शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कोरोनाच्या संकट काळात घोडबंदर ग्रामस्थांनी भुकेल्यांसाठी पेटवलेली माणुसकीची चूल अविरतपणे आहे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 14:30 IST

भाज्या कापण्या पासुन तांदुळ आदी निवडण्याचे व जेवण बनवण्याचे काम महिला करतात.

- धीरज परब

मीरारोड - घोडबंदर गावातील ग्रामस्थांनी गेल्या २४ मार्च पासुन गरजु - गरीबांना रोजचे एकवेळचे भरपेट जेवण देण्याचे व्रत चालवले आहे. कोरोनाच्या संकटकाळात गावातील महिला - पुरुष जणु घरचे कार्य आहे या प्रमाणे रोज आवर्जुन सेवेच्या या कर्तव्य यज्ञात सहभागी होत आहेत. रोज ७०० ते ८०० भुकेल्यांच्या पोटातील अग्नी शमवण्यासाठी पेटवलेली अन्नछत्राची चूल अविरतपणे सुरु आहे.घोडबंदर हे स्थानिक आगरी - कोळ्यांचे गाव. घोडबंदर किल्लया मुळे गावाला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. कोरोनाच्या संसर्गा मुळे जमावबंदी व संचारबंदी लागु झाल्याने अत्यावश्यक गोष्टी वगळता बाकी सर्व ठप्पच आहे. यात मजुरी व रोजचे कमावुन खाणारायांची परिस्थीती खुपच दयनिय झाली आहे. आपल्या भागातील गरजु - गरीब उपाशी राहु नये यासाठी घोडबंदरगावचे ग्रामस्थ आणि माजी उपमहापौर चंद्रकांत वैती व ग्रामस्थांनी तातडीने जेवण बनवुन देण्याचा निर्णय घेतला.२४ मार्च पासुनच घोडबंदर गावातील बस स्थानका जवळ असलेल्या एका मोकळ्या शेड मध्ये ग्रामस्थांनी अन्नछत्र सुरु केले. रोज घोडबंदर गाव, रेतीबंदर व परिसरातील गरजुंना जेवण दिले जात आहे. सुमारे ७०० ते ८०० लोकं रोज जेवत आहेत. जेवण व पॅकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य, धान्य आदींचा खर्च ग्रामस्थाच मिळुन उचलत आहेत. गावातुनच कोणी रोख रक्कम देते तर कोणी धान्य , भाज्यांच्या स्वरुपात मदत करत आहे. गावातील आगरी - कोळी महिला स्वत: जेवण बनवत असुन त्यासाठी मसला देखील अस्सल आगरी - कोळी वापरला जात आहे. त्यामुळे या सुग्रणींच्या हातचे जेवण रुचकर असल्याने जेवणारे सुध्दा घरचं जेवण मिळत असल्याचे समाधान व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांचे हे अविरत सेवाव्रत पाहुन मुस्लिम बांधवांनी सुध्दा १०० किलो तांदुळ दिला आहे.एमबीए केलेला तरुण हर्षद वैती हा रोज स्वत: जाऊन जेवणा साठी लागणारे धान्य, भाज्या, तेल आदी खरेदी करुन आणतो. सकाळी ९ वाजल्या पासुन गावातील पुरुष भटारखान्याच्या ठिकाणी जमायला लागतात. तर घरची कामं आटोपुन गावातील महिला साडे नऊच्या सुमारास यायला लागतात. काम करण्यासाठी येताना व कामाच्या ठिकाणी सुध्दा मास्क घालण्यासह स्वच्छता व शारिरीक अंतर ठेवले जाते.भाज्या कापण्या पासुन तांदुळ आदी निवडण्याचे व जेवण बनवण्याचे काम महिला करतात. पुरुष मंडळी सुध्दा महिलांना आवश्यकते नुसार अगदी कांदा कापुन देण्या पासुन मदत करतात. कधी पुरी भाजी, उसळ भात, पुलाव, सांबार भात, मसाले भात, खिचडी असा रोज वेगवेगळा मेनु बनवला जातो जेणे करुन जेवणारायांना सुध्दा एकच पदार्थ खायचा कंटाळा येणार नाही याची काळजी घेतली जाते. जेवण तयार झाले की तर पॅकींग करण्याची जबाबदारी तरुण व पुरुष मंडळी करतात. दुपारी १२ वाजे पर्यंत जेवण तयार होते. उत्साहात व हसत खेळत घरच्या प्रमाणेच जेवण बनवण्याचे काम उरकले जाते. जेवणाची पाकिटं भरली की अवघ्या दिड - दोन तासात ती वाटुन संपतात. गेल्या २४ मार्च पासुन या ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीने पेटवलेली ही अन्नछत्राची चूल आजही कोणताही खंड न पडता उत्साहात सुरु आहे.मेघा वैती ( ग्रामस्थ महिला ) - गाव व परिसरात पोटापाण्यासाठी आलेली कुटुंब, मोलमजुरी करणारायांना कोरोनाच्या संकटकाळात आम्ही ग्रामस्थ उपाशी कसे रहायला देऊ ?. ही गरजु लोकं सुध्दा आमच्याच कुटुंबातील आहेत या भावनेने आम्ही ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी रोज जेवण बनवण्याचे कार्य सुरु केले. गावातील आम्ही महिला घरचे कार्य मानुन मोठ्या आनंदाने रोजचे जेवण बनवत आहोत. कोरोनाच काय कुठल्याही संकटावर आम्ही मात करु अशी जिद्द व आत्मविश्वास यातुन आम्हाला मिळाला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर