शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कोरोनाच्या संकट काळात घोडबंदर ग्रामस्थांनी भुकेल्यांसाठी पेटवलेली माणुसकीची चूल अविरतपणे आहे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 14:30 IST

भाज्या कापण्या पासुन तांदुळ आदी निवडण्याचे व जेवण बनवण्याचे काम महिला करतात.

- धीरज परब

मीरारोड - घोडबंदर गावातील ग्रामस्थांनी गेल्या २४ मार्च पासुन गरजु - गरीबांना रोजचे एकवेळचे भरपेट जेवण देण्याचे व्रत चालवले आहे. कोरोनाच्या संकटकाळात गावातील महिला - पुरुष जणु घरचे कार्य आहे या प्रमाणे रोज आवर्जुन सेवेच्या या कर्तव्य यज्ञात सहभागी होत आहेत. रोज ७०० ते ८०० भुकेल्यांच्या पोटातील अग्नी शमवण्यासाठी पेटवलेली अन्नछत्राची चूल अविरतपणे सुरु आहे.घोडबंदर हे स्थानिक आगरी - कोळ्यांचे गाव. घोडबंदर किल्लया मुळे गावाला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. कोरोनाच्या संसर्गा मुळे जमावबंदी व संचारबंदी लागु झाल्याने अत्यावश्यक गोष्टी वगळता बाकी सर्व ठप्पच आहे. यात मजुरी व रोजचे कमावुन खाणारायांची परिस्थीती खुपच दयनिय झाली आहे. आपल्या भागातील गरजु - गरीब उपाशी राहु नये यासाठी घोडबंदरगावचे ग्रामस्थ आणि माजी उपमहापौर चंद्रकांत वैती व ग्रामस्थांनी तातडीने जेवण बनवुन देण्याचा निर्णय घेतला.२४ मार्च पासुनच घोडबंदर गावातील बस स्थानका जवळ असलेल्या एका मोकळ्या शेड मध्ये ग्रामस्थांनी अन्नछत्र सुरु केले. रोज घोडबंदर गाव, रेतीबंदर व परिसरातील गरजुंना जेवण दिले जात आहे. सुमारे ७०० ते ८०० लोकं रोज जेवत आहेत. जेवण व पॅकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य, धान्य आदींचा खर्च ग्रामस्थाच मिळुन उचलत आहेत. गावातुनच कोणी रोख रक्कम देते तर कोणी धान्य , भाज्यांच्या स्वरुपात मदत करत आहे. गावातील आगरी - कोळी महिला स्वत: जेवण बनवत असुन त्यासाठी मसला देखील अस्सल आगरी - कोळी वापरला जात आहे. त्यामुळे या सुग्रणींच्या हातचे जेवण रुचकर असल्याने जेवणारे सुध्दा घरचं जेवण मिळत असल्याचे समाधान व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांचे हे अविरत सेवाव्रत पाहुन मुस्लिम बांधवांनी सुध्दा १०० किलो तांदुळ दिला आहे.एमबीए केलेला तरुण हर्षद वैती हा रोज स्वत: जाऊन जेवणा साठी लागणारे धान्य, भाज्या, तेल आदी खरेदी करुन आणतो. सकाळी ९ वाजल्या पासुन गावातील पुरुष भटारखान्याच्या ठिकाणी जमायला लागतात. तर घरची कामं आटोपुन गावातील महिला साडे नऊच्या सुमारास यायला लागतात. काम करण्यासाठी येताना व कामाच्या ठिकाणी सुध्दा मास्क घालण्यासह स्वच्छता व शारिरीक अंतर ठेवले जाते.भाज्या कापण्या पासुन तांदुळ आदी निवडण्याचे व जेवण बनवण्याचे काम महिला करतात. पुरुष मंडळी सुध्दा महिलांना आवश्यकते नुसार अगदी कांदा कापुन देण्या पासुन मदत करतात. कधी पुरी भाजी, उसळ भात, पुलाव, सांबार भात, मसाले भात, खिचडी असा रोज वेगवेगळा मेनु बनवला जातो जेणे करुन जेवणारायांना सुध्दा एकच पदार्थ खायचा कंटाळा येणार नाही याची काळजी घेतली जाते. जेवण तयार झाले की तर पॅकींग करण्याची जबाबदारी तरुण व पुरुष मंडळी करतात. दुपारी १२ वाजे पर्यंत जेवण तयार होते. उत्साहात व हसत खेळत घरच्या प्रमाणेच जेवण बनवण्याचे काम उरकले जाते. जेवणाची पाकिटं भरली की अवघ्या दिड - दोन तासात ती वाटुन संपतात. गेल्या २४ मार्च पासुन या ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीने पेटवलेली ही अन्नछत्राची चूल आजही कोणताही खंड न पडता उत्साहात सुरु आहे.मेघा वैती ( ग्रामस्थ महिला ) - गाव व परिसरात पोटापाण्यासाठी आलेली कुटुंब, मोलमजुरी करणारायांना कोरोनाच्या संकटकाळात आम्ही ग्रामस्थ उपाशी कसे रहायला देऊ ?. ही गरजु लोकं सुध्दा आमच्याच कुटुंबातील आहेत या भावनेने आम्ही ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी रोज जेवण बनवण्याचे कार्य सुरु केले. गावातील आम्ही महिला घरचे कार्य मानुन मोठ्या आनंदाने रोजचे जेवण बनवत आहोत. कोरोनाच काय कुठल्याही संकटावर आम्ही मात करु अशी जिद्द व आत्मविश्वास यातुन आम्हाला मिळाला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर