शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
5
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
6
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
7
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
8
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
10
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
11
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
12
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
13
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
14
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
15
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
16
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
17
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
18
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
19
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
20
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

मध्य रेल्वे ठप्प झाल्याने नोकरदार घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:00 IST

पावसामुळे बसला फटका : एसटी बस धावल्या रिकाम्या, लोकलच नसल्याने डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळी शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मुंबई व उपनगरांत मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे रुळांमध्ये पाणी साचल्याने मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यानची लोकलसेवा बुधवारी कोलमडून पडली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना बुधवारी कामावर जाता आले नाही. सकाळी पावसाचा जोर कमी होत नसल्याने अत्यावश्यक सेवावगळता मुंबईतील अन्य कार्यालयांना सुटी देण्यात आली. दुसरीकडे सुरक्षिततेच्या कारणामुळे अनेकांनी प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा घरीच राहणे पसंत केले.

पावसामुळे लोकलसेवेवर परिणाम झाल्याची माहिती मध्य रेल्वेने सकाळी लवकरच टिष्ट्वट करून प्रवाशांना दिली होती. शीव, मशीद आणि अन्यत्र सखल भागांमध्ये पाणी साचल्याने ठाणे-मुंबई सेवा बंद करण्यात आली. तसेच ठाणे-कल्याण, कसारा, कर्जत मार्गांवर अनिश्चित कालावधीत विशेष लोकल चालवण्यात आल्या. मात्र, त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. सकाळी नेहमीप्रमाणे डोंबिवली स्थानकात नोकरदार आले होते. मात्र, मुंबईकडे जाण्यसाठी लोकल नसल्याने त्यांनी घरची वाट धरली.

डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकातून खासगी कंपन्यांमधील कामगारांसाठी एसटी व अन्य महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस सुटतात. मात्र, बुधवारी त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाल्याने बस रिकाम्याच धावल्याचे दिसून आले. प्रवासी नसल्याने रिक्षा व्यवसायावरही परिणाम झाला. त्यामुळे पावसात ताटकळत राहण्यापेक्षा अनेक रिक्षाचालकांनी घरची वाट धरली. दुपारनंतर बाजारातही तुरळक गर्दी दिसून आली. व्यापाऱ्यांनी आवराआवर, हिशेबतपासणी करत दुकाने बंद केली.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणामच्मध्य रेल्वेने मनमाड येथून येणारी आणि मुंबईहून जाणारी विशेष एक्स्प्रेस रद्द केली. तसेच एलटीटी-गुवाहाटी आणि मुंबई-लखनऊ, मुंबई-बंगळुरू या विशेष गाड्यांचे वेळापत्रक रिशेड्युल केल्याची माहिती टिष्ट्वटद्वारे जाहीर केली.च्मध्य रेल्वेच्या मध्यरात्रीपर्यंत ३५४ लोकलफेºया होतात. मात्र, मंगळवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे पहाटेपासून मुंबईत लोकल धावल्याच नाहीत, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे लोकल सुरू झाल्याच नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. बहुतांश विशेष लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द, वेळापत्रक बदलून चालवल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊसcentral railwayमध्य रेल्वे