शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

उग्र वासाने डोंबिवली त्रस्त, उलटी, डोकेदुखी, जुलाब, मळमळण्याचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:18 IST

एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत.

डोंबिवली : एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत. उलटी, जुलाब, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे तसेच मळमळ अशा आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. केमिकल कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करताच त्यांचे सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याचा आरोप रहिवाशांचा असून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सीईटीपीच्या अधिकाऱ्यांनी नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यावरून कोणत्या कंपनीचे केमिकल नाल्यात सोडण्यात आले होते, हे स्पष्ट होणार आहे.एमआयडीसी परिसरात राहणाºया रहिवाशांना वायुप्रदूषण नवीन नाही; पण फेज-२ मधील सागाव, सागर्ली आणि सोनारपाड्यामधील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासामुळे पुरते हैराण झाले आहेत. यात या वासामुळे त्यांचे आरोग्य बिघडल्याने स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे, रमेश मिश्रा आदी मंडळींनी शनिवारी रात्री त्या परिसराला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. दिवसाही केमिकलचा उग्र वास येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या वासामुळे जीव घुसमटत असून चक्कर, डोकेदुखी, उलट्या आदी त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.दोन, तीन दिवसांपासून हा त्रास अधिक जाणवू लागला आहे. हे थांबले नाही, तर झोपेतच आमचे जीव जातील, अशी भीतीही रहिवाशांनी व्यक्त केली. ज्या नाल्यातून केमिकल सोडण्यात आले होते, तेथील पाण्याचे नमुने सीईटीपीच्या अधिकाºयांनी घेतल्याची माहिती स्थानिक रहिवासी संदीप नाईक यांनी दिली. आम्हीही नमुने घेतले असून त्याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात पत्रदेखील दिले असून यात जी कंपनी दोषी आहे, तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे नाईक म्हणाले. दरम्यान, सीईटीपीचे देवेन सोनी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.>हिरव्या पावसाचा आज नोंदवणार निषेध२१ जानेवारी २०१४ ला सकाळी७ च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र हिरव्या रंगाची चादर पसरली होती. हा प्रकार त्यावेळी खूपच गाजला होता. प्रदूषण केल्याप्रकरणी एका कंपनीवर कारवाईही करण्यात आली. संबंधित कंपनीला इंजिनीअरिंग वस्तू बनवण्याची परवानगी असताना तिथे बेकायदा रासायनिक रंग बनवले जात होते. याचे कण हवेत जाऊन त्यावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र हिरवा रंग दिसून आला होता. हे चित्र एमआयडीसीतील सर्वच रस्ते तसेच इमारतींमधील टेरेसवर पाहावयास मिळाले होते.दरम्यान, या घटनेची आठवण म्हणून दरवर्षीप्रमाणे सोमवारीही निषेध दिन पाळला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. सोमवारी फलकाद्वारे याचा निषेध नोंदविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.