शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘आरपीएफ’मुळे परत मिळाले दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:45 IST

ठाणे रेल्वेस्थानकावर लोकलची वाट पाहताना अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज विसरलेली बॅग ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या दक्षतेमुळे नवी मुंबईच्या नेरूळ येथील देसाई दाम्पत्याला काही तासांतच मिळाली.

ठाणे - ठाणे रेल्वेस्थानकावर लोकलची वाट पाहताना अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज विसरलेली बॅग ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या दक्षतेमुळे नवी मुंबईच्या नेरूळ येथील देसाई दाम्पत्याला काही तासांतच मिळाली. ही घटना शुक्रवारी घडली असून विसरलेल्या बॅगेतील वस्तूंची खातरजमा झाल्यावर त्या बॅगेतील ऐवज त्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणे आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांनी दिली.नेरूळ येथील दत्तप्रसाद देसाई (३२) आणि त्यांची पत्नी संचिता (३०) हे दाम्पत्य शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-९ येथे लोकलची वाट पाहत बसले होते. लोकल फलाटावर लागताच घाईगडबडीत लोकलमध्ये चढताना संचिता या आपली हॅण्डबॅग विसरल्या.दरम्यान, त्याच फलाटावर गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवान अरुण कुमार आणि विक्रमाजित या दोघांच्या निदर्शनास ती बॅग आली. त्यांनी ही बाब तातडीने सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.बी. मेघे यांना सांगितली. बॅगेची तपासणी केल्यावर बॅगेत पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, आठ हजार ५०० रुपयांची रोकड, मंगळसूत्र, नेकलेस, दोन बांगड्या, दोन कानांतील रिंगा, दोन रिंगा, चार पेंडण्ट आणि एटीएमकार्ड असा ऐवज मिळून आला.बॅगेमध्ये होते ९० ग्रॅमचे दागिनेसोन्याचे दागिने अंदाजे ९० ग्रॅम वजनाचे असून त्यांची किंमत दोन लाख ५० हजार इतकी आहे. याचदरम्यान देसाई दाम्पत्याला बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार करणार तोच एक बॅग आरपीएफ पोलिसांना मिळाली असल्याचे सांगितले. आरपीएफमध्ये त्यांनी धाव घेतल्यावर ती त्यांची असल्याचे स्पष्ट झाल्यावर आरपीएफ पोलिसांनी बॅगेतील ऐवजाची खातरजमा झाल्यानंतर ती परत केल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस