शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

मीरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य कायम; पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:40 PM

नागरिक, वाहनचालक त्रस्त, वाहने झाली खिळखिळी, अनेकांना कंबर, पाठदुखीचा त्रास

मीरा रोड : काशिमीरा येथे खड्ड्याने बळी घेतल्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था आहे. पालिकेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असले, तरी बहुसंख्य खड्डे कायम आहेत. त्यामुळे नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत.पावसाळ्यात मीरा-भार्इंदरमधील डांबरी रस्ते पूर्णपणे खड्ड्यांत गेले होते. पालिकेने भरपावसात पॅचवर्कची कामे केल्याने ते पॅचवर्कही पावसाने धुऊन काढले. त्यामुळे पॅचवर्कचे काही कोटी वाया गेल्याचा आरोप होत आहे. मुळात डांबरी रस्ता बनवताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. चांगल्या दर्जाचे डांबर व बांधकाम साहित्य वापरले जात नाही. रस्त्यांचा समतोल राखला जात नाही. विविध कामांसाठी खोदकाम केल्यानंतर केले जाणारे पॅचवर्कही थातूरमातूर असते. टेंडर आणि टक्केवारी या निकृष्ट आणि दर्जाहीन कामास कारणीभूत असल्याचे आरोप व तक्रारी सातत्याने होत आहेत.खड्ड्यांमुळे नागरिक तसेच वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. अपघाताचा धोका तसेच नागरिकांना कंबर, पाठ, मानदुखीचा विकार बळावतो. वाहनांचा खुळखुळा होऊन नुकसान होते ते वेगळेच. यंदाही खड्ड्यांमुळे काशिमीरा येथे तरुणाचा बळी गेला होता. तर, महापौर मॅरेथॉनसाठीच्या मार्गावर रातोरात खड्डे भरणाऱ्या पालिका आणि सत्ताधाऱ्यांना शहरातील अन्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवावेसे वाटले नाहीत, यावरून टीकेची झोड उठली होती. पावसाळा यंदा लांबला असतानाच मधल्या काळात खड्डे भरण्यासाठी टाकलेली खडी निघाल्याने नागरिकांना आणखीनच त्रास झाला. परंतु, पावसाळा गेला असला तरी शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य मात्र कायम आहे. खड्डेही खोल व मोठे असल्याने अपघाताची भीती कायम आहे. दुचाकीस्वारांना तर खड्डे सांभाळून वाहन चालवणे जिकिरीचे बनले आहे. महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले असले, तरी मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पालिकेचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.यंदा पावसाळा लांबल्याने खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. आम्हीदेखील सतत तक्रारी केल्या असून आता पालिकेने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. तरीही खड्डे अजूनही आहेत ही वस्तुस्थिती आहे. शहरातील सर्व खड्डे लवकरात लवकर भरून नागरिकांना दिलासा द्यावा.- नीला सोन्स, नगरसेविकामीरा-भार्इंदर महापालिकेतील टेंडर-टक्केवारीचे आरोप गंभीर असून शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था हा त्याचा बोलका पुरावा मानायला हवा. त्यातूनच निकृष्ट आणि अतांत्रिक दर्जाची कामे होत असल्याने खड्डे यावेळी मोठ्या प्रमाणात पडले आहेत. कामांचा दर्जा सुधारा आणि अर्थपूर्ण हेतूने चालणारा हस्तक्षेप थांबवून त्वरित खड्डे भरण्यात यावेत.- शंकर वीरकर, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना