शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पाच पाड्यांवर टंचाईचे संकट, पाणीयोजना खर्चिक असल्याने प्रश्न सुटणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:59 IST

शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.टोकरेपाडा, खरमेपाडा, हेदूचापाडा, चिंचपाडा, दुमाडपाडा हे डोंगरटेकडीवर वसलेले पाच पाडे असून या पाड्यांना जवळपास पाण्याचे काही स्रोतच नाहीत. त्यामुळे त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तानसा धरणाचे बॅक वॉटर येथून जवळपास दोन किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथून पाणीयोजना खर्चिक तसेच जोखमीची असल्याने या पाड्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास बराच अवधी लागणार असल्याचे चित्र आहे. हे पाडे एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर असल्यानेही त्यांना नळपाणीपुरवठा करणे कष्टाचे ठरणार आहे. यंदा पाऊस लवकर गेल्याने तसेच भूगर्भाची पाणीपातळी खोलवर गेल्याने, विहिरीतील पाणी लवकर आटल्याने नेहमीपेक्षा यंदा लवकर टंचाई निर्माण झाली.

शहापूर तालुक्यातील ३२ गावे, ११० पाडे अशा १४२ गावपाड्यांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून यावर मात करण्यासाठी २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा पुरवठा करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यातील गावपाड्यांतील लोकसंख्या वाढलेली असल्याने त्यानुसार पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. - एस. भोंडवे, ग्रामपंचायत सदस्यआज ज्या गावपाड्यांना टंचाई निर्माण झाली आहे, त्या सर्वांचे ठराव आले आहेत. त्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.- एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणी