शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आधीच ध्वनी प्रदूषण त्यात वाहतूक कोंडी मुळे भाईंदरकर त्रासले 

By धीरज परब | Updated: October 3, 2022 14:53 IST

आधीच ध्वनी प्रदूषण त्यात वाहतूक कोंडी मुळे भाईंदरकर त्रासले आहेत. 

मीरारोड : मीरा भाईंदर मध्ये नवरात्री निमित्त ध्वनी प्रदूषण खूपच वाढले असताना दुसरीकडे आयोजकांच्या बेजबाबदार लोकांना पोलिसांकडून पाठीशी घातले जात असल्याने सायंकाळ पासून रात्री पर्यंत वाहतूक कोंडी सुद्धा प्रचंड होत आहे. नवरात्री उत्सवासाठी रात्री १० व काही दिवस रात्री १२ वाजे पर्यंतची ध्वनिक्षेपक, वाद्यवृंदाची परवानगी दिली असली तरी कायदे नियम व न्यायालयाच्या आदेशानुसार घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे शहरात सर्रास उल्लंघन केले जात आहे. परंतु पोलिसांकडून मात्र ध्वनी मर्यादेच्या नियमांचे काटेकोर पालन व कारवाई केली जात नसल्याने ध्वनी प्रदूषण करणारे आयोजक मोकाट आहेत. मात्र या मुळे रुग्णालय क्षेत्रासह निवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वाढल्याने रुग्ण, वृद्ध, परीक्षा असणारे विद्यार्थी, आदींना ध्वनी प्रदूषणाचा जाच सहन करावा लागत आहे. 

त्यातच आयोजकांकडून नवरात्री साठी आवश्यक वाहन पार्किंग आणि कार्यकर्त्यांचे नियोजन केले गेले नसताना देखील पोलीस आणि पालिकेने लागेबांधे सांभाळत कार्यक्रमांच्या परवानग्या दिल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी तर आयोजकांकडून रस्ता पूर्णपणे बंद करून वा रस्ता नाममात्र मोकळा ठेवला आहे. रहदारीच्या सार्वजनिक रस्त्यांवरच नवरात्री दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्यांची वाहने बेशिस्तपणे कुठे ही उभी केली जात आहेत. जेणेकरून प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचा मनःस्ताप वाढला आहे. भाईंदर पश्चिमेला तर अग्निशमन दलाचा मार्गच ह्या वाहतूक कोंडीने कोंडला गेला आहे. भाईंदर उड्डाण पूल व परिसरात तर वाहन कोंडी मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. 

आवाजाच्या मर्यादेचे उघड उल्लंघन होत आहे. ध्वनी प्रदूषण त्रासदायक ठरले असताना त्यात वाहन कोंडीची भर आणखी जाचक ठरली आहे. नागरिकांचे हित, कायदे - नियम व न्यायालयाच्या आदेशांना आयोजकांच्या आर्थिक व राजकीय फायद्यासाठी पोलीस आणि पालिकेने संपूर्ण शहर वेठीस धरले आहे.  बेजबाबदार अधिकारी व आयोजकांवर कठोर कारवाई करावी व उल्लंघन करणाऱ्यांना परवानग्या देऊ नये. असे मराठी एकिकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी म्हटले. 

 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीbhayandarभाइंदरNavratriनवरात्री