत दोन्ही बाजूला पार्किंग केले जाते.शिवसेना नाका ते बावन जिनालयपर्यंत तर फेरीवाल्यांनी धुमाकूळ घातला असून हा संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. मध्यंतरी महापालिकेने रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे आखून फेरीवाल्यांना बसण्यासाठी दिले होते. पण त्या पट्यांना देखील फेरीवाल्यांनी काळं फासत रस्त्यावर बस्तान बसवले आहे. हे फेरीवाले रात्रीही आपल्या गाड्या, बाकडे तेथेच ठेवतात. मध्यंतरी पालिकेने या बाकड्यांवर कारवाई केली होती. पण पुढे थांबवण्यात आली.वास्तविक या ठिकाणी जुने गणेश मंदिर, बावन जिनालय, डॉन बॉस्को शाळा आदी अनेक धार्मिक स्थळे, रुग्णालये आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या सर्व क्षेत्राच्या १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशांना देखील पालिका व संबंधितांनी केराची टोपली दाखवत फेरीवाल्यांना पाठिशी घालण्याचे काम चालवले आहे.महापालिकेकडूनही फेरीवाल्यांसह अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर ठोस कारवाई केलीच जात नाही. फेरीवाल्यांसह बाजार वसुली करणारा पालिका कंत्राटदाराचे सत्ताधारी व प्रशासनाशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. फेरीवाल्यांवर कारवाई केली तर कंत्राटदाराचे मोठे नुकसान होते. तसेच यात संबंधितांना देखील तोटा होत असल्याने धडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे.कारवाईबाबत संबंधित यंत्रणा दाखवतात एकमेकांकडे बोटेअतिक्रमण करणाºयांविरोधात फौजदारी कारवाईची तरतूद आहे. पण पालिका व पोलीस गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी करतात.वाहतूक पोलीस देखील या कोंडीला कारणीभूत ठरणाºया बाबी लेखी स्वरुपात मांडून कारवाई करत नाही.लोकप्रतिनिधी, प्रशासन, वाहतूक पोलीस े रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतूककोंडी दूर करण्याऐवजी निव्वळ एकमेकांकडे बोटे दाखवून हात झटकत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या