शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

इलेक्शन आठवणी : गेले ते दिन गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:33 IST

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता.

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे स.गो. बर्वे हे दोनवेळा विजयी झाले. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे मुकुंदराव आगासकर हे त्यावेळच्या जनसंघाचे उमेदवार तिसऱ्यांदा जेव्हा रिंगणात उतरले, तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर एक घोषणा रंगवली होती. ‘मुकुंदा, मुकुंदा पडणार कितींदा एकदा, दोनदा की तीनदा?’ बर्वे विजयी झाल्यावर काँग्रेसची मंडळी कल्याणमधून त्यांची शोभायात्रा काढायचे कारण हा परिसर जनसंघाचा बालेकिल्ला मानला जायचा. याच मतदारसंघातून शिवसेनेने लष्करातील पहिले भारतीय जनरल करिअप्पा यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्यांनी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’चा नारा दिला असताना कानडी करिअप्पांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने जनसंघाच्या मंडळींना सेनेला डिवचण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे भिंतीवर घोषणा रंगली की, ‘मराठी माणसाच्या मारता गप्पा, आता कशाला हवा करिअप्पा’. याच करिअप्पा यांच्या मिरवणुकीत एक गडबड झाली होती. त्यामुळे ठाण्याचे तत्कालीन डीसीपी लोणे यांनी लाठीमार करून गडबड करणाऱ्यांना चोप दिला होता. तेव्हा कल्याणमध्ये चर्चा झाली होती की, लोणेसाहेब, मारायचे तर काठीला लोणी लावून तरी झोडायचे. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रंगवलेली घोषणा अशीच कल्पक व चिरकाळ स्मरणात राहील, अशी होती. वा रे इंदिरा तेरा खेल, सस्ता बेवडा, महंगा तेल... त्यावेळी खाद्यतेल महाग होती आणि दिवाळीत तेल गायब होत असे. ते टंचाईचे दिवस आता उरले नाहीत. भिंती रंगवून निवडणुका लढणे राहिले नाही आणि अशा कल्पकतेचे कार्यकर्तेही उरले नाहीत.

टॅग्स :Electionनिवडणूक