शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

आईचा मृत्यू झाला असताना बजावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:28 IST

कल्याणमधील घटना : प्रसूतीकरिता आलेल्या महिलेस डॉक्टरने दिला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याणमधील डॉ. अश्वीन कक्कर यांच्या रुग्णालयात एक गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या तेव्हा डॉक्टरांच्या घरातून आईचा आजारी असल्याचा फोन आला. डॉक्टर घरी जाऊन आईला भेटून लागलीच आले आणि महिलेची प्रसूती करण्याचे कर्तव्य प्रथम बजावले. इकडे डॉक्टर कर्तव्य बजावत असताना तिकडे त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आई आजारी असतानाही कर्तव्याला महत्त्व देणाऱ्या डॉ. कक्कर यांनी ‘कर्तव्याने घडतो माणूस...’ या गीताच्या ओळी आपल्या कृतीतून सार्थ ठरविल्या आहेत.

कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात राहणारी सबा शेख ही महिला आठ महिन्यांची गरोदर होती. १ मे रोजी ती कळव्यातील तिच्या सासरी गेली होती. कळव्यातील सरकारी रुग्णालयात तिची प्रसूती होणार होती. मात्र, त्याठिकाणी तिला चांगली वागणूक दिली गेली नाही. वास्तविक पाहता एका सामाजिक कार्यकर्त्याने तिला कल्याणहून ठाण्यापर्यंत रुग्णवाहिका करुन दिली होती. रुग्णालयात नीट वागणूक न मिळालेल्या सबाने तिच्या सासरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणीही खोली अत्यंत लहान असल्याने तिच्या सासरच्या मंडळीने तिला कल्याणला जा, असे सांगितले. लॉकडाउनमुळे कल्याण कसे गाठायचे, असा प्रश्न तिच्यापुढे होता. तिला एक तीन वर्षांचा मुलगाही आहे. आठ महिन्यांच्या गरोदर महिलेने भरउन्हात तीन वर्षांच्या मुलासह कळवा ते कल्याण रेल्वे ट्रॅकने चालत कल्याण गाठले.

या महिलेच्या प्रसूतीची तारीख जवळ येत असल्याने सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कानवडे यांनी तिची व्यथा सोशल मीडियावर प्रसृत केली. हा मेसेज डॉ. कक्कर यांनी पाहिला. डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयात सबाची नि:शुल्क प्रसूती करण्याचे ठरवले. सबाला रुग्णालयात दाखल केले गेले. सबाला प्रसूतिकळा सुरू झाल्या त्याचवेळी डॉक्टरांच्या आईची तब्येत बिघडल्याचा फोन आला. डॉक्टर घरी जाऊन आईला भेटून पुन्हा तातडीने रुग्णालयात आले. सबाची प्रसूती सुरु असताना डॉक्टरांच्या आईचे निधन झाले. सबाने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनी घरी जाऊन आईच्या अंत्यविधीची तयारी केली. काल अंत्यविधी करुन ते आज पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी रुग्णालयात हजर असल्याचे सांगितले.डॉ. अश्वीन कक्कर यांच्या ७० वर्षांच्या आई मधुलिका या आजारी होत्या. मधुलिका या वाणी विद्यालयात शिक्षिका होत्या. मधुलिका यांनी त्यांचा मुलगा अश्वीन याला डॉक्टर केले. डॉक्टर झालेल्या मुलावर ‘आधी कर्तव्य बजावले पाहिजे’, असे संस्कार आईने रुजवले होते. आईने दिलेल्या संस्कारांचा वसा घेऊन काम करणारे डॉ. कक्कर यांना आईच्या मृत्यूसमयी तिच्याजवळ उपस्थित राहता आले नाही. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.