शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

ठाण्यात होणार ई-यंत्राने दंडवसुली, अमित काळे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 04:08 IST

राज्यात एकाच वेळी शासनाने ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रणालीचा शुभारंभ महिनाभरात होणार असल्याने वाहतूक नियमानुसार दंडवसुलीसाठी ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंडआकारणी होणार आहे.

ठाणे - राज्यात एकाच वेळी शासनाने ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रणालीचा शुभारंभ महिनाभरात होणार असल्याने वाहतूक नियमानुसार दंडवसुलीसाठी ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंडआकारणी होणार आहे. तसेच ई-चलनाबाबत वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण दिले असून ३०० यंत्रेही दाखल झाल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचा समावेश आहे. त्या शहरांमध्ये ठाणे वाहतूक शाखेच्या १८ उपशाखा आहेत. त्यामध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांकडून ई-चलन प्रणालीद्वारे दंडवसुली केली जाणार आहे. त्यासाठी ३०० ई-चलन यंत्रे ठाण्यात दाखल झाली असून ही यंत्रे हाताळणीचे प्रशिक्षण अधिकारी-कर्मचाºयांना देण्यात आले आहे. तसेच ही यंत्रे उपशाखेच्या कार्यक्षेत्रानुसार वाटप केली जाणार आहेत. कमी कार्यक्षेत्र असणाºयांना साधारणत: १०, १५ आणि जास्तीतजास्त २० यंत्रे एका उपशाखेला दिली जाणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.काय आहे ही प्रणाली...वाहतूक नियम मोडणाºयांचा वाहन परवाना आणि वाहनांचे छायाचित्र ई-चलन यंत्रामध्ये चित्रित केले जाणार आहे. त्याआधारे यंत्रावर वाहन नोंदणीधारकाचे नाव, वाहन परवान्याच्या नोंदणीची इत्थंभूत माहिती तत्काळ उपलब्ध होते. तसेच कोणत्या प्रकारे वाहतूक नियम आणि त्याचे उल्लंघन केल्यावर भरावा लागणारा दंड याची यादी उपलब्ध असून त्याआधारे वाहतूक पोलीस संबंधितांवर रोख तसेच एटीएमकार्डाद्वारे दंडाची रक्कम वसूल करणार आहेत. दंड भरल्याची पावतीही दिली जाणार आहे.तो आॅनलाइन किंवा राज्यातील वाहतूक शाखेच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन भरता येणार आहे. तसेच यामुळे वाहनचालकाने किती वेळेस नियम तोडले आणि यापूर्वी दंडाची रक्कम भरली आहे की नाही, याची माहिती यंत्रावर तत्काळ उपलब्ध होणार आहे. संबंधिताला एकूण दंड भरावा लागणार आहे. तसेच देण्यात येणाºया पावतीवर संबंधित क र्मचाºयांसाठी एक विशिष्ट कोडही दिला आहे. तसेच त्याने ती कारवाई कोणत्या ठिकाणी केली, याची नोंद होणार असल्याने त्या वाहतूक पोलिसांवर त्याद्वारे वॉच राहणार आहे.1562परवाने निलंबित करण्याचा प्रस्तावठाणे शहर वाहतूक शाखेने १ जानेवारी ते २८ डिसेंबर २०१८ या कालावधीत एक हजार ५६२ परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव तयार केले होते. त्यामधील ८६१ परवाने आरटीओ विभागाने, तर २०५ न्यायालयाने निलंबित केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणे