शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

पावसाने पाठ फिरवल्याने धरण क्षेत्र अद्याप कोरडेच, भातसा-बारवीसह सर्वत्र पाणीसाठा आटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:30 IST

मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही.

- सुरेश लोखंडेठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील काही प्रमुख शहरांमध्ये सोमवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने उन्हाच्या काहिलीपासून तात्पुरता दिलासा लाभला असला तरी मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही. मुंबई महानगरास पाणीपुरवठा करणाºया व ब्रिटिशकालीन सर्वाधिक मोठ्या भातसा धरणात मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी म्हणजे २३.१९ टक्के पाणीसाठा आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणी पुरवणाºया बारवी धरणातही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अवघा १४.९० टक्के इतका साठा शिल्लक आहे. अन्यही धरणांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत कमी साठा शिल्लक असल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात येत्या आठ ते दहा दिवसांत धो धो पाऊस झाल्याखेरीज मुंबई व ठाणेकरांना दिलासा लाभणार नाही. अन्यथा मोठ्या कपातीला तोंड देण्याची पाळी येथील कोट्यवधी लोकांवर येणार आहे.या धरणांमधील पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यासाठी नोव्हेंबरपासूनच पाणीकपात लागू केली आहे. येत्या १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठ्याच्या जबाबदारीस अनुसरून जून संपत आला असतानाही तीव्र पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला विलंब झाला आहे. सोमवारी काही ठिकाणी सकाळी पाऊस पडला. पण, आजपर्यंत केवळ २४.३ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर त्याचा अभावच आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी पाऊस सरासरी २८३ मिमी म्हणजे ७७.८ टक्के पडला होता. मात्र, यंदा पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचितही वाढ झालेली नाही.जिल्ह्यातील भातसा धरणात मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा केवळ १४.९० टक्के म्हणजे ३४.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षी आजच्या दिवसापर्यंत ६३.५६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक होता. याप्रमाणेच आंध्रा धरणात ७२.२५० दशलक्ष घनमीटर म्हणजे २१ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २५.४५ टक्के पाणीसाठा या धरणात होता. या धरणातील पाणी उल्हास नदीद्वारे जिल्ह्यातील महापालिकांना पुरवले जाते. पण, १५ जुलैपर्यंत नक्कीच धरणातील पाणीसाठा वाढेल. याशिवाय, कर्जतच्या डोंगर परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी बारवी धरणाखालून लिफ्ट करून शहरांना पुरवण्यात येणार असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने सांगितले.ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांच्या क्षेत्रात तर पाऊस झालेला नाही. त्यामुळे आठवडाभरात धरणांच्या क्षेत्रात धो धो पाऊस झाला नाही तर परिस्थिती चिंताजनक होण्याची चिन्हे दिसत आहेत.पावसाच्या हलक्या सरींमुळे दिलासाजून महिना सरत आला तरी पाऊस सुरु न झाल्याने उकाड्याने हैराण असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना सोमवारी सकाळी झालेल्या पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा लाभला. अनेकजण छत्र्या घेऊन घराबाहेर पडले. मात्र दुपारनंतर पुन्हा ऊन पडल्याने उकाडा जाणवू लागला. त्यामुळे छत्र्यांचे लोढणे बाळगणे अनेकांच्या वाट्याला आले. मात्र, अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने चिंता वाढली आहे.

टॅग्स :thaneठाणेdroughtदुष्काळ