शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात फेकलेल्या भाज्या खाऊन भरताहेत पोट, कचरावेचक महिलांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 00:22 IST

दोनवेळचे जेवण कसेबसे मिळवायचे, यासाठी रोजंदारीवर काम करणारा कामगारवर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षांकडून अन्नधान्य, जेवणवाटप केले जात होते.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : कचºयात फेकलेली भाजी घरी आणून स्वच्छ धुऊन घेतो आणि तीच शिजवून भातासोबत खातो. घरात फक्त दोन किलो तांदूळ आहे. आजूबाजूच्या लोकांचेदेखील असेच हाल आहेत. ज्याच्या घरात जे असेल ते एकमेकांना देत दिवस ढकलत आहोत. घरात अठरा विश्व दारिद्रय म्हणजे काय असते, त्याची जाणीव या लॉकडाऊनने करून दिली, अशी व्यथा कचरावेचक महिला तुळसा भोसले हिने ‘लोकमत’कडे मांडली. हातावर पोट असणाºया इतर कष्टकरीवर्गानेही लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडल्याची खंत व्यक्त केली आहे.दोनवेळचे जेवण कसेबसे मिळवायचे, यासाठी रोजंदारीवर काम करणारा कामगारवर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षांकडून अन्नधान्य, जेवणवाटप केले जात होते. परंतु, अनलॉकनंतर पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यावर अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे घरेलू कामगार, रिक्षाचालक व इतर कष्टकरीवर्गाने सांगितले. अनलॉकमध्ये रिक्षा चालवायला सुरुवात केली. थोडे पैसे आले तेवढ्यात पुन्हा लॉकडाऊन केले आणि आमची पुरती निराशा झाली, असे रिक्षाचालकांनी सांगितले.अद्याप घरकामासाठी कोणत्याही घरमालकाने बोलाविले नाही, सुरुवातीला काही कुटुंबांनी पगार दिला, पण आता तोही बंद झाला आहे, अशी व्यथा घरकाम करणाºया महिलांनी व्यक्त केली.कचरावेचक महिला लॉकडाऊनमध्ये कचरा वेचायला जातात आणि तो घरी आणून साठवून ठेवतात. लॉकडाऊन संपले की, हा कचरा विकून येणाºया पैशात संसाराचा गाडा हाकणार असल्याचे त्या म्हणाल्या. कचरा उचलायला जाताना कचºयात भाज्या फेकून दिलेल्या असतात, मग त्याच घरी आणून शिजवतो. पोटापाण्यासाठी वणवण भटकावेच लागते. आता कोणी मदत देत नाही, आम्ही तर मदत देण्याचे आवाहन करणारा फलक पण लावला आहे. एकमेकांना साथ देत आयुष्याची गाडी पुढे ढकलत आहोत, असे कचरावेचक तुळसा भोसले आणि पारू राठोड यांनी सांगितले.मुलींच्या शिक्षणाची फी सध्या भरू शकत नाहीमी लॉकडाऊनपासून घरी आहे, मी स्वयंपाकाची काम करते, पण लॉकडाऊनपासून कोणी बोलवत नाही. कोणी आमचे फोनही उचलत नाहीत. सध्या चहाचपाती खाऊन दिवस काढत असल्याचे दुर्गा वाघमारे यांनी सांगितले.मी नऊ घरची कामे करत होते. लॉकडाऊनमुळे सध्या ती बंद आहेत. सुरुवातीला एक महिना मला पगार दिला, पण त्यानंतर फक्त आता एका घरातून पगार सुरू आहे.घराची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मुलींच्या शिक्षणाची फी देखील भरू शकत नाही, मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे, असे जयश्री पडवळ यांनी सांगितले.उधारीवर चाललेय घरअनलॉक सुरू झाला तेव्हा १० ते १२ दिवस रिक्षा चालवली. पण, लॉकडाऊनमुळे पुन्हा काम बंद झाले. सध्या माझे घर उधारीवर चालत आहे, असे रिक्षाचालक भाऊसाहेब पवार यांनी सांगितले. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात मदत येत होती, पण त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आणि अनेकांना मदत मिळणेही बंद झाले आहे. लॉक-अनलॉकमुळे गरीबवर्गाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

टॅग्स :thaneठाणे