शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पाच पाड्यांवर टंचाईचे संकट, पाणीयोजना खर्चिक असल्याने प्रश्न सुटणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:59 IST

शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.टोकरेपाडा, खरमेपाडा, हेदूचापाडा, चिंचपाडा, दुमाडपाडा हे डोंगरटेकडीवर वसलेले पाच पाडे असून या पाड्यांना जवळपास पाण्याचे काही स्रोतच नाहीत. त्यामुळे त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तानसा धरणाचे बॅक वॉटर येथून जवळपास दोन किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथून पाणीयोजना खर्चिक तसेच जोखमीची असल्याने या पाड्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास बराच अवधी लागणार असल्याचे चित्र आहे. हे पाडे एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर असल्यानेही त्यांना नळपाणीपुरवठा करणे कष्टाचे ठरणार आहे. यंदा पाऊस लवकर गेल्याने तसेच भूगर्भाची पाणीपातळी खोलवर गेल्याने, विहिरीतील पाणी लवकर आटल्याने नेहमीपेक्षा यंदा लवकर टंचाई निर्माण झाली.

शहापूर तालुक्यातील ३२ गावे, ११० पाडे अशा १४२ गावपाड्यांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून यावर मात करण्यासाठी २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा पुरवठा करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यातील गावपाड्यांतील लोकसंख्या वाढलेली असल्याने त्यानुसार पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. - एस. भोंडवे, ग्रामपंचायत सदस्यआज ज्या गावपाड्यांना टंचाई निर्माण झाली आहे, त्या सर्वांचे ठराव आले आहेत. त्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.- एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणी