शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे ठप्प झाल्याने नोकरदार घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:00 IST

पावसामुळे बसला फटका : एसटी बस धावल्या रिकाम्या, लोकलच नसल्याने डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळी शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मुंबई व उपनगरांत मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे रुळांमध्ये पाणी साचल्याने मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यानची लोकलसेवा बुधवारी कोलमडून पडली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना बुधवारी कामावर जाता आले नाही. सकाळी पावसाचा जोर कमी होत नसल्याने अत्यावश्यक सेवावगळता मुंबईतील अन्य कार्यालयांना सुटी देण्यात आली. दुसरीकडे सुरक्षिततेच्या कारणामुळे अनेकांनी प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा घरीच राहणे पसंत केले.

पावसामुळे लोकलसेवेवर परिणाम झाल्याची माहिती मध्य रेल्वेने सकाळी लवकरच टिष्ट्वट करून प्रवाशांना दिली होती. शीव, मशीद आणि अन्यत्र सखल भागांमध्ये पाणी साचल्याने ठाणे-मुंबई सेवा बंद करण्यात आली. तसेच ठाणे-कल्याण, कसारा, कर्जत मार्गांवर अनिश्चित कालावधीत विशेष लोकल चालवण्यात आल्या. मात्र, त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. सकाळी नेहमीप्रमाणे डोंबिवली स्थानकात नोकरदार आले होते. मात्र, मुंबईकडे जाण्यसाठी लोकल नसल्याने त्यांनी घरची वाट धरली.

डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकातून खासगी कंपन्यांमधील कामगारांसाठी एसटी व अन्य महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस सुटतात. मात्र, बुधवारी त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाल्याने बस रिकाम्याच धावल्याचे दिसून आले. प्रवासी नसल्याने रिक्षा व्यवसायावरही परिणाम झाला. त्यामुळे पावसात ताटकळत राहण्यापेक्षा अनेक रिक्षाचालकांनी घरची वाट धरली. दुपारनंतर बाजारातही तुरळक गर्दी दिसून आली. व्यापाऱ्यांनी आवराआवर, हिशेबतपासणी करत दुकाने बंद केली.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणामच्मध्य रेल्वेने मनमाड येथून येणारी आणि मुंबईहून जाणारी विशेष एक्स्प्रेस रद्द केली. तसेच एलटीटी-गुवाहाटी आणि मुंबई-लखनऊ, मुंबई-बंगळुरू या विशेष गाड्यांचे वेळापत्रक रिशेड्युल केल्याची माहिती टिष्ट्वटद्वारे जाहीर केली.च्मध्य रेल्वेच्या मध्यरात्रीपर्यंत ३५४ लोकलफेºया होतात. मात्र, मंगळवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे पहाटेपासून मुंबईत लोकल धावल्याच नाहीत, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे लोकल सुरू झाल्याच नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. बहुतांश विशेष लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द, वेळापत्रक बदलून चालवल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊसcentral railwayमध्य रेल्वे