शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

रविवारी दिलीप प्रभावळकरांच्या हस्ते एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:36 IST

समता विचार प्रसारक संस्था गेली २७ वर्षे ठाण्यातील लोकवस्तीतील हुशार व होतकरू मुलांसाठी एकलव्य गौरव पुरस्कार हा उपक्रम चालवीत आहे.

ठाणे : घरातील अत्यंत प्रतिकूल आर्थिक, सामाजिक परिस्थितीशी झगडत, केवळ जिद्द, मेहेनत आणि चिकाटीच्या जोरावर परिश्रम घेऊन १० वीच्या परीक्षेचा महत्वाचा शैक्षणिक टप्पा यशस्वीपणे पार करणार्‍या एकलव्य मुलांचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्यात सुलभ मार्गक्रमणास शुभेच्छा देण्यासाठी, समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने येत्या रविवारी ६ सप्टेंबरला सायं. ६ वा. २८वा वार्षिक एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रम घेण्यात येणार असून तेव्हा मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी सुप्रसिद्ध जेष्ठ कलाकार आणि संवेदनशील लेखक मा. दिलीप प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. झूम मेळाव्यात होणार्‍या या कौतुक सोहळ्याला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे आणि ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी मा. राजेश कंकाळ हे ही उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या जेष्ठ कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर असणार आहेत. हा कार्यक्रम समता विचार प्रसारक संस्थेच्या फेसबूक पेजवर लाईव्ह पाहता येईल. या कार्यक्रमाच्या झूम लिंकसाठी ७७३८२१४३५१ किंवा ७७३८१८९०४३ या नंबरांवर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेच्या सह सचिव अनुजा लोहार यांनी केले आहे.   

समता विचार प्रसारक संस्था गेली २७ वर्षे ठाण्यातील लोकवस्तीतील हुशार व होतकरू मुलांसाठी एकलव्य गौरव पुरस्कार हा उपक्रम चालवीत आहे. अतिशय हलाखीची परिस्थिति, खूप छोटे पत्र्याचे घर, अभ्यासाला जागा नाही, शाळेव्यतिरिक्त घरखर्चाला हातभार म्हणून काम करावे लागते, शिक्षण साहित्य अपुरे, शिक्षणाचे वातावरण नाही, पैशाअभावी क्लास लावणे जमत नाही अशा सर्व प्रतिकूल परिस्थितिवर मात करत जेव्हा ही मुले कष्टाने शालांत परीक्षा पास होतात तेव्हा त्यांचे कमी गुण सुद्धा उच्च वर्गातील मुलांच्या ८० – ८५ टक्के गुणांइतक्याच मोलाचे असतात. संस्थेतर्फे एकलव्य सक्षमीकरण उपक्रमांतर्गत ठाणे महानगर पालिकांच्या शाळांतील अशा वंचित मुलांना ९ वी इयत्तेतच निवडून त्यांना १० वीत गणित, इंग्लिश, विज्ञान, मराठी अशा विषयांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या आयपीएच संस्थेकडून खास व्याख्याने घेतली जातात. त्याच बरोबर संस्थेतर्फे चालणार्‍या पुस्तक पेढी, समता संस्कार शिबीर, क्रिडास्पर्धा, ईद – दीपावली स्नेह संमेलन, सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला, नाट्यजल्लोष आदि सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांना सामील करून घेतले जाते त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्यांना चांगले विचार ऐकण्यास मिळतात, त्यांच्या सर्वांगिण विकासाला दिशा मिळते आणि त्यांची सामाजिक जाण वाढीस लागते.

एकलव्य सक्षमीकरण योजनेतील मुलांचे उत्कृष्ट निकालया वर्षी ठाणे महानगर पालिकेच्या कळवा, मानपाडा, शाळा नं. १८ आणि कळवा रात्र शाळा या शाळांमध्ये मुलांना एकलव्य सक्षमीकरणाखाली मार्गदर्शन करण्यात आले. योजना राबविलेल्या शाळांमधील, योजनेत सामील विद्यार्थ्यांपैकी 95% विद्यार्थी यंदा यशस्वी झाले.  एकूण ४५ मुलांना फर्स्ट क्लास मिळाला असून एका मुलीला ९० % हून अधिक तर ९ मुलांना ८० टक्क्यांच्यावर मार्क्स मिळाले आहेत. कळव्याच्या शाळेतील राहुल माने हा मुलगा ७६ टक्के मिळवून शाळेत पहिला आला आहे. या मुलाच्या घरी माकडाचे खेळ करून घर चालवतात, अशी माहिती एकलव्य सक्षमीकरण योजनेच्या संयोजक लतिका सु. मो. यांनी दिली. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांच्या विदारक आर्थिक सामाजिक स्थिती विषयी सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले की, १७ विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील किंवा दोघेही हयात नाहीत, ८ विद्यार्थी स्वतःच दहावीत शिकत असतांना काम करीत, स्वतःचा छोटा व्यवसाय करणारे पालक ११ जण आहेत, ५९ पालक मोल मजुरी करणारे आहेत, ४३ विद्यार्थ्यांची आई घर काम करते, १४ पालक सफाई कामगार, १२ जणांचे वडील रिक्षा ड्राइवर तर ८ जणांचे वडील वॉचमन आहेत.

एकलव्यांना शैक्षणिक मदतीसाठी एकलव्य दत्तक योजनाकोविडच्या काळात या मुलांच्या घरची परिस्थिती आणखीनच बिघडली. कुटुंबाची जी काही तुटपुंजी मिळकत होती ती ही थांबली. अशा वेळी संस्थेने मोफत रेशन पुरवून या कुटुंबांची मदत केली. या कठीण आर्थिक संकटामुळे या मुलांच्या पुढील शिक्षणाचे भवितव्यही अंधारून आले आहे. यासाठी संस्थेने थेट शैक्षणिक निधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एकलव्य दत्तक योजना सुरू केली आहे. होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे ही आजच्या काळाची गरज आहे. संवेदनशील नागरिकांनी तसेच संस्थेच्या हितचिंतकांनी एकलव्य गौरव पुरस्कार हा कार्यक्रम संस्थेच्या फेसबूक पेजवर नक्की बघावा आणि एकलव्यांना उदारहस्ते मदत करावी असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी, सचिव हर्षलता कदम, विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ आणि जगदीश खैरालिया यांनी केले आहे. 

टॅग्स :Dilip Prabhavalkarदिलीप प्रभावळकर