शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचा श्वास कोंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 11:01 IST

वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण दिवसें दिवस वाढत असतानाच मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदुषणात आणखीनच भर पडली आहे.

ठळक मुद्देप्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या विकारांना तोंड द्यावे लागत असून यंदा रुग्णांमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  फटाक्‍यांमधून निर्माण झालेला धूर वातावरणात तसाच राहत असल्याने नागरिकांना श्‍वसन संस्थेशी संबंधित आजारांना तोंड द्यावे लागते. नाक गळणे, नाक चोंदणे ही फटाक्यांच्या प्रदूषणातून निर्माण होणारी लक्षणे आहेत.

मीरारोड - वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण दिवसें दिवस वाढत असतानाच मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदुषणात आणखीनच भर पडली आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचे परिणाम जास्त करून भोगावे लागत आहेत. या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या विकारांना तोंड द्यावे लागत असून यंदा रुग्णांमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

शहरात दररोज किमान लाखो लिटर पेट्रोल व डिझेलचा धूर निघत असून  या धुरामुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता दिवाळीत मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदुषणात आणखीनच भर पडली असून याचे परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना भोगावे लागत आहेत. वाऱ्यामुळे फटाक्‍यांमधून निर्माण झालेला धूर वातावरणात तसाच राहत असल्याने नागरिकांना श्‍वसन संस्थेशी संबंधित आजारांना तोंड द्यावे लागत आहे. 

नाक, कान, घसा तज्ञ डॉ. निपा वेलीमुट्टम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मागील काही वर्षांत फटाके वाजवण्याचे प्रमाण घटले आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झाले असले तरी वायू प्रदूषणात मात्र घट झालेली दिसत नाही. आवाजाचे फटाके कमी झाले असले तरी रोषणाई, प्रकाशाच्या फटाक्‍यांचे प्रमाण वाढले आहे. विविध रंगी प्रकाश पसरवणारे हे फटाके मात्र मोठ्या प्रमाणात धूर सोडतात. हा धूर दीर्घकाळ हवेमध्ये राहत असल्याने त्याचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होत असून यावर्षी लहान मुलांच्या  श्वसन विकारात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे'

दिवाळीत फटाक्यांमधून निघणारे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजनडाय ऑक्साईड हे अनैसर्गिक विषारी वायू हवेत मिसळतात. ही हवा नाकाद्वारे शरिरात घेतल्यास कपाळ, गालांखालचा भाग, डोळे, डोके दुखू लागणे, डोके जड होणे, खाली वाकल्यास डोके दुखणे श्वसननलिकेला सूज येणे, नाक चोंदणे, लाल चट्टे येणे, कफ जमा होणे ही लक्षणे दिसून येतात. अनेक नागरिकांना  सतत खोकल्याची उबळ येत असल्याने रात्रीची चांगली झोप मिळत नाही. नाक गळणे, नाक चोंदणे ही फटाक्यांच्या प्रदूषणातून निर्माण होणारी लक्षणे असल्याचंही  वेलीमुट्टम यांनी सांगितलं. 

दुचाकी व चारचाकी वाहन बाळगणे ही नागरिकांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्यानेही वाहनांची संख्या वाढत आहे. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, अक्षयतृतीया असे शुभमुहूर्त साधून शहरात वाहन खरेदीत भर पडत आहे. गेल्या दोन वर्षात मीरा भाईंदर सह ठाणे व पालघर जिल्ह्यात  दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वातावरणात  प्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून वाढत्या धुरामुळे श्‍वसनविकारांमध्ये वाढ झाली असून आता फटाक्यांच्या धुराची भर पडली आहे. वाढत्या वायू प्रदूषणा बद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणmira roadमीरा रोडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरDiwaliदिवाळी