शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निकृष्ट बांधकामामुळे इमारती धोकादायक, २५ पेक्षा जास्त जणांचा गेला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 02:38 IST

दीड महिन्याच्या कालावधीत २० पेक्षा जास्त इमारतींचे स्ल्ॉब पडणे, इमारती कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उल्हासनगर : दीड महिन्याच्या कालावधीत २० पेक्षा जास्त इमारतींचे स्ल्ॉब पडणे, इमारती कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातून जुन्या इमारतीच्या फेरसर्वेक्षणाची मागणी होत असून १९९० ते ९५ दरम्यान वालवा रेती व दगडी चुऱ्यापासून बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारती धोकादायक झाल्या आहेत.उल्हासनगरमध्ये बांधकामांचे सर्व नियम डावलून बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यातील ९० टक्के इमारतीला पूर्णत्वाचा दाखला नसून त्याची नोंदणी २० ते १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर झाली आहे. १९९० ते ९५ दरम्यांन रेती पुरवठा बंद असल्याने, शहरात वालवा रेती व दगडी चु-यातून इमारती बांधण्यात आल्या. मात्र वालवा रेती व दगडी चुºयातून बांधलेल्या बहुतांश इमारती धोकादायक होत आहे.|महापालिकेने २३५ पेक्षा जास्त इमारती धोकादायक तर २१ अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. मात्र जाहीर झालेल्या इमारतींऐवजी इतर इमारती कोसळत आहे. यामुळे धोकादायक इमारतींच्या यादीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. या प्रकरामुळे इमारतींचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे.महेक इमारतीची ए विंग मंगळवारी कोसळून ३१ कुटुंब बेघर झाली. तर बी विंगबरोबरच इतर तीन इमारती सुरक्षेचा उपाय म्हणून रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे १०३ कुटुंब बेघर झाली असून महापालिकेने त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र त्यांनी नातेवाईक व भाडयाच्या घरात राहणे पसंत केले.गेल्याच आठवडयात दोन इमारतींचे स्लॅब पडल्याने रिकाम्या करून सीलबंद केल्या आहेत. त्यापूर्वी पवई चौकातील एका इमारतीचा स्लॅब पडून चार वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. ४० दिवसात २० पेक्षा स्लॅब पडणे, इमारत कोसळणे, प्लास्टर पडणे, इमारतीला तडा जाणे आदी घटना घडल्याची माहिती एका प्रसिध्द वास्तूविशारदाने दिली.जीव मुठीत घेऊन हजारो नागरिकांचे वास्तव्यशहरात शेकडो धोकादायक इमारती असून यामध्ये हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. धोकादायक इमारतंबाबत सरकारने तसेच महापालिका प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन ४ चटई क्षेत्राची मागणी केली आहे. इमारतीला वाढीव चटईक्षेत्र दिल्यास त्यांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होणार आहे.या इमारती पडल्याशहरातील सनमुख सदन, गुडमॅन कॉटेज, माँ भगवंती, नीलकंठ, शीशमहल, शांती पॅलेस, माँ महालक्ष्मी, राणी माँ, शिवसागर, लक्ष्मीसागर, साई आसाराम आदी ३५ इमारती १० वर्षात पडून २५ पेक्षा जास्त जणांचे बळी गेले.सुरूवातीला अपघातातील मृतांच्या कुटुंबाला पालिकेकडून आर्थिक मदत दिली जात होती. मात्र आतातर महापालिकेने मदत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर