शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

मेळघाटातील इको-फ्रेण्डली राख्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:04 IST

बांबू, बिया आणि रेशीम यांचा वापर करून पूर्णपणे इको-फ्रेण्डली राख्या नूतन ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत.

- जान्हवी मोर्येकल्याण : बांबू, बिया आणि रेशीम यांचा वापर करून पूर्णपणे इको-फ्रेण्डली राख्या नूतन ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. वापर केल्यानंतर हीच राखी कुंडीत टाकली, तर त्यामध्ये वापरलेल्या बिया रुजतील आणि निसर्गाचे देणे निसर्गालाच परत मिळेल, असे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.बांबू केंद्र लवादा मेळघाट आणि नूतन ज्ञानमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक राख्या बनवण्याची सृष्टीबंध कार्यशाळा शाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे राख्या बनवल्या. तृप्ती गोडसे आणि रूपाली हर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. मुलांनी आपल्या सुप्तगुणांचा वापर करून वैविध्यपूर्ण राख्या तयार केल्या. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमधील गुणांना विकासाची संधी देणारी एक पर्वणीच ठरली. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे यांनी केले. शिक्षकांनीही राख्या बनवण्याचा आनंद घेतला.सध्या बाजारात उपलब्ध राख्यांमधील ८० ते ९० टक्के राख्या या चीनमधून आलेल्या आहेत. या राख्या आपण खरेदी करतो. त्याऐवजी आपल्या आदिवासीबांधवांनी तयार केलेल्या राख्या विकत घेतल्या, तर त्यांना दोन पैसे मिळतील. त्यांची प्रगती साधली जाईल, या उद्देशाने नूतन ज्ञानमंदिर विद्यालयाने हे पाऊल उचलले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणपूरक राख्यांचा प्रचार आणि प्रसार करावा, हाच यामागील उद्देश आहे.या राख्यांमध्ये काचेचे मणी, वनस्पतीच्या बिया, बांबू आणि रेशीम या घटकांचा वापर केला आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या या राख्यांमध्ये चिनी मणी किंवा कोणत्याही कृत्रिम वस्तूंचा वापर केला नाही.नागरिकांनी जपावी सामाजिक बांधीलकीमेळघाटातील लवादा गावातील आदिवासी या राख्या तयार करतात. हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. मेळघाट आणि कुपोषण यांचे नाते सर्वश्रुत आहे. या आदिवासीबांधवांकडे उपजत कलागुण आहेत. त्यांची एक कला, कल्पना आणि भावविश्व आहे.आदिवासी बांधवांनी त्यांची कला हजारो वर्षांपासून जपली आहे. योग्य संधीअभावी त्याचे रूपांतर व्यावसायिकतेत झालेले नाही. सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी आदिवासी बांधवांच्या या कलेला बाजारपेठ उपलब्ध करून दिली.आदिवासींना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा व कुपोषणाची समस्या समूळ नष्ट व्हावी, हा त्यांचा प्रयत्न आहे. नागरिकांनी या कार्यास सामाजिक बांधीलकी म्हणून हातभार लावणे गरजेचे आहे, असे आवाहन शाळेने केले आहे.

टॅग्स :RakhiराखीMelghatमेळघाट