शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

इलेक्शन आठवणी : गेले ते दिन गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:33 IST

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता.

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे स.गो. बर्वे हे दोनवेळा विजयी झाले. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे मुकुंदराव आगासकर हे त्यावेळच्या जनसंघाचे उमेदवार तिसऱ्यांदा जेव्हा रिंगणात उतरले, तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर एक घोषणा रंगवली होती. ‘मुकुंदा, मुकुंदा पडणार कितींदा एकदा, दोनदा की तीनदा?’ बर्वे विजयी झाल्यावर काँग्रेसची मंडळी कल्याणमधून त्यांची शोभायात्रा काढायचे कारण हा परिसर जनसंघाचा बालेकिल्ला मानला जायचा. याच मतदारसंघातून शिवसेनेने लष्करातील पहिले भारतीय जनरल करिअप्पा यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्यांनी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’चा नारा दिला असताना कानडी करिअप्पांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने जनसंघाच्या मंडळींना सेनेला डिवचण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे भिंतीवर घोषणा रंगली की, ‘मराठी माणसाच्या मारता गप्पा, आता कशाला हवा करिअप्पा’. याच करिअप्पा यांच्या मिरवणुकीत एक गडबड झाली होती. त्यामुळे ठाण्याचे तत्कालीन डीसीपी लोणे यांनी लाठीमार करून गडबड करणाऱ्यांना चोप दिला होता. तेव्हा कल्याणमध्ये चर्चा झाली होती की, लोणेसाहेब, मारायचे तर काठीला लोणी लावून तरी झोडायचे. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रंगवलेली घोषणा अशीच कल्पक व चिरकाळ स्मरणात राहील, अशी होती. वा रे इंदिरा तेरा खेल, सस्ता बेवडा, महंगा तेल... त्यावेळी खाद्यतेल महाग होती आणि दिवाळीत तेल गायब होत असे. ते टंचाईचे दिवस आता उरले नाहीत. भिंती रंगवून निवडणुका लढणे राहिले नाही आणि अशा कल्पकतेचे कार्यकर्तेही उरले नाहीत.

टॅग्स :Electionनिवडणूक