शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

स्वत:बरोबर इतरांनाही व्यवसाय करण्यास प्रोत्साहन करावे - मराठी उद्योजकांचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 16:21 IST

मनविसेचे ठाणो शहर अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी तरु णांनी उद्योजक व्हावे या हेतूने ठाणो शहरातील मराठी यशस्वी उद्योजकांमार्फत नवीन तसेच स्वत: व्यवसाय करणा:या मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देमराठी माणसाने उत्तमातोत्म व्यवसाय करावामार्गदर्शन शिबिराचे आयोजनअमित ठाकरे देखील उपस्थित

ठाणे : मराठी माणूस हा चांगला उद्योजक घडला पाहिजे. मराठी माणसाने उत्तमातोत्म व्यवसाय करावा. तुम्ही स्वत: व्यवसाय करा आणि तुमच्या मित्रांनाही व्यवसाय करण्यास प्रोत्साहन द्या असा सल्ला मराठी उद्योजकांनी मराठी तरुणांना दिला. यावेळी त्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, ती टिकली पाहिजे, आपल्या मातृभाषेला कमी समजू नका असाही कानमंत्र दिला. या कार्यक्रमाला अमित ठाकरे देखील उपस्थित होते. मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी तरु णांनी उद्योजक व्हावे यासाठी शहनाई हॉलमध्ये मंगळवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

      लोकमत, ठाणेचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणाले की, मराठी भाषेवरचे प्रेम हे भ्रष्टाचाराविरोधी लढाई सारखे आहे. मराठी भाषा दिन सोडला तर त्याव्यतिरिक्त आपण किती मराठीचा वापर करतो असा सवाल उपस्थित करीत ते म्हणाले की, आपण मराठी बद्दल प्रेमाने बोलतो पण कृती करीत नाही. मराठी माणसाने मराठी माणसालाच प्राधान्य दिले पाहिजे. जोपर्यंत मराठी भाषा ही ज्ञानाची, पोट भरण्याची भाषा होत नाही तोपर्यंत तिला महत्त्व प्राप्त होत नाही. मराठी व्यावसायिकांनी त्यांचा निधी मराठी भाषेसाठी काम करणाºया संस्थांना देण्याचे आवाहन प्रधान यांनी केले. जोपर्यंत समाजातून भाषा विकास होणार नाही, इंग्रजीला पयार्यी शब्द निर्माण होणार नाही तोपर्यंत भाषा विकसीत होणार नाही असेही ते म्हणाले. मराठी भाषेचा दिवस साजरा करणे म्हणजे काव्यवाचन, साहित्यिक कार्यक्रम यापलिकडे काही कार्यक्रम करावे हे मानले जात नाही अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे आनंद भंडारे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, १३ हजार मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मराठी भाषा जगली पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांनी मराठी शाळा टिकली पाहिजे यासाठी आग्रह धरावा. स्वत:बरोबर आपल्या मित्रांनाही व्यवसाय करण्यास उद्युक्तकरा, व्यवसाय करताना रिस्क ही घेतलीच पाहिजे असे सांगत शेअर मार्केट तज्ञ शशांक रावले यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. ठाणे जनता सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश उतेकर म्हणाले की, व्यवसाय करण्यासाठी बिझनेस प्लॅनिंग असणे महत्त्वाचे आहे. बँकेतून कर्ज घ्यायला घाबरु नका, कर्ज घेतल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. कर्ज हे स्वत:च्या पैशापेक्षा जास्त स्वस्त असते. बँकांमध्ये कर्जाच्या सवलती आहेत त्याचा लाभ घ्या असे मार्गदर्शन त्यांनी केले. मनसे, महाराष्ट्र राज्य सचिव प्रमोद पाटील म्हणाले की, उद्योजक होणे याच्यात ज्या यातना आहे त्या यातनांचा विचार करुनच मराठी माणसाला भिती वाटते. परंतू उत्तमोत्तम व्यवसाय करा असा सल्ला त्यांनी दिला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नंदकुमार पावस्कर यांनी स्वानुभव सांगत मार्गदर्शन केले.राजभाषा चित्रपटाचे ज्ञानेश्वर मर्गज म्हणाले की, मराठी राजभाषा दिन ३६५ दिवस असतो, आजचा दिवस हा जागतिक मराठी राजभाषा दिन आहे. मराठी भाषेची चळवळ ती त्या भाषेची ताकद काय आहे हे सांगून वाढते. मराठी भाषेची आपल्याला गरज आहे तिला आपली गरज नाही. मराठी माणूस मरेल पण मराठी भाषा मरणार नाही. मातृभाषा डोळ््यांनी वाचायला शिकविते. छत्रपती शिवाजी महाराज हे उद्योगपती होते, त्यांचा आदर्श डोळ््यांसमोर ठेवा. मराठी भाषा जिवंत आहे आणि ती जिवंत राहील. कवी आदित्य दवणे म्हणाले की, व्यवसायात संधी साधू असणे महत्त्वाचे आहे. सर्व उद्योजक एकत्र आले तर मराठी शाळांना जीवनदान मिळेल. यावेळी हॉटेल मालक किरण भिडे, औषध व्यावसायीक संजय धनावडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, वृत्तपत्र व्यावसायिक, पत्रकार निखिल बल्लाळ व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेbusinessव्यवसाय