शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वाहतूक कोंडीने ठाणेकर मेटाकुटीला, पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी लागतोय पाऊण तास

By अजित मांडके | Updated: January 6, 2024 17:13 IST

ठाणेकरांना वाहतुक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुर्ती मर्यादीत राहिलेली नसून ती आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे : वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतुक पोलिसांनी विविध प्रयोग मागील काही महिन्यात ठाण्यात केले आहेत. मात्र हे सर्वच प्रयोग सपशेल फेल झाल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसत आहे. माजिवडा पासून ते थेट पातीलपाड्यापर्यंत रोजच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यातही मानपाडा ते माजिवडा हे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा कालवधी जात असल्याचे चित्र आहे. दुपारी १२ नंतर ते रात्री १० वाजेपर्यंत या भागात सतत वाहतुक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हेच ठाणे बदलतय का? असा उपरोधीक सवाल ठाणेकर नागरिक करु लागले आहेत.

ठाणेकरांना वाहतुक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुर्ती मर्यादीत राहिलेली नसून ती आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडल्यावर वाहतुक कोंडी होत होती. मात्र आता रस्ते चकाचक असतांनाही रस्त्यांवर वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. कापुरबावडी, माजिवडा, गोकुळनगर, नाशिककडून माजिवड्याकडून येणाऱ्या मार्गावर मानपाडा ते कापुरबावडी, माजिवडा ते मानपाडा ही सध्या वाहतुक कोंडीचे मुख्य स्पॉट ठरत आहेत. सकाळच्या सत्रात तुम्हाला कोंडीचा जाच नसला तरी देखील दुपारी १२ नंतर मात्र तुम्हाला घोडबंदरला किंवा ठाण्याला यायचे असेल तर विचार करुनच निघा अन्यथा कापुरबावडी ते माजिवडा या अवघ्या एका मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तांसाचा कालावधी जात आहे. 

त्यात संध्याकाळ जर तुम्ही थकून भागून आणि रेल्वेच्या गर्दीत चेंगरुन आल्यानंतर सुखाने घरी जाण्याचा किंबहुना घोडबंदरला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वाहतुक कोंडीत रममाण होण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे, स्टेशनवरुन परिवहनची बस पकडल्यानंतर घोडबंदरला किंबहुना मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ या भागात जायचे असले तर त्यासाठी कमीत कमी दोन तासांचा कालावधी सांयकाळी ६ नंतर रात्री १० वाजेपर्यंत लागत असल्याचे चित्र आहे. त्यातही गोकुळ नगर ते कापुरबावडी हे अंतर कापण्यासाठी पाच मिनिटांचा देखील अवधी लागत नाही. मात्र सांयकाळी हेच अंतर कापण्यासाठी ३५ ते ४५ मिनिटांचा कालावधी खर्ची करावा लागत आहे. त्यात कोंडीत अडकल्यावर विविध स्वरुपाच्या वाजणाºया वाहनांच्या हॉर्नमुळे डोकेदुखी देखील वाढत असल्याचे चित्र आहे.

मानपाडा भागात मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या मधोमध पिलर उभारण्यात आले आहेत, त्यामुळे घोडबंदरकडे जातांना आणि ठाण्याकडे येतांना वाहतुकीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. त्यात आता कापुरबावडी नाक्यावर छोट्या पुलाच्या ठिकाणी देखील मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथे देखील वाहतुक धिमी झाली आहे. त्यामुळे सांयकाळच्या सुमारास याच भागात मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आणखी किती दिवस त्रास सहन करायचा असा सवाल ठाणेकर करु लागले आहेत.

टॅग्स :thaneठाणे