शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्शन आठवणी : गेले ते दिन गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:33 IST

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता.

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे स.गो. बर्वे हे दोनवेळा विजयी झाले. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे मुकुंदराव आगासकर हे त्यावेळच्या जनसंघाचे उमेदवार तिसऱ्यांदा जेव्हा रिंगणात उतरले, तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर एक घोषणा रंगवली होती. ‘मुकुंदा, मुकुंदा पडणार कितींदा एकदा, दोनदा की तीनदा?’ बर्वे विजयी झाल्यावर काँग्रेसची मंडळी कल्याणमधून त्यांची शोभायात्रा काढायचे कारण हा परिसर जनसंघाचा बालेकिल्ला मानला जायचा. याच मतदारसंघातून शिवसेनेने लष्करातील पहिले भारतीय जनरल करिअप्पा यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्यांनी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’चा नारा दिला असताना कानडी करिअप्पांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने जनसंघाच्या मंडळींना सेनेला डिवचण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे भिंतीवर घोषणा रंगली की, ‘मराठी माणसाच्या मारता गप्पा, आता कशाला हवा करिअप्पा’. याच करिअप्पा यांच्या मिरवणुकीत एक गडबड झाली होती. त्यामुळे ठाण्याचे तत्कालीन डीसीपी लोणे यांनी लाठीमार करून गडबड करणाऱ्यांना चोप दिला होता. तेव्हा कल्याणमध्ये चर्चा झाली होती की, लोणेसाहेब, मारायचे तर काठीला लोणी लावून तरी झोडायचे. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रंगवलेली घोषणा अशीच कल्पक व चिरकाळ स्मरणात राहील, अशी होती. वा रे इंदिरा तेरा खेल, सस्ता बेवडा, महंगा तेल... त्यावेळी खाद्यतेल महाग होती आणि दिवाळीत तेल गायब होत असे. ते टंचाईचे दिवस आता उरले नाहीत. भिंती रंगवून निवडणुका लढणे राहिले नाही आणि अशा कल्पकतेचे कार्यकर्तेही उरले नाहीत.

टॅग्स :Electionनिवडणूक