शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पर्यावरणपुरक बसेसमधून आरामदाई प्रवासाची ठाणेकरांना हुलकावणी, ठेकेदारानेच गुंडाळला इथेनॉईल बसेसचा गाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:08 IST

ठाणेकरांना पर्यावरण पुरक आरामदाई प्रवास देण्याच्या ठाणे परिवहन सेवेच्या इथेनॉईल बसेसला अखेर ब्रेक लागला आहे. ज्या ठेकेदाराकडून या बसेसेची अपेक्षा धरण्यात आली होती. त्यानेच आता गाशा गुंडाळल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठळक मुद्दे१०० बसेस होणार होत्या दाखलपालिका शोधणार नवा पर्याय

ठाणे - ठाणे महापालिकेने आता इलेक्ट्रीक बसपाठोपाठ इथेनॉईलवर चालणाऱ्या बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच १०० इथेनॉईलवर चालणाºया बसेसचे कंत्राट देण्याचा घाट पालिकेतील काही मंडळीकडून सुरु होता. या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अखेर या ठेकेदारानेच या बसेसचा गाशा गुंडाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाणेकरांना या बसेसच्या बदल्यात दुसरा पर्याय काय द्यायचा याचा विचार आता सुरु झाला आहे.                   ठाणे महापालिकेच्या परिवहनच्या सेवेत जेएनएनयुआरएम अंतर्गत टप्याटप्याने २३० बसेस दाखल झाल्यात. शिवाय येत्या काळात १०० इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार असून त्यातील पहिली बस काही दिवसांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या महिन्याचा पालिकेचा हिस्सासुध्दा संबधींत ठेकेदाराने पालिकेला दिला आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत टप्याटप्याने उर्वरीत ९९ बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेससोबतच पालिकेने १०० इथेनॉईलवर धावणाºया बसेस घेण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. या बसेस पर्यावरणाला साजेशा असून त्यामुळे प्रदुषण कमी होणार आहे. शिवाय इंधनाची बचत होणार आहे. प्रवाशांना देखील या बसेसमधून आरामधाई प्रवासाची हमी पालिकेने दिली होती. त्यानुसार पीपीपी तत्वावर या बसेस घेतल्या जाणार होत्या. पालिकेला या बसेसच्या उत्पन्नातून काहीही नफा मिळणार नाही. त्यामुळे पालिका या बसेसवर जाहीराती करुन त्या पोटी मिळणारे उत्पन्न आपल्या तिजोरीत टाकणार होते. त्यानुसार मागील दिवाळीपर्यंत ५० बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. या बसेसचा रुटही घोडबंदर ते ठाणे आणि मुलुंड या मार्गावर धावणार होत्या.                     परंतु आता ज्या ठेकेदाराकडून या बसेस येणार होत्या. त्या ठेकेदारानेच आता यातून काढता पाय घेत गाशा गुंडाळल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. अचानक ठेकेदाराने माघार का घेतली याचे उत्तर मात्र पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. परंतु या बसेसचे कंत्राट ठराविक किंवा आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावे म्हणून पालिकेतील काही अधिकाºयांनी फिल्डींग लावली होती. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु ज्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट घातला जात होता. त्याच्या विरोधात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्याने त्याने यातून माघार घेतली होती. त्यामुळे पालिकेने पुन्हा फेरनिविदाही काढल्या होत्या. ज्या निविदाकाराने कंत्राट भरलेच नव्हते. त्यालाच हे काम देण्याचा घाटही घातला जात होता. त्यानंतर पुन्हा त्याच ठेकेदारासाठी नव्याने फिल्डींग लावली गेली होती.परंतु आता सर्व सोपास्कार झाल्यानंतर आता ठेकेदारानेच या बसेसबाबत अनास्था दाखविली असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. शिवाय सुरवातीला जी काही रक्कम भरावी लागते, ती रक्कम सुध्दा अद्याप संबधींत ठेकेदाराने भरलेली नाही. त्यामुळे जवळ जवळ पर्यावरण पुरक बसेस पाहण्याचे स्वप्न मात्र आता भंगल्यात जमा आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त