शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी गेला १३६ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:41 AM

कल्याण : केडीएमसी हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे रुग्ण ...

कल्याण : केडीएमसी हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्के आहे. ही समाधानाची बाब असली, तरी सध्या मृतांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. १ ते ११ मेपर्यंत १५० जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, मृत्युदरही वाढून १.२४ टक्के झाला आहे.

आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १९ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले होते. त्यापैकी ३७ हजार ६२० रुग्ण उपचाराअंती बरे झाले झाले. मात्र, १७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मे महिन्यात मागील ११ दिवसांत सहा हजार ५२५ नवे रुग्ण आढळून आले, तर १२ हजार ८३४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्क्यांवर गेले आहे. एप्रिलच्या अखेरीस हे प्रमाण ८६.४५ टक्के, तर रुग्णदुपटीचा कालावधी ४३ पर्यंत घसरला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो ५२ दिवसांवर गेला होता. मात्र, सध्या रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे.

दरम्यान, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत दररोज चार ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होते, परंतु अखेरच्या आठवड्यात दररोज १० मृत्यू नोंदविले गेले. मे महिन्यापासून यात अधिकच भर पडली असून, ११ मे रोजी एका दिवसातील सर्वाधिक २० जणांचा मृत्यू झाला.

---------------------

मृत्युदरात चढ-उतार

- एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मृत्युदर १.६७ टक्के इतका होता. तिसऱ्या आठवड्यात तो १.२६ टक्के व त्यानंतर तो १.१९ टक्के इतका कमी झाला होता, परंतु सध्या मृत्यू वाढल्याने मृत्युदर पुन्हा १.२४ टक्के झाला आहे.

- मात्र, मृतांची सध्याची दैनंदिन संख्या ही २४ तासांतील नाही, असे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे, तर सुरुवातीपासूनच मनपा हद्दीतील मृत्युदर हा कमी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

---------------------