शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

पावसाने पाठ फिरवल्याने धरण क्षेत्र अद्याप कोरडेच, भातसा-बारवीसह सर्वत्र पाणीसाठा आटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:30 IST

मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही.

- सुरेश लोखंडेठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील काही प्रमुख शहरांमध्ये सोमवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने उन्हाच्या काहिलीपासून तात्पुरता दिलासा लाभला असला तरी मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही. मुंबई महानगरास पाणीपुरवठा करणाºया व ब्रिटिशकालीन सर्वाधिक मोठ्या भातसा धरणात मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी म्हणजे २३.१९ टक्के पाणीसाठा आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणी पुरवणाºया बारवी धरणातही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अवघा १४.९० टक्के इतका साठा शिल्लक आहे. अन्यही धरणांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत कमी साठा शिल्लक असल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात येत्या आठ ते दहा दिवसांत धो धो पाऊस झाल्याखेरीज मुंबई व ठाणेकरांना दिलासा लाभणार नाही. अन्यथा मोठ्या कपातीला तोंड देण्याची पाळी येथील कोट्यवधी लोकांवर येणार आहे.या धरणांमधील पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यासाठी नोव्हेंबरपासूनच पाणीकपात लागू केली आहे. येत्या १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठ्याच्या जबाबदारीस अनुसरून जून संपत आला असतानाही तीव्र पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला विलंब झाला आहे. सोमवारी काही ठिकाणी सकाळी पाऊस पडला. पण, आजपर्यंत केवळ २४.३ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर त्याचा अभावच आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी पाऊस सरासरी २८३ मिमी म्हणजे ७७.८ टक्के पडला होता. मात्र, यंदा पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचितही वाढ झालेली नाही.जिल्ह्यातील भातसा धरणात मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा केवळ १४.९० टक्के म्हणजे ३४.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षी आजच्या दिवसापर्यंत ६३.५६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक होता. याप्रमाणेच आंध्रा धरणात ७२.२५० दशलक्ष घनमीटर म्हणजे २१ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २५.४५ टक्के पाणीसाठा या धरणात होता. या धरणातील पाणी उल्हास नदीद्वारे जिल्ह्यातील महापालिकांना पुरवले जाते. पण, १५ जुलैपर्यंत नक्कीच धरणातील पाणीसाठा वाढेल. याशिवाय, कर्जतच्या डोंगर परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी बारवी धरणाखालून लिफ्ट करून शहरांना पुरवण्यात येणार असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने सांगितले.ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांच्या क्षेत्रात तर पाऊस झालेला नाही. त्यामुळे आठवडाभरात धरणांच्या क्षेत्रात धो धो पाऊस झाला नाही तर परिस्थिती चिंताजनक होण्याची चिन्हे दिसत आहेत.पावसाच्या हलक्या सरींमुळे दिलासाजून महिना सरत आला तरी पाऊस सुरु न झाल्याने उकाड्याने हैराण असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना सोमवारी सकाळी झालेल्या पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा लाभला. अनेकजण छत्र्या घेऊन घराबाहेर पडले. मात्र दुपारनंतर पुन्हा ऊन पडल्याने उकाडा जाणवू लागला. त्यामुळे छत्र्यांचे लोढणे बाळगणे अनेकांच्या वाट्याला आले. मात्र, अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने चिंता वाढली आहे.

टॅग्स :thaneठाणेdroughtदुष्काळ