शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एकलव्य गौरव पुरस्काराचे आज होणार वितरण; दिलीप प्रभावळकर यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:13 IST

बिकट परिस्थितीत शैक्षणिक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव

ठाणे : समता विचार प्रसारक संस्था आयोजित २८ वा वार्षिक एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्र म उद्या रविवारी, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा. संस्थेच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पहाता येईल. झूम मिटींगच्या स्वरु पात होणाºया या कार्यक्रमात, ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ सहभागी होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर आहेत, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष मनिषा जोशी यांनी दिली.

समाजात विविध प्रश्नांवर सातत्याने काम करणारी आणि ठाणे शहरातील परीघरेषेवर असणाºया दुर्बल घटकांविषयी कळवळा असणारी व कार्य करणारी समता विचार प्रसारक संस्था आहे. एकलव्य गौरव पुरस्कार ही संस्थेची दुसरी ओळख आहे. १९९२ पासून गोरगरीब वस्तीतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संस्था काम करीत आहे. परिस्थितीशी झगडत शालान्त परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचा ‘एकलव्य गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो.

शाळेच्या वेळे व्यतिरिक्त घराला हातभार लावणारी ही १४-१५ वयोगटांतील मुले जेव्हा स्पर्धात्मक परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करायला निघतात, तेव्हा गुणवत्ता यादीत ९०-९५ टक्के मार्क मिळवणाºया विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागेच पडतात. क्लासला जाणे परवडत नाही. शिक्षण साहित्य अपुरे. घरात अभ्यासाला जागा नाही. शैक्षणिक वातावरण नाही. अशा परिस्थितीत या मुलांनी मिळवलेले ३५-४० टक्के गुण देखील ९० टक्क्यांच्या तोलामोलाचे असतात, असे जोशी म्हणाल्या.

संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून ‘एकलव्य सक्षमीकरण योजना’ सुरु केली. ही योजना ठाणे महापालिकेच्या उथळसर, मानपाडा, कळवा आणि सावरकर नगर या माध्यमिक शाळांच्या मदतीने आखण्यात आली. घराच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितील मुलांसाठी गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी या विषयांकरिता शनिवार-रविवारी जादा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली. व्यक्तिमत्व विकासासाठी आय. पी. एच. या संस्थेच्या मदतीने अभ्यासपूरक व्याख्याने, क्र ीडास्पर्धा, तसेच येऊर येथे संस्कार शिबिरे आयोजित केली गेली. त्यामुळे मुलांच्या मनावरील ताणतणाव कमी झाला.

मुलांच्या शिक्षणाकरिता आई, आजीचा पुढाकार

औद्योगिकीकरणाच्या रेट्यात किंवा कोरोना महामारीच्या संकटात आई-वडिलांना नोकरीधंदा नाही, रोजंदारीवर काम करणारे पालक, कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत. या समस्यांचा सामना करता येत नाही म्हणून व्यसनाधीन झालेली कुटुंबे पाहायला मिळतात. एकट्या बाईवर घर चालवण्याची वेळ येते. आपल्या वाट्याला जे आले ते मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून झटणाºया आई, आजी यांच्या कथा ऐकून मन हेलावल्याशिवाय राहत नाही.

‘वंचितांचा रंगमंच’मुळे लाभले व्यासपीठ

गेली सहा वर्षे कै. रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘वंचितांचा रंगमंच’ या उपक्र मात ही मुले सहभागी होत आहेत. नाट्यजल्लोष कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या उत्कटतेने मांडत आहेत. व्यसनाधीन पालक, आईची ओढाताण, मुला-मुलींवर होणारा अन्याय नाटिकांतून सादर करीत आहेत. यामुळे या वंचित मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय.