शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ मिशन फाइलबंद!

By admin | Updated: April 24, 2017 02:24 IST

केंद्र शासनाने एएमआरयुटी म्हणजे ‘अमृत मिशन’ प्रकल्प सुमारे दोन वर्षांपूर्वी लागू केला. त्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिकांनी पाणीपुरवठा

सुरेश लोखंडे / ठाणे केंद्र शासनाने एएमआरयुटी म्हणजे ‘अमृत मिशन’ प्रकल्प सुमारे दोन वर्षांपूर्वी लागू केला. त्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिकांनी पाणीपुरवठा, मल:निस्सारण, नागरी वाहतूक, उद्यान विकास आदी सुमारे तीन हजार ३१२ कोटींचे प्रकल्प प्रस्तावित केले. पण हे प्रकल्प अद्याप केवळ फाईलमध्येच आहेत. या प्रकल्पांचे काम युध्दपातळीवर सुरू होणे अपेक्षित असतानाही त्याला गती मिळालेली नाही. नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र शासनाने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात अमृत मिशन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या महापालिका, कुळगांव-बदलापूर नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरण (एमजेपी) यांनी तीन हजार ३३१२ कोटी २६ लाख रूपये खर्चाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव दिले. यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करून ते पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु या यंत्रणांकडून त्यासाठी फारशा हालचालीच होत नसल्याची बाब दिशा समितीच्या निदर्शनास आली आहे.त्यामुळेच या प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या हालचाली समितीने सुरू केल्या आहेत. या अमृत मिशनमध्ये देशातील मोजक्याच ५०० शहरांचा समावेश आहे. त्यात राज्यातील ४३ शहरे आहेत. ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका, एक नगरपालिका आणि एमजेपीचा त्यात समावेश आहे. अमृत मिशनव्दारे ठाणे महापालिकेने एक हजार ६६९ कोटीं रूपये खर्चाचे तीन प्रकल्प प्रस्तावित केल. त्यात सर्वाधिक एक हजार ३८ कोटीं खर्चाचा पाणीपुरवठा, तर ६३० कोटींचा मलनि:स्सारण प्रकल्प आणि एक कोटीचे उद्यान आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ८९७ कोटीचे पाच प्रकल्प हाती घेतलेले आहेत. यामध्ये २७ गावांच्या पाणी पुरवठ्यासह ३३ जलकुंभ बांधले जाणार आहेत. यावर ३९९ कोटीं खर्च होणार आहे, तर १३४ कोटींच्या मलनि:स्सारण प्रकल्पाचा समावेश आहे. कल्याणच्या सहा सेक्टरसह डोंबिवलीतील चार आणि टिटवाळ्यातील दोन सेक्टरमध्ये मलनि:स्सारणाची ही योजना राबविली जाणार आहे. अस्तित्वातील मलनि:स्सारण योजनांच्या दुरूस्तीवर २२२ कोटी खर्च होणार आहे. शहाड ते टिटवाळादरम्यान मोहने, मोहिली व बल्याणी भागातील सध्याच्या मलनि:स्सारणावर १४२ कोटी खर्चाचे नियोजन आहे. या प्रकल्पांसह डोंबिवलीच्या एकतानगर, आयरे येथे उद्यान विकास, तसेच कल्याणच्या तेजपालनगरमध्ये देखील तीन बगीचे विकसित होणार आहेत. नवी मुंबई महापालिकेचा सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प आहे. भिवंडी महापालिकेने २९३ कोटी १३ लाख रूपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे, तर एक कोटी ३६ लाखांचा हरित क्षेत्र विकास, हाळा तलाव व काटई डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लागवडीचा प्रकल्प आहे. कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेने ३३७ कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प सादर केला आहे. एमजेपीने पूरक अंबरनाथ पाणीपुरवठा प्रकल्पाच्या ५१ कोटी ६७ लाखांच्या, तर कुळगांव - बदलापूर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या ६२ कोटी ६८ लाखांच्या खर्चास तांत्रिक मंजुरी घेतल्याचे आढळून आले आहे.