शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कचऱ्यात फेकलेल्या भाज्या खाऊन भरताहेत पोट, कचरावेचक महिलांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 00:22 IST

दोनवेळचे जेवण कसेबसे मिळवायचे, यासाठी रोजंदारीवर काम करणारा कामगारवर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षांकडून अन्नधान्य, जेवणवाटप केले जात होते.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : कचºयात फेकलेली भाजी घरी आणून स्वच्छ धुऊन घेतो आणि तीच शिजवून भातासोबत खातो. घरात फक्त दोन किलो तांदूळ आहे. आजूबाजूच्या लोकांचेदेखील असेच हाल आहेत. ज्याच्या घरात जे असेल ते एकमेकांना देत दिवस ढकलत आहोत. घरात अठरा विश्व दारिद्रय म्हणजे काय असते, त्याची जाणीव या लॉकडाऊनने करून दिली, अशी व्यथा कचरावेचक महिला तुळसा भोसले हिने ‘लोकमत’कडे मांडली. हातावर पोट असणाºया इतर कष्टकरीवर्गानेही लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडल्याची खंत व्यक्त केली आहे.दोनवेळचे जेवण कसेबसे मिळवायचे, यासाठी रोजंदारीवर काम करणारा कामगारवर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षांकडून अन्नधान्य, जेवणवाटप केले जात होते. परंतु, अनलॉकनंतर पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यावर अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे घरेलू कामगार, रिक्षाचालक व इतर कष्टकरीवर्गाने सांगितले. अनलॉकमध्ये रिक्षा चालवायला सुरुवात केली. थोडे पैसे आले तेवढ्यात पुन्हा लॉकडाऊन केले आणि आमची पुरती निराशा झाली, असे रिक्षाचालकांनी सांगितले.अद्याप घरकामासाठी कोणत्याही घरमालकाने बोलाविले नाही, सुरुवातीला काही कुटुंबांनी पगार दिला, पण आता तोही बंद झाला आहे, अशी व्यथा घरकाम करणाºया महिलांनी व्यक्त केली.कचरावेचक महिला लॉकडाऊनमध्ये कचरा वेचायला जातात आणि तो घरी आणून साठवून ठेवतात. लॉकडाऊन संपले की, हा कचरा विकून येणाºया पैशात संसाराचा गाडा हाकणार असल्याचे त्या म्हणाल्या. कचरा उचलायला जाताना कचºयात भाज्या फेकून दिलेल्या असतात, मग त्याच घरी आणून शिजवतो. पोटापाण्यासाठी वणवण भटकावेच लागते. आता कोणी मदत देत नाही, आम्ही तर मदत देण्याचे आवाहन करणारा फलक पण लावला आहे. एकमेकांना साथ देत आयुष्याची गाडी पुढे ढकलत आहोत, असे कचरावेचक तुळसा भोसले आणि पारू राठोड यांनी सांगितले.मुलींच्या शिक्षणाची फी सध्या भरू शकत नाहीमी लॉकडाऊनपासून घरी आहे, मी स्वयंपाकाची काम करते, पण लॉकडाऊनपासून कोणी बोलवत नाही. कोणी आमचे फोनही उचलत नाहीत. सध्या चहाचपाती खाऊन दिवस काढत असल्याचे दुर्गा वाघमारे यांनी सांगितले.मी नऊ घरची कामे करत होते. लॉकडाऊनमुळे सध्या ती बंद आहेत. सुरुवातीला एक महिना मला पगार दिला, पण त्यानंतर फक्त आता एका घरातून पगार सुरू आहे.घराची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मुलींच्या शिक्षणाची फी देखील भरू शकत नाही, मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे, असे जयश्री पडवळ यांनी सांगितले.उधारीवर चाललेय घरअनलॉक सुरू झाला तेव्हा १० ते १२ दिवस रिक्षा चालवली. पण, लॉकडाऊनमुळे पुन्हा काम बंद झाले. सध्या माझे घर उधारीवर चालत आहे, असे रिक्षाचालक भाऊसाहेब पवार यांनी सांगितले. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात मदत येत होती, पण त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आणि अनेकांना मदत मिळणेही बंद झाले आहे. लॉक-अनलॉकमुळे गरीबवर्गाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

टॅग्स :thaneठाणे