शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चेणे येथील लक्ष्मी नदीवर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामास इको सेन्सेटिव्ह झोन समितीची परवानगी

By धीरज परब | Updated: March 16, 2024 19:45 IST

लक्ष्मी नदीवर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट द्वारे सौंदर्यीकरण करून पर्यटनाचे केंद्र विकसित करावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे चालवलेल्या पाठपुराव्या नंतर सदर प्रकल्पास व ५० कोटी निधीला सरकारने मान्यता दिली.

मीरारोड -  गुजरातच्या  साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलमेंटच्या धर्तीवर घोडबंदर मार्गवरील चेणे येथील लक्ष्मी नदीवर रिव्हर वॉटरफ्रंट डेव्हलमेंटच्या कामास पर्यावरण संवेदनशील क्षेत्र सनियंत्रण समितीची परवानगी मिळाली आहे. ५० कोटींचा खर्च असलेल्या प्रकल्पाला याआधीच राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. यामुळे निसर्गाच्या कुशीत नदीचे सौंदर्यीकरण सह पर्यटनाला चालना मिळणार असून महाराष्ट्र राज्यातील हा पहिला रिव्हर डेव्हलपमेंट प्रकल्प ठरणार आहे. 

लक्ष्मी नदीवर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट द्वारे सौंदर्यीकरण करून पर्यटनाचे केंद्र विकसित करावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे चालवलेल्या पाठपुराव्या नंतर सदर प्रकल्पास व ५० कोटी निधीला सरकारने मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये निधी महापालिकेकडे वर्ग करण्याचा शासन निर्णय झाला. 

महानगरपालिकेने वन विभागाकडे इकोसेन्सेटिव्ह झोनची परवानगी मागितली असता ठाणे वन विभागाच्या उप वनसंरक्षक यांनी महापालिकेला पत्र पाठवून समितीने परवानगी दिल्याचे कळवले.  नदीचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया महापालिकेने आधीच केली आहे. इको सेन्सेटिव्ह झोनची परवानगी मिळाल्याने आता रिव्हर फ्रंट विकासाचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहेअशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली.

नदी किनारा विकास असा होणार

नदीवर पावसाळ्यात अनेक जण निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येतात.  किनाऱ्यावर पायऱ्या बनवल्या जातील,  पर्यटकांना फिरण्यासाठी बसण्याची सोय असेल. आकर्षक लायटिंगपर्यावरणाचा विचार करून गार्डन असे निसर्ग सुख पर्यटकांना अनुभवता येईल.  लक्ष्मी नदी ठाणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे हा रिव्हर फ्रंट विकसित झाल्यास मीरा भाईंदरच्याच नव्हे तर ठाणेमुंबईच्या नागरिकांना देखील आनंद घेता येईल . चेणेच्या ह्या लक्ष्मी नदीच्या परिसरात पूर्वी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे शुटींग झाले आहे.  पर्यटक  वाढल्यास  स्थानिक आदिवासीआगरी व इतर भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे आ . सरनाईक यांनी सांगितले .