शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

आठ तासांच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:57 IST

उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.

कुमार बडदे मुंब्रा : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या मुंब्रा येथील नागरिकांना प्रवासाकरिता आठ तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे. या प्रवासामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याने ते कमालीचे त्रस्त झाले आहेत. रेल्वेने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची सुविधा दिली आहे. उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.सध्या सुरू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत फक्त अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्यांनाच प्रवास करण्याची सवलत दिली आहे. यामुळे मुंबईतील विविध भागांमधील दुकाने तसेच इतर खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या मुंब्रा-कौसा परिसरातील हजारो कर्मचारी तसेच व्यावसायिक यांना रेतीबंदर येथील चौकातून सुटणाºया बेस्टच्या बसने प्रवास करावा लागत आहे. बेस्टची मार्ग क्रमांक ४९४ ही बस मुंबईतील घाटकोपर बसडेपो पर्यंत धावते. या बसची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे सकाळी बससाठी अर्धा ते एक किलोमीटर रांग लागते. बस सुटण्याच्या ठिकाणी निवाºयाची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना भर पावसात दीड ते दोन तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. यामध्ये महिला, वृद्ध आणि मुलांची आबाळ होते. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.>बससाठी दोनदा रांग लावण्याची येते वेळबेस्ट बसने विक्रोळी तसेच घाटकोपरपर्यंत प्रवास केल्यानंतर इच्छितस्थळी जाण्यासाठी पुन्हा दुसºया बसने प्रवास करावा लागतो. त्यासाठी पुन्हा दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागते. परतीच्या प्रवासातही हाच द्राविडी प्राणायाम करावा लागतो. यामुळे प्रवासासाठी दररोज आठ तास खर्च करावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासात वेळ खर्च होत असल्याने त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होत असल्याची तक्रार मोहम्मद साजिद आणि मोहम्मद अब्बासी या प्रवाशांनी ‘लोकमत’कडे केली.