शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पाच पाड्यांवर टंचाईचे संकट, पाणीयोजना खर्चिक असल्याने प्रश्न सुटणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:59 IST

शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.टोकरेपाडा, खरमेपाडा, हेदूचापाडा, चिंचपाडा, दुमाडपाडा हे डोंगरटेकडीवर वसलेले पाच पाडे असून या पाड्यांना जवळपास पाण्याचे काही स्रोतच नाहीत. त्यामुळे त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तानसा धरणाचे बॅक वॉटर येथून जवळपास दोन किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथून पाणीयोजना खर्चिक तसेच जोखमीची असल्याने या पाड्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास बराच अवधी लागणार असल्याचे चित्र आहे. हे पाडे एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर असल्यानेही त्यांना नळपाणीपुरवठा करणे कष्टाचे ठरणार आहे. यंदा पाऊस लवकर गेल्याने तसेच भूगर्भाची पाणीपातळी खोलवर गेल्याने, विहिरीतील पाणी लवकर आटल्याने नेहमीपेक्षा यंदा लवकर टंचाई निर्माण झाली.

शहापूर तालुक्यातील ३२ गावे, ११० पाडे अशा १४२ गावपाड्यांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून यावर मात करण्यासाठी २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा पुरवठा करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यातील गावपाड्यांतील लोकसंख्या वाढलेली असल्याने त्यानुसार पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. - एस. भोंडवे, ग्रामपंचायत सदस्यआज ज्या गावपाड्यांना टंचाई निर्माण झाली आहे, त्या सर्वांचे ठराव आले आहेत. त्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.- एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणी