शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भिवंडीत रस्त्यावरील मुलांसाठी शिक्षणाची गाडी सुरू

By नितीन पंडित | Updated: March 10, 2023 19:14 IST

भिवंडी :दि.१०- शासन शिक्षणबाह्य मुलांना शालेय वातावरणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असतानाही अनेक स्थलांतरीत मजुरांची मुले शाळेपासून दूर असल्याने ...

भिवंडी :दि.१०- शासन शिक्षणबाह्य मुलांना शालेय वातावरणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असतानाही अनेक स्थलांतरीत मजुरांची मुले शाळेपासून दूर असल्याने महिला व बाल कल्याण विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथक शाळा सुरू करण्यात आली आहे. भिवंडीत शहरातील कामतघर अंजुरफाटा रस्त्यावरील झोपडपट्टीत श्री साई सेवा संस्था अध्यक्षा डॉ स्वाती सिंह यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या शिक्षणाची गाडी या शाळेचा शुभारंभ शुक्रवारी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या प्रसंगी जिल्हा महिला विकास व संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी,समाजसेवक विराज पवार,श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती सिंह,बिहार झारखंड सेवा समिती मुंब्राचे एम आय खान ,गायत्री परिवारचे उपेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

स्थलांतरीत मजुरांच्या वस्तीतील मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांना सर्वप्रथम समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे त्यासाठी शिक्षण गरजेचे असून शासन योजना बनवीत असली तरी त्यासाठी सेवाभावी संस्थांनी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी केले .रस्त्यावरील शाळा बाह्य मुलांची जिल्ह्यात शासना तर्फे शोधमोहीम घेतली.त्यांमध्ये जिल्ह्यात १९७६ तर भिवंडी शहरात सुमारे ४५० मुले आढळून आल्याने महिला व बालविकास विभागाने ही संकल्पना जिल्ह्यात राबविली आहे .मुंब्रा,ठाणे व भिवंडी शहरात बस मध्ये बनविण्यात आलेल्या फिरते पथक या वर्गखोलीत शिक्षण दिले जाणार आहे .भिवंडीत गुरुवार,शुक्रवार,शनिवार या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत झोपडपट्टीत येऊन विध्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी दिली.भिवंडी येथील या उपक्रमा श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती सिंह यांनी पुढाकार घेतला आहे.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडी