शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘निरोगी आयुष्यासाठी सेंद्रिय भाजीपाला खा’; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 06:32 IST

ठाणे शहर हे सुंदर, स्वच्छ होत असताना त्याला हरित शहर केले पाहिजे. पालिकेने एक एकर जागेत सेंद्रिय भाजीपाला पिकवावा आणि एक आदर्श निर्माण करावा, असे शिंदे पुढे म्हणाले.

ठाणे - निरोगी आयुष्य जगायचे असेल तर सेंद्रिय पद्धतीने केलेल्या भाजीपाल्यांचा वापर आहारात करायला हवा, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. त्यासाठी ठाणे पालिकेने एक एकराच्या जागेवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्यांची लागवड करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. ठाणे पालिकेच्या वतीने आयोजित ‘वृक्षवल्ली-२०२५’ प्रदर्शनाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  

झाडांमुळे आपण जगतो आणि आनंदी राहतो, वृक्षवल्ली प्रदर्शन म्हणजे ठाणे पालिकेची एक प्रकारची मोहीमच आहे. एक सुंदर आणि आदर्श गाव कसे असते, ते पाहायचे असेल तर माझ्या गावाला या. इथे ५०० प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे, असे शिंदे म्हणाले. विविध जातींची फुले, फळझाडे, आदींसह इतर वृक्षांची लागवड करण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे शहर हे सुंदर, स्वच्छ होत असताना त्याला हरित शहर केले पाहिजे. पालिकेने एक एकर जागेत सेंद्रिय भाजीपाला पिकवावा आणि एक आदर्श निर्माण करावा, असे शिंदे पुढे म्हणाले. 

ऑक्सिजन पार्कचा प्रयत्न ठाणे पालिकेच्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक वृक्ष लावून घ्यावा. त्याचे संगोपन करावे. निसर्गाची जपणुकतेसाठीच समृद्धी महामार्गात अधिकचे पैसे खर्च केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्राण्यांना मोकळ्या वातावरणात फिरता यावे यासाठी तेथे मार्ग तयार केले आहेत. ठाण्याच्या सेंट्रल पार्कमध्ये आणखी वृक्षांची लागवड केली पाहिजे.  याशिवाय जागोजागी ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. 

५००० रोपांचा समावेश यंदाचे प्रदर्शन‘जैवविविधतेचे सप्तरंग’ या संकल्पनेवर आधारित आहे. प्रदर्शनात २०० प्रजातींची फुलझाडे,  फळांची रोपे,  रंगीबेरंगी फुले व औषधी वनस्पती, आदी मिळून पाच हजार रोपांचा समावेश आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे