शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:18 IST

भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल्याने तेथे कोंडी होत आहे. १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला असतानाही त्याचे काटेकोर पालन केले जात नाही.

- धीरज परबमीरा रोड  - भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल्याने तेथे कोंडी होत आहे. १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला असतानाही त्याचे काटेकोर पालन केले जात नाही.छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा रस्ता थेट उत्तन - चौक व गोराई - मनोरीपर्यंत जातो. तर याच मार्गावर पुढे शिवसेना गल्ली नाका येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग सुरु होतो. शिवसेना गल्ली नाका या मुख्य जंक्शन पासून थेट बावन जिनालय, जैन मंदिरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमाणे पुढे अग्निशमन दल केंद्र व पुढे ९० फुटी मार्गाच्या नाका परिसरापर्यंत हे अतिक्रमण आहे. या शिवाय अनेक दुकानदारांनी पदपथ बळकावला आहे. या ठिकाणी सम - विषम पार्किंग झोन जाहीर केले असले तरी त्याचे सर्रास उल्लंघन करत दोन्ही बाजूला पार्किंग केले जाते.शिवसेना नाका ते बावन जिनालयपर्यंत तर फेरीवाल्यांनी धुमाकूळ घातला असून हा संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. मध्यंतरी महापालिकेने रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे आखून फेरीवाल्यांना बसण्यासाठी दिले होते. पण त्या पट्यांना देखील फेरीवाल्यांनी काळं फासत रस्त्यावर बस्तान बसवले आहे. हे फेरीवाले रात्रीही आपल्या गाड्या, बाकडे तेथेच ठेवतात. मध्यंतरी पालिकेने या बाकड्यांवर कारवाई केली होती. पण पुढे थांबवण्यात आली.वास्तविक या ठिकाणी जुने गणेश मंदिर, बावन जिनालय, डॉन बॉस्को शाळा आदी अनेक धार्मिक स्थळे, रुग्णालये आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या सर्व क्षेत्राच्या १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशांना देखील पालिका व संबंधितांनी केराची टोपली दाखवत फेरीवाल्यांना पाठिशी घालण्याचे काम चालवले आहे.महापालिकेकडूनही फेरीवाल्यांसह अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर ठोस कारवाई केलीच जात नाही. फेरीवाल्यांसह बाजार वसुली करणारा पालिका कंत्राटदाराचे सत्ताधारी व प्रशासनाशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. फेरीवाल्यांवर कारवाई केली तर कंत्राटदाराचे मोठे नुकसान होते. तसेच यात संबंधितांना देखील तोटा होत असल्याने धडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे.कारवाईबाबत संबंधित यंत्रणा दाखवतात एकमेकांकडे बोटेअतिक्रमण करणाºयांविरोधात फौजदारी कारवाईची तरतूद आहे. पण पालिका व पोलीस गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी करतात.वाहतूक पोलीस देखील या कोंडीला कारणीभूत ठरणाºया बाबी लेखी स्वरुपात मांडून कारवाई करत नाही.लोकप्रतिनिधी, प्रशासन, वाहतूक पोलीस े रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतूककोंडी दूर करण्याऐवजी निव्वळ एकमेकांकडे बोटे दाखवून हात झटकत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या