शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

जनजागृतीमुळे पतंग उडविण्यासह जखमी पक्ष्यांचे प्रमाण निम्म्यावर; जैन अ‍लर्ट ग्रुपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 6:57 PM

मीरा- भाईंदर शहरात मकर संक्रांत सणावेळी साजरा होणाऱ्या पतंग महोत्सवामुळे अनेक पक्षी जीव गमावतात, जखमी होतात.

भाईंदर - मीरा- भाईंदर शहरात मकर संक्रांत सणावेळी साजरा होणाऱ्या पतंग महोत्सवामुळे अनेक पक्षी जीव गमावतात, जखमी होतात. त्यामुळे पतंग न उडविता सण उत्साहाने साजरा करा, असे आवाहन करून लोकांमध्ये वर्षानुवर्षे जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांमुळे शहरातील पतंग उडविण्यासह जखमी पक्षांचे प्रमाण यंदा निम्यावर आल्याचा दावा जैन अ‍ॅलर्ट ग्रुपने केला.यामुळे यंदा एका सुतार पक्षासह ५४ कबुतर जखमी झाले तर ७ कबुतरांचा मृत्यू झाल्याचे जैन अ‍ॅलर्ट ग्रुपचे कल्पेश नागडा यांनी सांगितले. मीरा- भाईंदर शहरामध्ये गुजराती समाज मोठ्या प्रमाणात असल्याने पतंग महोत्सवाला येथे उधाण येते. परंतु या पतंगांच्या महोत्सवामुळे आकाशात भ्रमंती करणाऱ्या पक्ष्यांवरच संक्रांत येते. पतंगांच्या मांज्यात पक्षी अडकल्याने अनेकदा ते गतप्राण होतात तर काही जखमी होतात. यात प्रामुख्याने कबुतरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा जखमी पक्ष्यांवर स्थानिक सामाजिक संस्थांद्वारे उपचार केले जातात. या सणावेळी जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी विविध समाजिक संस्था उपचार शिबिरे स्थापन करून त्यात पशु-पक्ष्यांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांची व्यवस्था करतात. सुरुवातीला जैन अ‍ॅलर्ट ग्रुप व अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट या दोन सामाजिक संस्थांनी शहरातील विविध भागांत संक्रातीच्या काळात पतंगाच्या मांज्यात अडकून जखमी होणा-या पक्ष्यांना वाचविण्यासाठी २००८ मध्ये मोहीम सुरू केली. त्यांनी शहरात ठिकठिकाणी जखमी पक्ष्यांच्या उपचाराचे शिबिर सुरू केले. सुरुवातीच्या काळात सुमारे ४५० हून अधिक पक्षी जखमी तर १०० हून अधिक मृत्युमुखी पडले होते. हा आकडा कमी करण्यासाठी या दोन्ही संस्थांनी थेट पतंग उडविण्याचे तोटे लोकांना सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचा परिणाम सकारात्मक होऊ लागल्याने त्यांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात पतंग उडविणा-यांचे प्रमाण कमी झाल्याने पक्ष्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रमाणही कमी झाले. २०१५ मध्ये २२७ पक्षी जखमी तर २५ मृत्यू, २०१६ मध्ये १८० जखमी व २० मृत्यू, २०१७ मध्ये १२३ जखमी तर १८ मृत्यू, २०१८ मध्ये १०७ जखमी व १७ मृत्यू, यंदा त्याचे प्रमाण निम्म्याहून कमी झाल्याचे जैन अ‍ॅलर्ट ग्रुपचे पीयूष धामी यांनी सांगितले. पतंग महोत्सवावेळी झाडांसह इतर ठिकाणी अडकलेला मांजा जमा करून देणाऱ्यांना सुमारे एक किलो मागे ५० रुपये देण्याचा फंडा जैन अ‍ॅलर्ट ग्रुपने सुरू केला. तसा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याने अनेकांनी मांजा आणून संस्थेच्या हवाली करून रक्कम मिळवल्याचे सांगण्यात आले.