शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मेळघाटातील इको-फ्रेण्डली राख्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:04 IST

बांबू, बिया आणि रेशीम यांचा वापर करून पूर्णपणे इको-फ्रेण्डली राख्या नूतन ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत.

- जान्हवी मोर्येकल्याण : बांबू, बिया आणि रेशीम यांचा वापर करून पूर्णपणे इको-फ्रेण्डली राख्या नूतन ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. वापर केल्यानंतर हीच राखी कुंडीत टाकली, तर त्यामध्ये वापरलेल्या बिया रुजतील आणि निसर्गाचे देणे निसर्गालाच परत मिळेल, असे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.बांबू केंद्र लवादा मेळघाट आणि नूतन ज्ञानमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक राख्या बनवण्याची सृष्टीबंध कार्यशाळा शाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे राख्या बनवल्या. तृप्ती गोडसे आणि रूपाली हर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. मुलांनी आपल्या सुप्तगुणांचा वापर करून वैविध्यपूर्ण राख्या तयार केल्या. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमधील गुणांना विकासाची संधी देणारी एक पर्वणीच ठरली. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे यांनी केले. शिक्षकांनीही राख्या बनवण्याचा आनंद घेतला.सध्या बाजारात उपलब्ध राख्यांमधील ८० ते ९० टक्के राख्या या चीनमधून आलेल्या आहेत. या राख्या आपण खरेदी करतो. त्याऐवजी आपल्या आदिवासीबांधवांनी तयार केलेल्या राख्या विकत घेतल्या, तर त्यांना दोन पैसे मिळतील. त्यांची प्रगती साधली जाईल, या उद्देशाने नूतन ज्ञानमंदिर विद्यालयाने हे पाऊल उचलले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणपूरक राख्यांचा प्रचार आणि प्रसार करावा, हाच यामागील उद्देश आहे.या राख्यांमध्ये काचेचे मणी, वनस्पतीच्या बिया, बांबू आणि रेशीम या घटकांचा वापर केला आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या या राख्यांमध्ये चिनी मणी किंवा कोणत्याही कृत्रिम वस्तूंचा वापर केला नाही.नागरिकांनी जपावी सामाजिक बांधीलकीमेळघाटातील लवादा गावातील आदिवासी या राख्या तयार करतात. हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. मेळघाट आणि कुपोषण यांचे नाते सर्वश्रुत आहे. या आदिवासीबांधवांकडे उपजत कलागुण आहेत. त्यांची एक कला, कल्पना आणि भावविश्व आहे.आदिवासी बांधवांनी त्यांची कला हजारो वर्षांपासून जपली आहे. योग्य संधीअभावी त्याचे रूपांतर व्यावसायिकतेत झालेले नाही. सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी आदिवासी बांधवांच्या या कलेला बाजारपेठ उपलब्ध करून दिली.आदिवासींना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा व कुपोषणाची समस्या समूळ नष्ट व्हावी, हा त्यांचा प्रयत्न आहे. नागरिकांनी या कार्यास सामाजिक बांधीलकी म्हणून हातभार लावणे गरजेचे आहे, असे आवाहन शाळेने केले आहे.

टॅग्स :RakhiराखीMelghatमेळघाट