शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

कचरा गाडीतून पडणाऱ्या घाणपाण्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये रहिवाशी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 13:05 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा उचलणाराया ठेकेदाराच्या कॉम्पॅक्टर व टॅम्पोमधून ओल्या कचऱ्यातले घाणेरडे पाणी रस्त्यावर सांडून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याच्या समस्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा उचलणाराया ठेकेदाराच्या कॉम्पॅक्टर व टॅम्पोमधून ओल्या कचऱ्यातले घाणेरडे पाणी रस्त्यावर सांडून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याच्या समस्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. घाण पाण्याचे डाग सुध्दा कायम रहात आहेत. या प्रकरणी भाईंदरच्या बालाजी नगर मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तर बहुतांश ओला कचरा वेगळा वाहून नेला जात असल्याने कॉम्पॅक्टरमधून कचऱ्यातील घाणपाण्याची धारच लागते.मीरा भाईंदर शहरात सुरुवातीपासूनच आोला व सुका कचरा एकत्रच नेला जात होता. पण गेल्या तीन- चार वर्षांपासून ओला व सुका कचरा वेगळा करुन त्याची वाहतूक करण्यासाठी पालिकेने नागरिकांना सातत्याने आवाहन केले आहे. कचरा वाहतुकीसाठी ठेकेदारा मार्फत ७ टनाचे ४२ कॉम्पॅक्टर , ३ टनाचे २४ बंदिस्त टॅम्पो तर दिड टनाचे १३ बंदिस्त टॅम्पो वारपले जात आहेत. या शिवाय खुले डंपर सुध्दा रोजचे २५ च्या घरात कचरा वाहतुकीसाठी उपयोगात आणले जात आहेत.शहरात रोजचा निघणारा सुमारे ५०० टन ओला व सुका कचरा या वाहनांमधून उत्तनच्या धावगी डोंगरावरील कचरा प्रकल्पात नेऊन टाकला जात आहे. ओल्या कचरायाचे वर्गीकरण करुन देण्याचे प्रमाण वाढल्याने पालिकेने ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहनं वापरात आणली आहेत. ओल्या कचरायात घाणपाण्याचे प्रमाण अधिक असल्याने कॉम्पॅक्टर मध्ये ओला कचरा टाकल्यावर तो यांत्रिक पध्दतीने दाबला की आतील घाणपाण्याची धार रस्त्यावरच लागते. त्यामुळे जेथे कचरा भरण्यासाठी कॉम्पॅक्टर थांबवला जातो त्या ठिकाणी हे अतिशय घाण पाणी सांडून परिसरात दुर्गंधी पसरते. या घाणपाण्याचे रस्त्यावर पडलेले डाग सुध्दा निघत नाहीत. याचा रहिवाशी आणि पादचाऱ्यांना खुपच त्रास होत आहे.कचरा गाडीतील घाणपाण्याच्या गळतीने त्रासलेल्या भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर मधील विजय शर्मा, बजरंग सारडा, रमाकांत पोद्दार, आदेश अग्रवाल, हिरालाल जैन आदी रहिवाशांनी या विरोधात पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बालाजी नगर मध्ये शाती ज्योतच्या बाजुला, तिरुपती कॉम्पलेक्स समोर तसेच व्यंकटेश प्लाझा आद ठिकाणी इमारतींचा ओला कचरा कॉम्पॅक्टर थांबवून भरला जातो. बराच वेळ कॉम्पेक्टर एकाच जागी उभा असतो. घाणपाणी सांडुन परिसर अस्वच्छ होतोच शिवाय दिवसभर दुर्गंधी कायम असते. रहिवाशांसह पादचाऱ्यांना दुर्गंधी व घाणपाण्याचा त्रास सहन करावा लागतो. नाक मुठीत धरुन रहावे लागतेय. पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करुन नागरिकांची या दुर्गंधीतुन सुटका करावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMira Bhayanderमीरा-भाईंदर