शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

निकृष्ट बांधकामामुळे इमारती धोकादायक, २५ पेक्षा जास्त जणांचा गेला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 02:38 IST

दीड महिन्याच्या कालावधीत २० पेक्षा जास्त इमारतींचे स्ल्ॉब पडणे, इमारती कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उल्हासनगर : दीड महिन्याच्या कालावधीत २० पेक्षा जास्त इमारतींचे स्ल्ॉब पडणे, इमारती कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातून जुन्या इमारतीच्या फेरसर्वेक्षणाची मागणी होत असून १९९० ते ९५ दरम्यान वालवा रेती व दगडी चुऱ्यापासून बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारती धोकादायक झाल्या आहेत.उल्हासनगरमध्ये बांधकामांचे सर्व नियम डावलून बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यातील ९० टक्के इमारतीला पूर्णत्वाचा दाखला नसून त्याची नोंदणी २० ते १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर झाली आहे. १९९० ते ९५ दरम्यांन रेती पुरवठा बंद असल्याने, शहरात वालवा रेती व दगडी चु-यातून इमारती बांधण्यात आल्या. मात्र वालवा रेती व दगडी चुºयातून बांधलेल्या बहुतांश इमारती धोकादायक होत आहे.|महापालिकेने २३५ पेक्षा जास्त इमारती धोकादायक तर २१ अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. मात्र जाहीर झालेल्या इमारतींऐवजी इतर इमारती कोसळत आहे. यामुळे धोकादायक इमारतींच्या यादीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. या प्रकरामुळे इमारतींचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे.महेक इमारतीची ए विंग मंगळवारी कोसळून ३१ कुटुंब बेघर झाली. तर बी विंगबरोबरच इतर तीन इमारती सुरक्षेचा उपाय म्हणून रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे १०३ कुटुंब बेघर झाली असून महापालिकेने त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र त्यांनी नातेवाईक व भाडयाच्या घरात राहणे पसंत केले.गेल्याच आठवडयात दोन इमारतींचे स्लॅब पडल्याने रिकाम्या करून सीलबंद केल्या आहेत. त्यापूर्वी पवई चौकातील एका इमारतीचा स्लॅब पडून चार वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. ४० दिवसात २० पेक्षा स्लॅब पडणे, इमारत कोसळणे, प्लास्टर पडणे, इमारतीला तडा जाणे आदी घटना घडल्याची माहिती एका प्रसिध्द वास्तूविशारदाने दिली.जीव मुठीत घेऊन हजारो नागरिकांचे वास्तव्यशहरात शेकडो धोकादायक इमारती असून यामध्ये हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. धोकादायक इमारतंबाबत सरकारने तसेच महापालिका प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन ४ चटई क्षेत्राची मागणी केली आहे. इमारतीला वाढीव चटईक्षेत्र दिल्यास त्यांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होणार आहे.या इमारती पडल्याशहरातील सनमुख सदन, गुडमॅन कॉटेज, माँ भगवंती, नीलकंठ, शीशमहल, शांती पॅलेस, माँ महालक्ष्मी, राणी माँ, शिवसागर, लक्ष्मीसागर, साई आसाराम आदी ३५ इमारती १० वर्षात पडून २५ पेक्षा जास्त जणांचे बळी गेले.सुरूवातीला अपघातातील मृतांच्या कुटुंबाला पालिकेकडून आर्थिक मदत दिली जात होती. मात्र आतातर महापालिकेने मदत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर