शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

वाहतूक कोंडीमुळे ठाणे शहर गुदमरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 06:10 IST

ठाणे शहरातील घोडबंदर मार्ग आणि भिवंडीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जिल्ह्यातील शेकडो नागरिक सोमवारी सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकल्याचे चित्र होते.

ठाणे : ठाणे शहरातील घोडबंदर मार्ग आणि भिवंडीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जिल्ह्यातील शेकडो नागरिक सोमवारी सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकल्याचे चित्र होते. त्यातच स्कूलबसही अडकल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. या कोंडीमुळे हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजात एकीकडे कानठळ्या बसत असताना दुसरीकडे धुराने श्वासही कोंडला गेला. महापालिका, सार्वजनिक बांधकाम खात्यासह एमएसआरडीच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यातील बहुतेक रस्त्यांवर झालेली ही कोंडी काही ठिकाणी वाहतूक नियमन करून तर काही ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजवून सोडवून शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.सोमवारी रात्री माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली. सुदैवाने घाटात पर्यटकांना जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जुलैपर्यंत मनाई केल्याने आणि दरड कोसळतेवेळी कोणतेही वाहन नसल्याने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, संध्याकाळी ती कोसळल्याने अंधारामुळे मदत कार्य थांबले आहे.>नाशिक-गुजरातकडे जाणारी वाहने अडकलीठाणेमार्गे नाशिकसह गुजरात, पालघर, बोरिवलीकडे आणि ठाण्यातून मुलुंडमार्गे मुंबईकडे जाणारी सार्वजनिक आणि खासगी वाहनेही या कोंडीत अडकली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अनेक शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळा असल्यामुळे बहुतांश स्कूलबस या कोंडीत होत्या.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनाही फटका बसला. नौपाडा वाहतूक शाखेचे निरीक्षक दिगंबर भदाणे, कासारवडवलीचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांचे पथक भरपावसात कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. हीच परिस्थिती भिवंडीतही पाहायला मिळाली. नारपोली, कोनगाव या भागांत अनेक कंपन्यांची गोदामे असल्याने शेकडो वाहनांची वर्दळ या भागातून असते.नारपोली भागात रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे सकाळी ९ ते १२ या काळात भिवंडीतही मोठी वाहतूककोंडी होते. भिवंडीच्या नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या पथकाने मात्र पुढाकार घेऊन या मार्गावरील अनेक खड्डे बुजवून वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.>कोनवगळता इतरत्र खड्डेच खड्डेभिवंडीच्या कोनगाव परिसरात वारंवार खड्ड्यांमुळे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी स्वत: रस्त्यावर उभे राहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. हे काम मार्गी लागेपर्यंत शिंदे स्पॉटवरच असल्यामुळे अधिकाºयांची चांगलीच धावपळ उडाली होती. मात्र, जिल्ह्यातील महापे-शीळ-कल्याण रस्ता, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरसह शहापूर, मुरबाड, उल्हासनगर शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांकडे अद्यापही संबंधित यंत्रणांनी लक्ष न दिल्याने सोमवारी या सर्वच मार्गांवर वाहतूककोंडी होती.>ठाणे शहराला वाहनांचा विळखाशहरातील मुलुंड टोलनाका ते घोडबंदर रोडवरील गायमुख या शेवटच्या टोकापर्यंत साधारण चार ते पाच किलोमीटरपर्यंत सकाळी ८ ते १० आणि दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेमध्ये वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.भरपावसामध्ये वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची मात्र चांगलीच कसरत होत होती. तरीही, वाहतूक मदतनीस यांच्या मदतीने वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.परंतु, कोपरी येथील टोलनाका, नितीन ते कापूरबावडी मार्गावर कापूरबावडी जंक्शन आणि कासारवडवली भागातील उड्डाणपुलाजवळ तसेच नितीन ते कॅडबरी, ठाणे-बेलापूर मार्गावरील खड्ड्यांमुळे सकाळच्या वाहतुकीचा वेग चांगलाच मंदावला होता.त्यातच मुसळधार पाऊसही सुरू असल्यामुळे चालकांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे कोपरी ते नितीन कंपनी आणि माजिवडा ते पातलीपाडा आणि कासारवडवली ते गायमुखपर्यंतच्या मार्गावर मोठीच कोंडी झाली होती.५अनेक रिक्षा, बस आणि खासगी बसही अर्धाअर्धा तास एकाच जागी असल्यामुळे बाजारहाटसाठी आणि सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेले चाकरमानी दोन ते तीन तास वाहतूककोंडीत अडकले होते.>ंमुसळधार पाऊस, त्यात रस्त्यांवर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे घोडबंदर रोडवरील कोपरी टोलनाका, कापूरबावडी आणि घोडबंदर ते ठाण्याकडे येणाºया मार्गावर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वाहतूककोंडी झाली होती. परंतु, भरपावसातही वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांनी नियमनाचे काम करून वाहतूक सुरळीत केली.- बाबाजी आव्हाड, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा,ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणे