शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

वाहतूक कोंडीने ठाणेकर मेटाकुटीला, पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी लागतोय पाऊण तास

By अजित मांडके | Updated: January 6, 2024 17:13 IST

ठाणेकरांना वाहतुक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुर्ती मर्यादीत राहिलेली नसून ती आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे : वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतुक पोलिसांनी विविध प्रयोग मागील काही महिन्यात ठाण्यात केले आहेत. मात्र हे सर्वच प्रयोग सपशेल फेल झाल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसत आहे. माजिवडा पासून ते थेट पातीलपाड्यापर्यंत रोजच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यातही मानपाडा ते माजिवडा हे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा कालवधी जात असल्याचे चित्र आहे. दुपारी १२ नंतर ते रात्री १० वाजेपर्यंत या भागात सतत वाहतुक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हेच ठाणे बदलतय का? असा उपरोधीक सवाल ठाणेकर नागरिक करु लागले आहेत.

ठाणेकरांना वाहतुक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुर्ती मर्यादीत राहिलेली नसून ती आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडल्यावर वाहतुक कोंडी होत होती. मात्र आता रस्ते चकाचक असतांनाही रस्त्यांवर वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. कापुरबावडी, माजिवडा, गोकुळनगर, नाशिककडून माजिवड्याकडून येणाऱ्या मार्गावर मानपाडा ते कापुरबावडी, माजिवडा ते मानपाडा ही सध्या वाहतुक कोंडीचे मुख्य स्पॉट ठरत आहेत. सकाळच्या सत्रात तुम्हाला कोंडीचा जाच नसला तरी देखील दुपारी १२ नंतर मात्र तुम्हाला घोडबंदरला किंवा ठाण्याला यायचे असेल तर विचार करुनच निघा अन्यथा कापुरबावडी ते माजिवडा या अवघ्या एका मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तांसाचा कालावधी जात आहे. 

त्यात संध्याकाळ जर तुम्ही थकून भागून आणि रेल्वेच्या गर्दीत चेंगरुन आल्यानंतर सुखाने घरी जाण्याचा किंबहुना घोडबंदरला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वाहतुक कोंडीत रममाण होण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे, स्टेशनवरुन परिवहनची बस पकडल्यानंतर घोडबंदरला किंबहुना मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ या भागात जायचे असले तर त्यासाठी कमीत कमी दोन तासांचा कालावधी सांयकाळी ६ नंतर रात्री १० वाजेपर्यंत लागत असल्याचे चित्र आहे. त्यातही गोकुळ नगर ते कापुरबावडी हे अंतर कापण्यासाठी पाच मिनिटांचा देखील अवधी लागत नाही. मात्र सांयकाळी हेच अंतर कापण्यासाठी ३५ ते ४५ मिनिटांचा कालावधी खर्ची करावा लागत आहे. त्यात कोंडीत अडकल्यावर विविध स्वरुपाच्या वाजणाºया वाहनांच्या हॉर्नमुळे डोकेदुखी देखील वाढत असल्याचे चित्र आहे.

मानपाडा भागात मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या मधोमध पिलर उभारण्यात आले आहेत, त्यामुळे घोडबंदरकडे जातांना आणि ठाण्याकडे येतांना वाहतुकीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. त्यात आता कापुरबावडी नाक्यावर छोट्या पुलाच्या ठिकाणी देखील मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथे देखील वाहतुक धिमी झाली आहे. त्यामुळे सांयकाळच्या सुमारास याच भागात मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आणखी किती दिवस त्रास सहन करायचा असा सवाल ठाणेकर करु लागले आहेत.

टॅग्स :thaneठाणे