शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

उग्र वासाने डोंबिवली त्रस्त, उलटी, डोकेदुखी, जुलाब, मळमळण्याचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:18 IST

एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत.

डोंबिवली : एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत. उलटी, जुलाब, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे तसेच मळमळ अशा आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. केमिकल कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करताच त्यांचे सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याचा आरोप रहिवाशांचा असून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सीईटीपीच्या अधिकाऱ्यांनी नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यावरून कोणत्या कंपनीचे केमिकल नाल्यात सोडण्यात आले होते, हे स्पष्ट होणार आहे.एमआयडीसी परिसरात राहणाºया रहिवाशांना वायुप्रदूषण नवीन नाही; पण फेज-२ मधील सागाव, सागर्ली आणि सोनारपाड्यामधील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासामुळे पुरते हैराण झाले आहेत. यात या वासामुळे त्यांचे आरोग्य बिघडल्याने स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे, रमेश मिश्रा आदी मंडळींनी शनिवारी रात्री त्या परिसराला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. दिवसाही केमिकलचा उग्र वास येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या वासामुळे जीव घुसमटत असून चक्कर, डोकेदुखी, उलट्या आदी त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.दोन, तीन दिवसांपासून हा त्रास अधिक जाणवू लागला आहे. हे थांबले नाही, तर झोपेतच आमचे जीव जातील, अशी भीतीही रहिवाशांनी व्यक्त केली. ज्या नाल्यातून केमिकल सोडण्यात आले होते, तेथील पाण्याचे नमुने सीईटीपीच्या अधिकाºयांनी घेतल्याची माहिती स्थानिक रहिवासी संदीप नाईक यांनी दिली. आम्हीही नमुने घेतले असून त्याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात पत्रदेखील दिले असून यात जी कंपनी दोषी आहे, तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे नाईक म्हणाले. दरम्यान, सीईटीपीचे देवेन सोनी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.>हिरव्या पावसाचा आज नोंदवणार निषेध२१ जानेवारी २०१४ ला सकाळी७ च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र हिरव्या रंगाची चादर पसरली होती. हा प्रकार त्यावेळी खूपच गाजला होता. प्रदूषण केल्याप्रकरणी एका कंपनीवर कारवाईही करण्यात आली. संबंधित कंपनीला इंजिनीअरिंग वस्तू बनवण्याची परवानगी असताना तिथे बेकायदा रासायनिक रंग बनवले जात होते. याचे कण हवेत जाऊन त्यावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र हिरवा रंग दिसून आला होता. हे चित्र एमआयडीसीतील सर्वच रस्ते तसेच इमारतींमधील टेरेसवर पाहावयास मिळाले होते.दरम्यान, या घटनेची आठवण म्हणून दरवर्षीप्रमाणे सोमवारीही निषेध दिन पाळला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. सोमवारी फलकाद्वारे याचा निषेध नोंदविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.