शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

उग्र वासाने डोंबिवली त्रस्त, उलटी, डोकेदुखी, जुलाब, मळमळण्याचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:18 IST

एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत.

डोंबिवली : एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत. उलटी, जुलाब, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे तसेच मळमळ अशा आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. केमिकल कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करताच त्यांचे सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याचा आरोप रहिवाशांचा असून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सीईटीपीच्या अधिकाऱ्यांनी नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यावरून कोणत्या कंपनीचे केमिकल नाल्यात सोडण्यात आले होते, हे स्पष्ट होणार आहे.एमआयडीसी परिसरात राहणाºया रहिवाशांना वायुप्रदूषण नवीन नाही; पण फेज-२ मधील सागाव, सागर्ली आणि सोनारपाड्यामधील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासामुळे पुरते हैराण झाले आहेत. यात या वासामुळे त्यांचे आरोग्य बिघडल्याने स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे, रमेश मिश्रा आदी मंडळींनी शनिवारी रात्री त्या परिसराला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. दिवसाही केमिकलचा उग्र वास येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या वासामुळे जीव घुसमटत असून चक्कर, डोकेदुखी, उलट्या आदी त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.दोन, तीन दिवसांपासून हा त्रास अधिक जाणवू लागला आहे. हे थांबले नाही, तर झोपेतच आमचे जीव जातील, अशी भीतीही रहिवाशांनी व्यक्त केली. ज्या नाल्यातून केमिकल सोडण्यात आले होते, तेथील पाण्याचे नमुने सीईटीपीच्या अधिकाºयांनी घेतल्याची माहिती स्थानिक रहिवासी संदीप नाईक यांनी दिली. आम्हीही नमुने घेतले असून त्याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात पत्रदेखील दिले असून यात जी कंपनी दोषी आहे, तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे नाईक म्हणाले. दरम्यान, सीईटीपीचे देवेन सोनी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.>हिरव्या पावसाचा आज नोंदवणार निषेध२१ जानेवारी २०१४ ला सकाळी७ च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र हिरव्या रंगाची चादर पसरली होती. हा प्रकार त्यावेळी खूपच गाजला होता. प्रदूषण केल्याप्रकरणी एका कंपनीवर कारवाईही करण्यात आली. संबंधित कंपनीला इंजिनीअरिंग वस्तू बनवण्याची परवानगी असताना तिथे बेकायदा रासायनिक रंग बनवले जात होते. याचे कण हवेत जाऊन त्यावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र हिरवा रंग दिसून आला होता. हे चित्र एमआयडीसीतील सर्वच रस्ते तसेच इमारतींमधील टेरेसवर पाहावयास मिळाले होते.दरम्यान, या घटनेची आठवण म्हणून दरवर्षीप्रमाणे सोमवारीही निषेध दिन पाळला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. सोमवारी फलकाद्वारे याचा निषेध नोंदविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.