शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात फेकलेल्या भाज्या खाऊन भरताहेत पोट, कचरावेचक महिलांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 00:22 IST

दोनवेळचे जेवण कसेबसे मिळवायचे, यासाठी रोजंदारीवर काम करणारा कामगारवर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षांकडून अन्नधान्य, जेवणवाटप केले जात होते.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : कचºयात फेकलेली भाजी घरी आणून स्वच्छ धुऊन घेतो आणि तीच शिजवून भातासोबत खातो. घरात फक्त दोन किलो तांदूळ आहे. आजूबाजूच्या लोकांचेदेखील असेच हाल आहेत. ज्याच्या घरात जे असेल ते एकमेकांना देत दिवस ढकलत आहोत. घरात अठरा विश्व दारिद्रय म्हणजे काय असते, त्याची जाणीव या लॉकडाऊनने करून दिली, अशी व्यथा कचरावेचक महिला तुळसा भोसले हिने ‘लोकमत’कडे मांडली. हातावर पोट असणाºया इतर कष्टकरीवर्गानेही लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडल्याची खंत व्यक्त केली आहे.दोनवेळचे जेवण कसेबसे मिळवायचे, यासाठी रोजंदारीवर काम करणारा कामगारवर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षांकडून अन्नधान्य, जेवणवाटप केले जात होते. परंतु, अनलॉकनंतर पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यावर अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे घरेलू कामगार, रिक्षाचालक व इतर कष्टकरीवर्गाने सांगितले. अनलॉकमध्ये रिक्षा चालवायला सुरुवात केली. थोडे पैसे आले तेवढ्यात पुन्हा लॉकडाऊन केले आणि आमची पुरती निराशा झाली, असे रिक्षाचालकांनी सांगितले.अद्याप घरकामासाठी कोणत्याही घरमालकाने बोलाविले नाही, सुरुवातीला काही कुटुंबांनी पगार दिला, पण आता तोही बंद झाला आहे, अशी व्यथा घरकाम करणाºया महिलांनी व्यक्त केली.कचरावेचक महिला लॉकडाऊनमध्ये कचरा वेचायला जातात आणि तो घरी आणून साठवून ठेवतात. लॉकडाऊन संपले की, हा कचरा विकून येणाºया पैशात संसाराचा गाडा हाकणार असल्याचे त्या म्हणाल्या. कचरा उचलायला जाताना कचºयात भाज्या फेकून दिलेल्या असतात, मग त्याच घरी आणून शिजवतो. पोटापाण्यासाठी वणवण भटकावेच लागते. आता कोणी मदत देत नाही, आम्ही तर मदत देण्याचे आवाहन करणारा फलक पण लावला आहे. एकमेकांना साथ देत आयुष्याची गाडी पुढे ढकलत आहोत, असे कचरावेचक तुळसा भोसले आणि पारू राठोड यांनी सांगितले.मुलींच्या शिक्षणाची फी सध्या भरू शकत नाहीमी लॉकडाऊनपासून घरी आहे, मी स्वयंपाकाची काम करते, पण लॉकडाऊनपासून कोणी बोलवत नाही. कोणी आमचे फोनही उचलत नाहीत. सध्या चहाचपाती खाऊन दिवस काढत असल्याचे दुर्गा वाघमारे यांनी सांगितले.मी नऊ घरची कामे करत होते. लॉकडाऊनमुळे सध्या ती बंद आहेत. सुरुवातीला एक महिना मला पगार दिला, पण त्यानंतर फक्त आता एका घरातून पगार सुरू आहे.घराची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मुलींच्या शिक्षणाची फी देखील भरू शकत नाही, मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे, असे जयश्री पडवळ यांनी सांगितले.उधारीवर चाललेय घरअनलॉक सुरू झाला तेव्हा १० ते १२ दिवस रिक्षा चालवली. पण, लॉकडाऊनमुळे पुन्हा काम बंद झाले. सध्या माझे घर उधारीवर चालत आहे, असे रिक्षाचालक भाऊसाहेब पवार यांनी सांगितले. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात मदत येत होती, पण त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आणि अनेकांना मदत मिळणेही बंद झाले आहे. लॉक-अनलॉकमुळे गरीबवर्गाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

टॅग्स :thaneठाणे