शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेत हेतुत: खोडा, फेरनिविदेच्या फेऱ्यात अडकली की अडकवली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 03:03 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत १८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत १८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र, काही त्रुटींमुळे याबाबतची निविदा प्रक्रिया बाद ठरली. पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याने ही योजना फेरनिविदेच्या फेºयात अडकली आहे. मुळात २७ गावे महापालिका हद्दीत राहणार नसतील, तर याकरिता महापालिकेने निधी का द्यावा, अशी महापालिकेतील लोकप्रतिनिधींची भूमिका असल्याने हेतुत: हा गोंधळ निर्माण केल्याची शंका २७ गावांतील नागरिक व्यक्त करत आहेत.२७ गावांतील पाणीपुरवठा वितरणव्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्राने पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याकरिता, २७ गावांत जलवाहिनी टाकण्याकरिता महापालिकेने जवळपास ३५ कोटी रुपये खर्चाची निविदा काढली होती. ही निविदा रद्द करून हे काम १८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट केले. १८० कोटी रुपये खर्चाच्या निविदेस प्रतिसाद मिळाला होता. मात्र, त्यात काही त्रुटी असल्याने ही निविदा राज्य सरकारने मार्चमध्ये रद्द केली. पाणीपुरवठा योजना महापालिकेची असली, तरी खाजगी कंत्राटदारामार्फत ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करून घेतली जाणार आहे. २७ गावांतून काटई रेल्वे उड्डाणपुलाखालून दिवा-पनवेल हा रेल्वेचा मार्ग जातो. याठिकाणचे जलवाहिन्या टाकण्याचे कामवगळून योजनेचे काम देण्यात यावे, असा प्रतिसाद देणाºया निविदाधारकांचा आग्रह होता. या कामाला प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका व जीवन प्राधिकरणाने हे काम वगळून १६२ कोटी रुपये खर्चाची निविदा नव्याने मागवली. तीन कंत्राटदारांनी भरलेल्या निविदांपैकी एका कंपनीच्या निविदेत त्रुटी आढळली. साहजिकच, उर्वरित दोन कंपन्यांमध्ये स्पर्धाच राहिली नाही. सगळ्यात कमी दराची निविदा दाखल करणारी कंपनी अवैध व बेकायदेशीर असल्याचा शेरा जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी मारल्याने निविदा प्रक्रिया रद्द करायची की, पुन्हा मागवायची, याविषयीचा निर्णय महापालिका घेणार आहे. प्राधिकरणाने निर्णयाचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात टाकला. महापालिकेने हा निर्णय प्राधिकरणानेच घ्यावा, यासाठी हे प्रकरण पुन्हा प्राधिकरणाकडे पाठवले. प्राधिकरणाने ही निविदा प्रक्रिया अंगलट येणारी असल्याने रद्द करून फेरनिविदा मागवण्याचे ठरवले आहे. महापालिका अधिकाºयांनी पाणीपुरवठा योजनेसाठी फेरनिविदा मागवण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यात आणखीन दीड महिन्याचा कालावधी खर्च होणार आहे.योजनेला २०१७ मध्ये मंजुरी मिळाली. तिची निविदा प्रक्रिया मार्च जानेवारी २०१८ मध्ये सुरू झाली.

सरकारकडून ३५ टक्केआठ महिन्यांपासून योजना निविदेच्या फेऱ्यातच अडकली आहे. या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकार ३५ टक्के निधी देणार आहे. त्यासाठी सरकारकडून अद्याप निधी मिळालेला नाही. महापालिका स्वत:चा हिस्सा भरणार नाही. २७ गावे वेगळी होणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्याने ६५ टक्के निधीचे दायित्व का घ्यायचे, असा प्रश्न लोकप्रतिनिधी विचारत आहेत.