शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:18 IST

भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल्याने तेथे कोंडी होत आहे. १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला असतानाही त्याचे काटेकोर पालन केले जात नाही.

- धीरज परबमीरा रोड  - भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल्याने तेथे कोंडी होत आहे. १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला असतानाही त्याचे काटेकोर पालन केले जात नाही.छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा रस्ता थेट उत्तन - चौक व गोराई - मनोरीपर्यंत जातो. तर याच मार्गावर पुढे शिवसेना गल्ली नाका येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग सुरु होतो. शिवसेना गल्ली नाका या मुख्य जंक्शन पासून थेट बावन जिनालय, जैन मंदिरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमाणे पुढे अग्निशमन दल केंद्र व पुढे ९० फुटी मार्गाच्या नाका परिसरापर्यंत हे अतिक्रमण आहे. या शिवाय अनेक दुकानदारांनी पदपथ बळकावला आहे. या ठिकाणी सम - विषम पार्किंग झोन जाहीर केले असले तरी त्याचे सर्रास उल्लंघन करत दोन्ही बाजूला पार्किंग केले जाते.शिवसेना नाका ते बावन जिनालयपर्यंत तर फेरीवाल्यांनी धुमाकूळ घातला असून हा संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. मध्यंतरी महापालिकेने रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे आखून फेरीवाल्यांना बसण्यासाठी दिले होते. पण त्या पट्यांना देखील फेरीवाल्यांनी काळं फासत रस्त्यावर बस्तान बसवले आहे. हे फेरीवाले रात्रीही आपल्या गाड्या, बाकडे तेथेच ठेवतात. मध्यंतरी पालिकेने या बाकड्यांवर कारवाई केली होती. पण पुढे थांबवण्यात आली.वास्तविक या ठिकाणी जुने गणेश मंदिर, बावन जिनालय, डॉन बॉस्को शाळा आदी अनेक धार्मिक स्थळे, रुग्णालये आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या सर्व क्षेत्राच्या १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशांना देखील पालिका व संबंधितांनी केराची टोपली दाखवत फेरीवाल्यांना पाठिशी घालण्याचे काम चालवले आहे.महापालिकेकडूनही फेरीवाल्यांसह अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर ठोस कारवाई केलीच जात नाही. फेरीवाल्यांसह बाजार वसुली करणारा पालिका कंत्राटदाराचे सत्ताधारी व प्रशासनाशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. फेरीवाल्यांवर कारवाई केली तर कंत्राटदाराचे मोठे नुकसान होते. तसेच यात संबंधितांना देखील तोटा होत असल्याने धडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे.कारवाईबाबत संबंधित यंत्रणा दाखवतात एकमेकांकडे बोटेअतिक्रमण करणाºयांविरोधात फौजदारी कारवाईची तरतूद आहे. पण पालिका व पोलीस गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी करतात.वाहतूक पोलीस देखील या कोंडीला कारणीभूत ठरणाºया बाबी लेखी स्वरुपात मांडून कारवाई करत नाही.लोकप्रतिनिधी, प्रशासन, वाहतूक पोलीस े रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतूककोंडी दूर करण्याऐवजी निव्वळ एकमेकांकडे बोटे दाखवून हात झटकत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या