शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

कचरा गाडीतून पडणाऱ्या घाणपाण्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये रहिवाशी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 13:05 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा उचलणाराया ठेकेदाराच्या कॉम्पॅक्टर व टॅम्पोमधून ओल्या कचऱ्यातले घाणेरडे पाणी रस्त्यावर सांडून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याच्या समस्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा उचलणाराया ठेकेदाराच्या कॉम्पॅक्टर व टॅम्पोमधून ओल्या कचऱ्यातले घाणेरडे पाणी रस्त्यावर सांडून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याच्या समस्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. घाण पाण्याचे डाग सुध्दा कायम रहात आहेत. या प्रकरणी भाईंदरच्या बालाजी नगर मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तर बहुतांश ओला कचरा वेगळा वाहून नेला जात असल्याने कॉम्पॅक्टरमधून कचऱ्यातील घाणपाण्याची धारच लागते.मीरा भाईंदर शहरात सुरुवातीपासूनच आोला व सुका कचरा एकत्रच नेला जात होता. पण गेल्या तीन- चार वर्षांपासून ओला व सुका कचरा वेगळा करुन त्याची वाहतूक करण्यासाठी पालिकेने नागरिकांना सातत्याने आवाहन केले आहे. कचरा वाहतुकीसाठी ठेकेदारा मार्फत ७ टनाचे ४२ कॉम्पॅक्टर , ३ टनाचे २४ बंदिस्त टॅम्पो तर दिड टनाचे १३ बंदिस्त टॅम्पो वारपले जात आहेत. या शिवाय खुले डंपर सुध्दा रोजचे २५ च्या घरात कचरा वाहतुकीसाठी उपयोगात आणले जात आहेत.शहरात रोजचा निघणारा सुमारे ५०० टन ओला व सुका कचरा या वाहनांमधून उत्तनच्या धावगी डोंगरावरील कचरा प्रकल्पात नेऊन टाकला जात आहे. ओल्या कचरायाचे वर्गीकरण करुन देण्याचे प्रमाण वाढल्याने पालिकेने ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहनं वापरात आणली आहेत. ओल्या कचरायात घाणपाण्याचे प्रमाण अधिक असल्याने कॉम्पॅक्टर मध्ये ओला कचरा टाकल्यावर तो यांत्रिक पध्दतीने दाबला की आतील घाणपाण्याची धार रस्त्यावरच लागते. त्यामुळे जेथे कचरा भरण्यासाठी कॉम्पॅक्टर थांबवला जातो त्या ठिकाणी हे अतिशय घाण पाणी सांडून परिसरात दुर्गंधी पसरते. या घाणपाण्याचे रस्त्यावर पडलेले डाग सुध्दा निघत नाहीत. याचा रहिवाशी आणि पादचाऱ्यांना खुपच त्रास होत आहे.कचरा गाडीतील घाणपाण्याच्या गळतीने त्रासलेल्या भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर मधील विजय शर्मा, बजरंग सारडा, रमाकांत पोद्दार, आदेश अग्रवाल, हिरालाल जैन आदी रहिवाशांनी या विरोधात पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बालाजी नगर मध्ये शाती ज्योतच्या बाजुला, तिरुपती कॉम्पलेक्स समोर तसेच व्यंकटेश प्लाझा आद ठिकाणी इमारतींचा ओला कचरा कॉम्पॅक्टर थांबवून भरला जातो. बराच वेळ कॉम्पेक्टर एकाच जागी उभा असतो. घाणपाणी सांडुन परिसर अस्वच्छ होतोच शिवाय दिवसभर दुर्गंधी कायम असते. रहिवाशांसह पादचाऱ्यांना दुर्गंधी व घाणपाण्याचा त्रास सहन करावा लागतो. नाक मुठीत धरुन रहावे लागतेय. पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करुन नागरिकांची या दुर्गंधीतुन सुटका करावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMira Bhayanderमीरा-भाईंदर